Friday, June 29, 2012

आज पुन्हा एकदा चंद्र झाल्यासारखे वाटले



आज पुन्हा एकदा चंद्र झाल्यासारखे वाटले
तोच चंद्र जो सगळ्यांना हवासा वाटतो
तोच चंद्र जो त्याच्या कवितेत असतो
तोच चंद्र जो तिच्या पुढे सुंदर नसतो
सुंदर असते ती, जी चंद्राला प्रश्न करते
खरच, आज पुन्हा एकदा चंद्र झाल्यासारखे वाटले
तिचे हसणे पण चंद्राच्या त्या निखळ चांदण्यासारखे भासले
तिचे डोळे पण चन्द्रासारखे दिसले
नाही तर तिच्या डोळ्यात तरी चंद्र दिसला
आज पुन्हा एकदा चंद्र झाल्यासारखे वाटले
ती समोर दिसावी म्हणून चंद्र समोर दिसू लागला
आणि आता ती लाजली असेल आस वाटल कारण
चंद्र ढगात लपला ... 



मन.......



मन,   कधी वाटे दवबिंदूप्रमाणे  कधी विशाल सागराप्रमाणे... 
मन,   कधी वाटे खोल दरीप्रमाणे  कधी उंच आभाळाप्रमाणे... 
मन,   कधी वाटे कर्कश ध्वनिप्रमाणे  कधी भयाण शान्ततेप्रमाणे... 
मन,   कधी वाटे लख्खे प्रकाश्म्ये  कधी  कुट्ट अंधाराप्रमाणे... 
मन हे वेडे,    कधी उडे पक्षांच्या थव्याप्रमाणे... 
                     कधी उदास होई चिमुकल्या बाळा प्रमाणे...





माहित नाही ....



आजवर अनेक कविता केल्या 

त्याहूनही जास्त वारेमाप पुसून टाकल्या
हीसुद्धा कदाचित शेवटी पुसून टाकीन
काय आहे, शब्दांचा सुद्धा येतो कंटाळा, कधी कधी 

मी अडचणीतच कविता खूप करतो,
मी एकटेपणातच खूप लिहितो, असंही नाही 
कागदही फाटतो, शाई उठत नाही
काय आहे, पेन्सीलही नाही म्हणते, कधी कधी 

शब्दांची रेलचेल बघतो आपण,
निष्पाप जीवांची घालमेल बघतो आपण
मन हेलावताना कोंबडी खातो आपण 
काय आहे, कशातच अर्थ नसतो , कधी कधी


तुम्हाला सगळ्या कविता आयुष्याबद्दलच हव्या,
कविता करताना मनाला वेदनाच हव्या 
प्रखर,गंभीर, रसपूर्ण शब्दांची मोहिनी सुद्धा हवी, पण
काय आहे, देवही अमृताऐवजी चहा घेतो कधी कधी 

प्रेमात कवितेच्या कळ्या होतात, वैराग्यात ती फुलते 
धुंदीत कविता दिसते, शुद्धीत तिचं स्तोत्र बनतं, पण 
वेदनेत कविता साधळते आणि मृत्यूत कविताच गोठते 
हे सारं सारं नकोसं वाटतंही , कधी कधी



 

आठवणींच्या आरश्यात जेव्हा ….

डोळ्यांतून पाण्याचे थेंब पडतात ….

त्या हलत्या आरशात मला ….

माझे दोन दोन चेहरे दिसतात ….

अश्रू होते का पाऊस ….

हे ओळखणेही अवघड जाते ….

अश्रू काय आणि पाऊस काय ….

पाहणार्याला दोन्ही सारखेच असते ….

बर्याचदा तुझ्या आठवणी ….

पावलं न वाजवताच येतात ….

जाताना मात्र मनाच्या रस्त्यात ….

तुझ्या पावलांचे ठसे मागे सोडून जातात ….

अवेळी आलेला पाउसही ….

सगळं उध्वस्त करतो ….

भर दुपारी भरल्या ढगांनी ….

काळोखी संध्याकाळ करतो ….




Friday, June 29, 2012

आज पुन्हा एकदा चंद्र झाल्यासारखे वाटले



आज पुन्हा एकदा चंद्र झाल्यासारखे वाटले
तोच चंद्र जो सगळ्यांना हवासा वाटतो
तोच चंद्र जो त्याच्या कवितेत असतो
तोच चंद्र जो तिच्या पुढे सुंदर नसतो
सुंदर असते ती, जी चंद्राला प्रश्न करते
खरच, आज पुन्हा एकदा चंद्र झाल्यासारखे वाटले
तिचे हसणे पण चंद्राच्या त्या निखळ चांदण्यासारखे भासले
तिचे डोळे पण चन्द्रासारखे दिसले
नाही तर तिच्या डोळ्यात तरी चंद्र दिसला
आज पुन्हा एकदा चंद्र झाल्यासारखे वाटले
ती समोर दिसावी म्हणून चंद्र समोर दिसू लागला
आणि आता ती लाजली असेल आस वाटल कारण
चंद्र ढगात लपला ... 



मन.......



मन,   कधी वाटे दवबिंदूप्रमाणे  कधी विशाल सागराप्रमाणे... 
मन,   कधी वाटे खोल दरीप्रमाणे  कधी उंच आभाळाप्रमाणे... 
मन,   कधी वाटे कर्कश ध्वनिप्रमाणे  कधी भयाण शान्ततेप्रमाणे... 
मन,   कधी वाटे लख्खे प्रकाश्म्ये  कधी  कुट्ट अंधाराप्रमाणे... 
मन हे वेडे,    कधी उडे पक्षांच्या थव्याप्रमाणे... 
                     कधी उदास होई चिमुकल्या बाळा प्रमाणे...





माहित नाही ....



आजवर अनेक कविता केल्या 

त्याहूनही जास्त वारेमाप पुसून टाकल्या
हीसुद्धा कदाचित शेवटी पुसून टाकीन
काय आहे, शब्दांचा सुद्धा येतो कंटाळा, कधी कधी 

मी अडचणीतच कविता खूप करतो,
मी एकटेपणातच खूप लिहितो, असंही नाही 
कागदही फाटतो, शाई उठत नाही
काय आहे, पेन्सीलही नाही म्हणते, कधी कधी 

शब्दांची रेलचेल बघतो आपण,
निष्पाप जीवांची घालमेल बघतो आपण
मन हेलावताना कोंबडी खातो आपण 
काय आहे, कशातच अर्थ नसतो , कधी कधी


तुम्हाला सगळ्या कविता आयुष्याबद्दलच हव्या,
कविता करताना मनाला वेदनाच हव्या 
प्रखर,गंभीर, रसपूर्ण शब्दांची मोहिनी सुद्धा हवी, पण
काय आहे, देवही अमृताऐवजी चहा घेतो कधी कधी 

प्रेमात कवितेच्या कळ्या होतात, वैराग्यात ती फुलते 
धुंदीत कविता दिसते, शुद्धीत तिचं स्तोत्र बनतं, पण 
वेदनेत कविता साधळते आणि मृत्यूत कविताच गोठते 
हे सारं सारं नकोसं वाटतंही , कधी कधी



 

आठवणींच्या आरश्यात जेव्हा ….

डोळ्यांतून पाण्याचे थेंब पडतात ….

त्या हलत्या आरशात मला ….

माझे दोन दोन चेहरे दिसतात ….

अश्रू होते का पाऊस ….

हे ओळखणेही अवघड जाते ….

अश्रू काय आणि पाऊस काय ….

पाहणार्याला दोन्ही सारखेच असते ….

बर्याचदा तुझ्या आठवणी ….

पावलं न वाजवताच येतात ….

जाताना मात्र मनाच्या रस्त्यात ….

तुझ्या पावलांचे ठसे मागे सोडून जातात ….

अवेळी आलेला पाउसही ….

सगळं उध्वस्त करतो ….

भर दुपारी भरल्या ढगांनी ….

काळोखी संध्याकाळ करतो ….