Wednesday, July 4, 2012

कंटाळा यावा इतका उत्साह


कंटाळा यावा इतका उत्साह
कुणाला आहे? कंटाळ्याचाही आता
कंटाळा आला आहे ही लाजत लाजत
हसते ती केस विंचरत बघते
प्रत्येक कुटुंबाचा मी अर्धा
घरवाला आहे मृत्यूचा खमंग
दरवळ हृदयाला पाणी सुटले
सध्याचे जीवन म्हणजे नुसताच
मसाला आहे रस्त्यावर
अस्तित्वाला मी कडेकडेने
नेतो हा पुढे निघाला आहे तो
पुढे निघाला आहे बघ मदिरा खराब
आहे हे सांगण्यास आला हा ही
गोष्ट वेगळी आहे की नशेत आला
आहे हा कविकट्ट्यावर 'गेला' तो
कविकट्ट्यावर 'गेला' गेलोही
असतो मीही पण वेळ कुणाला आहे
ठरवाच 'सभी' कुलकर्णी की कुठे
बघावे आता इकडे मधुबाला आहे
तिकडे मधुशाला आहे लाचार
धोरणे तुमची गोत्यात आणती
तुम्हा माझ्याशी वैर धरे तो
मासाच बुडाला आहे ती चामर
वृत्तावरती पाऊल उचलते हल्ली
बघतात लोक हा मुद्दा नुकताच
कळाला आहे होकारार्थी
हलणार्‍या लोकांच्या माना
सार्‍या एकाला समजत नाही हा
काय म्हणाला आहे या दोनच
प्रश्नांवरती मी जन्म खर्चले
लाखो ही दुनिया का आहे अन
'बेफिकिर' कशाला आहे

पायांना मी, कुठे जायचे कधीच


पायांना मी, कुठे जायचे कधीच
सांगत नाही तुडवत जातो रस्ते,
शोध तरीही संपत नाही... इतक्या
वर्षांनंतर तू मागतोस माफी
आता? जखमा भरती काळासोबत, ठणके
संपत नाही! तू आल्यावर, भिंती
फुलती, घर गंधांनी सजते तुझिया
अस्तित्त्वाची जादू मजला
उमगत नाही! स्वप्नांच्या त्या
गावी मजला फिरता यावे, म्हणुनि
मनातली मी कुठली अडगळ कधीच
फेकत नाही! प्रकाश नुस्ता...
प्रकाश... तुजला व्यक्त करावे
कैसे पाहत बसतो तुला एकटक...
कुणास सांगत नाही.

पाहते तुज पाहते लाजते मी


पाहते तुज पाहते लाजते मी
लाजते भावगंधित होउनी भाळते
मी भाळते मोहरून शहारती
अंगअंगीची पिसे काननी
मयुरासवे नाचते मी नाचते
फूलही उमलून देई मनाला पावती
पाखरू चुचकारते, हासते मी
हासते चंद्रकोर उजाडुनी रात
ना जावो कधी कोवळ्या
किरणांतुनी भारते मी भारते
बासरी कुठुनी बरे सूर छेडी
लाघवी कुंद धुंद सुरावरी
डोलते हिंडोलते सागरावर लाट
येता मनासी वाटते अर्पुनी
अवघे स्वत: वाहते मी वाहते
सांजवेळ किनारली, कृष्णवेडी
सावली दीप मी चरणी तुझ्या
लावते, ओवाळते अंतरी नयनातुनी
पाहिले रे मी तुला राजसा तव
मीलना, धावते मी धावते

देशील मला तू अश्रू.... मज हे


देशील मला तू अश्रू.... मज हे
ठावुक नव्हते मी हसतच दु:ख
पचवले, तुला हे जमले नसते मी
सजवित होतो स्वप्नं जरी
माझ्या भवताली जे स्वप्नं
जयाचे असते, ते तर त्याला
मिळते मी एक-एक टाक्याने
विणले, वस्त्र मनाचे उशीराच
कळाले, काळ लोटता रेशीम विरते
तू तुला विसरुनी गेलीस
परदेशात युगांच्या ये पुन्हा
परतुनी, गाव तुझे अजुनी तळमळते
हा छंद तुझा ना तुला कुठेही
पोहचवणारा अन् मार्ग संपता,
आयुष्य रेंगाळत बसते
पाऊलखुणा ज्या सोडून आलो आपण
मागे दे लक्ष जरा, ती वाट रोज
बोलावत असते ये फिरुन मनाच्या
पारावरती पुन्हा एकदा
किलबिलाटात ही मैफल
आयुष्याची सजते

मी वाट चांदण्याची शोधीत


मी वाट चांदण्याची शोधीत
चंद्र झालो माझ्या कलाकलांना
माळीत चंद्र झालो कल्याण
आळवीती ओल्या मधाळ राती गंधार
भाववेडा ऐकीत चंद्र झालो
खाणाखुणा तमाच्या शोधून
सांगताना शुक्रास मी ललाटी
भाळीत चंद्र झालो शब्दात
झाकलेल्या अर्थास तेज देण्या
अंधार तेववोनी ऐटीत चंद्र
झालो होता सभोवताली बेधुंद
रोषणाई रंगीत चंद्र झालो,
धुंदीत चंद्र झालो रातीस
पौर्णिमेच्या अंधार भोगणारी
पापी पिशाच्च प्रेते जाळीत
चंद्र झालो

बंद दिवसाच्या घराचे दार


बंद दिवसाच्या घराचे दार
होताना रोज आठवतो तुला अंधार
होताना सोबती होतीस माझ्या तू
उन्हाळाभर पण अता नाहीस
हिरवेगार होताना सोडले तू बाण
आणिक चालती झाली पाहिले नाही
जिवाच्या पार होताना सोसले
होते कसे तू एवढे ओझे कोलमडलो
मी तुझा आधार होताना आज खळखळले
जरा ओठावरी हासू पाहिले नाही
असे मी फार होताना

गार्‍हाण साठल्यावर ती


गार्‍हाण साठल्यावर ती
काळजीत असते आईस भेटल्यावर ती
काळजीत असते भिजवीत अंग नाही
पाऊस पाहताना रस्त्यात
गाठल्यावर ती काळजीत असते
पसरून कुंतलाना ज्याच्यावरी
सुखी, तो वारा पिसाटल्यावर ती
काळजीत असते अंधार भोगण्याची
नसते सवड चिउला चोची
पहाटल्यावर...? ती काळजीत असते
तुटली कितेक झाडे झाली सवय
तरीही फांद्या तटाटल्यावर ती
काळजीत असते

पहिला पाऊस पाहताच


पहिला पाऊस पाहताच
मनी येई तुझी आठवण
अन् तुझसाठी रचलेल्या कवितांची साठवण..
पहिली सर तळहातावर झेलणारी तू
अन् त्या
सरीसारखं होऊ पाहणारा मी..
डहाळीवरचे थेंब चेह-यावर
खेळावणारी तू
अन् त्यातला तुझा ओठावर पडू पाहणारा थेंब मी..
कधी
तू त्रासावे पावसाला अन् चिडून आडोशाला थांबलेली तू
तुझा मर्जीसाठी
तुला पदराखाली घेणार झाड मी..
जरी झालिस तू मुक्त चातकासारखी
तरी
तुझी तहान भागवणारा थेंब होईन मी..
फक्त तुझासाठी...


भेटला पाऊस अन् भिजवून गेला


भेटला पाऊस अन् भिजवून गेला
स्पर्श ओले मन्मनी ठेऊन गेला
आठवांनी जीव कासावीस व्हावा
कोणता हा मेघ ओसंडून गेला?
मोडल्या घरट्यास आता जाग आली
गाव स्वप्नांचा इथे राहून
गेला चातकावरुनी चिडवतो
पावसाला - 'पोट भरले अन् तुला
विसरून गेला' ते तुझ्या
डोळ्यांतले काजळ असावे की
उगाचच मेघ अंधारून गेला? त्या
मिठीची बात काही और होती तो
खुळा पाऊस संकोचून गेला पाहतो
मी रोजचे थैमान त्याचे कालचा
पाऊस रेंगाळून गेला


मी काळाला एक संधी देतो आहे


मी काळाला एक संधी देतो आहे
आणि स्वत:ला एक संधी मागतो आहे
तुझ्याविषयी मनात निखळ चांगले काही मागे उरण्यासाठी…!
पाऊस तर आटोपून गेलाय केव्हाच आपला कारभार
आता हिरवळीवर फुलून आलेल्या
रंगबिरंगी रानफुलांची चित्र राहतील मनावर
का राहील हिरवलीखालचा ओलाकिच्च चिखल
हे मी काळावरच सोपवतो आहे…

प्रयत्न तर खूप केले आणि करतोही आहे मी

की तुझे नाव घेताना तुझ्यावाचूनही
मन गाभार्‍यासारखे गंधित होत राहावे
पण
तळहातीच्या रेषांसारखे चिकटून बसलेले
काही शब्द, काही घटना
हाणून पाडतायत माझा बेत
असो ! ढासळलेल्या बेतांचा एक डोंगर साचलाय इथे
त्यात ही काडी काही जड नव्हे…!

नशिब हातात नसले तरी
प्रार्थना आहे!
आणि माणसाच्या स्मरणशक्तीपेक्षा
विस्मरणशक्तीवर माझा भरवसा आहे…

तो ही तूटणार असेल कदाचित;
पण तोवर
मी काळाला एक संधी देतो आहे
आणि स्वत:ला एक संधी मागतो आहे….


तुझेही पाय मातिचेच असतिलयाची


तुझेही पाय मातिचेच असतिलयाची
जाणिव आधिच होतीम्हणुनच
तुला वाहिलेली प्रत्येक ओंजळ
सुंदर फुलांची पण कागदिच होती !

तुझे काय ते तुला माहित

प्रेम माझे खरे होते
तुला ओळखता नाही आले
मी तर सर्वस्व तुला वाहिले होते.

मन होतं माझं कुठेतरी हरवलेलं,
पण तरी ते तुलाच शोधत होतं,
तुला खरच ओळखता नाही आलं,
ते फक्त तुझ्यासाठीच झुरत होतं.

कळलच नाही कधी
मलातुझ ते आतल्या आत जळण
जवळ असून ही लक्ष्यातच आल नाही
तुझ एकटीचच तरफडण

जवळ असून ही लक्ष्यातच आल नाही
कारण तुझी कळी कधी खुललीच नाही
मिट्लेल्या ओठामागची
निःशब्द भाषा कळलीच नाही

ओठ जरी माझे मिटलेले
डोळे मात्र उघडे होते
तू ओठातून फूटणार्‍या शब्दाची वाट पहिली
पण डोळ्यानी ते कधीच वेक्त केले होते....

डोळ्यांनी व्यक्त केलेस
ते डोळ्यानिच ऎकले
पापण्या मिटता मिटता
आसवांनीच टिपले

आसवांची फुलेच दिलीस मला तु
मौन राखिले तरीका डोळ्यात तु
ज्या सदा प्रश्नभाव
राजसा प्रीत माजी हि खरी

खरी जरी असेल प्रित तुझी...
का केली नाही तु व्यक्त...
सदा वात बघण्यात तुझी...
आटले माझ्या देहाचे रक्त...

अव्यक्ताला व्यक्त होण्याची
वाट मीही पाहिली
तू या वाटेवर वळण्या आधिच
मग ही वाट का ग संपली

मी तर तेथेच होते वाट बघत....
तुझिच नजर ना वळली....
प्रित मझ्या मनाची सदा...
तुलाच ति का न कळली???

वाट होती अजून शिल्लक
प्रवासच संपला
ज्याचा त्याचा वाटा जितका
त्याचा त्याला मिळाला.

ना काही हसत शिकलो
ना काही रडत शिकलो
चालायचे तर मी
पडुन पडूनच शिकलो

कधी तरी आठवणींचा पट खुलतो ,
तुझा माझ्या प्रेमाचा मग डाव रंगतो
विसर मनाला कितीदा मी सांगतो
ते ही हट्टी सारे सोडून त्यामागेच धावतो

माझ्या मनाच माझ्या मेंदुशी
छत्तीसचा आकडा आहे
माझं मन तसं सरळ आहे
या मेंदुचाच रस्ता वाकडा आहे.

प्रतेक गावाबाहेर
छोटा महारवाडा आहेच
वथीच्या पुस्तकात मात्
रसमानतेचा धडा आहे.

इथे वेडं असण्याचे
खुप फायदे आहेत
शहाण्यासाठी जगण्याचे
काटेकोर कायदे आहेत.

संध्याकाळच्या रंगीत आकाशात
जेव्हा दिशा भरकटून जातात
पंख फ़ुटलेली स्मृतीपाखरं
घरट्याकडे परतू लागतात

ओठांवर ओठ टेकवताना
भान दुनियेचं ठेवायचं नसतं
तूच तर सांगत असतेस ना, तेव्हा
डोळ्यांनीच डोळ्यांशी बोलायचं असतं

आयुष्यातल्या अशा प्रत्येक संध्याकाळी
वेदनांच्या सावल्या तीव्र लांबू लागतात
तुझ्याच मिठीत येऊन मी मनमुराद रडतो
गाल गोरे तुझेसुद्धा ओले होऊ पाहतात

आयुष्याच्या अल्बममध्ये
आठवणींचे फ़ोटो असतात
आणखी एक कॉपी काढायला
निगेटिव्ह्ज मात्र शिल्लक नसतात

चारचौघांमध्ये आठवणी वाटणं
ही भावनांची गुंतवणूक असते
मयूरपंखी रेशीमगाठी क्षणार्धात जुळून येतात
त्यातच त्यांची सव्याज परतफ़ेड मिळते

रात पुनवेची तारे आटून गेले,
प्याले नजरेचे ओठ चाटून गेले.
लाजता तू पुन्हा तशी गुलाबी,
रंग नभी पंचमी दाटून गेले.

एकटी स्वप्न माज़ी,
मी स्वप्नातही एकटा.
एकट्यांची ही गर्दी,
या गर्दीत मी एक एकटा...

भरल्या होत्या इथे हजार मैफ़ीली
सुर माझा कधी वाजलाच नाही
मी खेळलो कीत्येकदा रंग स्वरांचा
पण रंग माझा कुणासही लागलाच नाही...

लिहून दाखवले तरी कलले नाही,
बोलून दाखवले तरी कलले नाही,
तू त्याच्या सोबत निघून गेलीस तेव्हा कलले,
ते तुज्या पर्यंत कधी पोहचलेच नाही...

घरात काळोख शिरेल म्हणुन
मी सगळी दारं लावून बसलो
आणि स्वत:च्या खुळेपनावर
अंधारात बसून हसलो

सुंदर लाटेवर भाळून
सूर्य तिच्याकडे आकर्षला
दिवसाची खुप आश्वासन
देऊन रात्री मात्र फितूर झाला

चंद्राबरोबर चांदनी एकच असते
पण तीचं नक्की सांगता येत नाही
त्याला रोज बदलताही येइल पणतीला ते जमणार नाही

गावातले सगळे रस्ते
रात्री गावाबाहेर पडतात
मला घरीच परतायचं असतं
पण ते मला रानात नेउन सोडतात

रात्रीची जागी राहून
मी त्या चांदनिला बघत होती
ती सुद्धा माझ्याप्रमाणे
एकटीच हसत होती........

नाही म्हणाले नसले तरी
हो सुद्धा बोलले नाहीतो
विचारून थांबला तरी
मला काही सुचले नाही ....

तू सोडून जाशील म्हणुन
मी वेडी झाली होती


 

पाऊस दरवर्षी येतो, आणि चिंब भिजवून जातो.....


पाऊस दरवर्षी येतो, आणि चिंब भिजवून जातो
ती दरवर्षीच भिजते आणि त्याला आवर्जून सांगते
पाऊस दरवर्षीच येतो आणि चिंब भिजवून जातो
तो दरवर्षीच गच्चीतून पाहतो, आणि तिला लगेच कळवतो

कधीच एकत्र नाही भिजलीत ती दोघं

तरी एकत्र पहिला पाऊस अनुभवला दोघांनी मिळून
कधीच नाही पाहिला पाऊस बसून जवळ
तरी एकत्र रमलेत पावसात अदभूत जादू जणू

खूप बरसतो पाऊस दर वर्षीच, मजा वाटते तिला
दरवर्षी पावसात चिंब भिजते ती साठवते मनात त्याला
मनात तिच्या नेहमीच भिनतो पाऊस लहान ती होताना
ओठांवरती हसू पसरते डोळे बंद करून भिजताना

तो हि तिच्याच सारखा बेधुंद ह्या जगात जगताना
पाऊस आला कि हसून देतो तिची आठवण काढताना
बरसणारा पाऊस त्याला कधी हसरा कधी रागात वाटतो
अशा पावसात भिजून तो स्वतः च जग अनुभवतो

एकत्र नाही ती दोघं, तरी अडकलेत एकमेंकांत
पडला नाही पाऊस अजून तरी भिजली ती त्याच्या भासत
एकत्र नाही ती दोघं, तरी अडकलेत एकमेंकांत
पडलाच नाही परत पाऊस तर राहील का तो त्याच्याच मिटलेल्या जगात

पाऊस दरवर्षी येतो, आणि चिंब भिजवून जातो
ती दरवर्षीच भिजते आणि त्याला आवर्जून सांगते
पाऊस दरवर्षीच येतो आणि चिंब भिजवून जातो
तो दरवर्षीच गच्चीतून पाहतो, आणि तिला लगेच कळवतो

 

Wednesday, July 4, 2012

कंटाळा यावा इतका उत्साह


कंटाळा यावा इतका उत्साह
कुणाला आहे? कंटाळ्याचाही आता
कंटाळा आला आहे ही लाजत लाजत
हसते ती केस विंचरत बघते
प्रत्येक कुटुंबाचा मी अर्धा
घरवाला आहे मृत्यूचा खमंग
दरवळ हृदयाला पाणी सुटले
सध्याचे जीवन म्हणजे नुसताच
मसाला आहे रस्त्यावर
अस्तित्वाला मी कडेकडेने
नेतो हा पुढे निघाला आहे तो
पुढे निघाला आहे बघ मदिरा खराब
आहे हे सांगण्यास आला हा ही
गोष्ट वेगळी आहे की नशेत आला
आहे हा कविकट्ट्यावर 'गेला' तो
कविकट्ट्यावर 'गेला' गेलोही
असतो मीही पण वेळ कुणाला आहे
ठरवाच 'सभी' कुलकर्णी की कुठे
बघावे आता इकडे मधुबाला आहे
तिकडे मधुशाला आहे लाचार
धोरणे तुमची गोत्यात आणती
तुम्हा माझ्याशी वैर धरे तो
मासाच बुडाला आहे ती चामर
वृत्तावरती पाऊल उचलते हल्ली
बघतात लोक हा मुद्दा नुकताच
कळाला आहे होकारार्थी
हलणार्‍या लोकांच्या माना
सार्‍या एकाला समजत नाही हा
काय म्हणाला आहे या दोनच
प्रश्नांवरती मी जन्म खर्चले
लाखो ही दुनिया का आहे अन
'बेफिकिर' कशाला आहे

पायांना मी, कुठे जायचे कधीच


पायांना मी, कुठे जायचे कधीच
सांगत नाही तुडवत जातो रस्ते,
शोध तरीही संपत नाही... इतक्या
वर्षांनंतर तू मागतोस माफी
आता? जखमा भरती काळासोबत, ठणके
संपत नाही! तू आल्यावर, भिंती
फुलती, घर गंधांनी सजते तुझिया
अस्तित्त्वाची जादू मजला
उमगत नाही! स्वप्नांच्या त्या
गावी मजला फिरता यावे, म्हणुनि
मनातली मी कुठली अडगळ कधीच
फेकत नाही! प्रकाश नुस्ता...
प्रकाश... तुजला व्यक्त करावे
कैसे पाहत बसतो तुला एकटक...
कुणास सांगत नाही.

पाहते तुज पाहते लाजते मी


पाहते तुज पाहते लाजते मी
लाजते भावगंधित होउनी भाळते
मी भाळते मोहरून शहारती
अंगअंगीची पिसे काननी
मयुरासवे नाचते मी नाचते
फूलही उमलून देई मनाला पावती
पाखरू चुचकारते, हासते मी
हासते चंद्रकोर उजाडुनी रात
ना जावो कधी कोवळ्या
किरणांतुनी भारते मी भारते
बासरी कुठुनी बरे सूर छेडी
लाघवी कुंद धुंद सुरावरी
डोलते हिंडोलते सागरावर लाट
येता मनासी वाटते अर्पुनी
अवघे स्वत: वाहते मी वाहते
सांजवेळ किनारली, कृष्णवेडी
सावली दीप मी चरणी तुझ्या
लावते, ओवाळते अंतरी नयनातुनी
पाहिले रे मी तुला राजसा तव
मीलना, धावते मी धावते

देशील मला तू अश्रू.... मज हे


देशील मला तू अश्रू.... मज हे
ठावुक नव्हते मी हसतच दु:ख
पचवले, तुला हे जमले नसते मी
सजवित होतो स्वप्नं जरी
माझ्या भवताली जे स्वप्नं
जयाचे असते, ते तर त्याला
मिळते मी एक-एक टाक्याने
विणले, वस्त्र मनाचे उशीराच
कळाले, काळ लोटता रेशीम विरते
तू तुला विसरुनी गेलीस
परदेशात युगांच्या ये पुन्हा
परतुनी, गाव तुझे अजुनी तळमळते
हा छंद तुझा ना तुला कुठेही
पोहचवणारा अन् मार्ग संपता,
आयुष्य रेंगाळत बसते
पाऊलखुणा ज्या सोडून आलो आपण
मागे दे लक्ष जरा, ती वाट रोज
बोलावत असते ये फिरुन मनाच्या
पारावरती पुन्हा एकदा
किलबिलाटात ही मैफल
आयुष्याची सजते

मी वाट चांदण्याची शोधीत


मी वाट चांदण्याची शोधीत
चंद्र झालो माझ्या कलाकलांना
माळीत चंद्र झालो कल्याण
आळवीती ओल्या मधाळ राती गंधार
भाववेडा ऐकीत चंद्र झालो
खाणाखुणा तमाच्या शोधून
सांगताना शुक्रास मी ललाटी
भाळीत चंद्र झालो शब्दात
झाकलेल्या अर्थास तेज देण्या
अंधार तेववोनी ऐटीत चंद्र
झालो होता सभोवताली बेधुंद
रोषणाई रंगीत चंद्र झालो,
धुंदीत चंद्र झालो रातीस
पौर्णिमेच्या अंधार भोगणारी
पापी पिशाच्च प्रेते जाळीत
चंद्र झालो

बंद दिवसाच्या घराचे दार


बंद दिवसाच्या घराचे दार
होताना रोज आठवतो तुला अंधार
होताना सोबती होतीस माझ्या तू
उन्हाळाभर पण अता नाहीस
हिरवेगार होताना सोडले तू बाण
आणिक चालती झाली पाहिले नाही
जिवाच्या पार होताना सोसले
होते कसे तू एवढे ओझे कोलमडलो
मी तुझा आधार होताना आज खळखळले
जरा ओठावरी हासू पाहिले नाही
असे मी फार होताना

गार्‍हाण साठल्यावर ती


गार्‍हाण साठल्यावर ती
काळजीत असते आईस भेटल्यावर ती
काळजीत असते भिजवीत अंग नाही
पाऊस पाहताना रस्त्यात
गाठल्यावर ती काळजीत असते
पसरून कुंतलाना ज्याच्यावरी
सुखी, तो वारा पिसाटल्यावर ती
काळजीत असते अंधार भोगण्याची
नसते सवड चिउला चोची
पहाटल्यावर...? ती काळजीत असते
तुटली कितेक झाडे झाली सवय
तरीही फांद्या तटाटल्यावर ती
काळजीत असते

पहिला पाऊस पाहताच


पहिला पाऊस पाहताच
मनी येई तुझी आठवण
अन् तुझसाठी रचलेल्या कवितांची साठवण..
पहिली सर तळहातावर झेलणारी तू
अन् त्या
सरीसारखं होऊ पाहणारा मी..
डहाळीवरचे थेंब चेह-यावर
खेळावणारी तू
अन् त्यातला तुझा ओठावर पडू पाहणारा थेंब मी..
कधी
तू त्रासावे पावसाला अन् चिडून आडोशाला थांबलेली तू
तुझा मर्जीसाठी
तुला पदराखाली घेणार झाड मी..
जरी झालिस तू मुक्त चातकासारखी
तरी
तुझी तहान भागवणारा थेंब होईन मी..
फक्त तुझासाठी...


भेटला पाऊस अन् भिजवून गेला


भेटला पाऊस अन् भिजवून गेला
स्पर्श ओले मन्मनी ठेऊन गेला
आठवांनी जीव कासावीस व्हावा
कोणता हा मेघ ओसंडून गेला?
मोडल्या घरट्यास आता जाग आली
गाव स्वप्नांचा इथे राहून
गेला चातकावरुनी चिडवतो
पावसाला - 'पोट भरले अन् तुला
विसरून गेला' ते तुझ्या
डोळ्यांतले काजळ असावे की
उगाचच मेघ अंधारून गेला? त्या
मिठीची बात काही और होती तो
खुळा पाऊस संकोचून गेला पाहतो
मी रोजचे थैमान त्याचे कालचा
पाऊस रेंगाळून गेला


मी काळाला एक संधी देतो आहे


मी काळाला एक संधी देतो आहे
आणि स्वत:ला एक संधी मागतो आहे
तुझ्याविषयी मनात निखळ चांगले काही मागे उरण्यासाठी…!
पाऊस तर आटोपून गेलाय केव्हाच आपला कारभार
आता हिरवळीवर फुलून आलेल्या
रंगबिरंगी रानफुलांची चित्र राहतील मनावर
का राहील हिरवलीखालचा ओलाकिच्च चिखल
हे मी काळावरच सोपवतो आहे…

प्रयत्न तर खूप केले आणि करतोही आहे मी

की तुझे नाव घेताना तुझ्यावाचूनही
मन गाभार्‍यासारखे गंधित होत राहावे
पण
तळहातीच्या रेषांसारखे चिकटून बसलेले
काही शब्द, काही घटना
हाणून पाडतायत माझा बेत
असो ! ढासळलेल्या बेतांचा एक डोंगर साचलाय इथे
त्यात ही काडी काही जड नव्हे…!

नशिब हातात नसले तरी
प्रार्थना आहे!
आणि माणसाच्या स्मरणशक्तीपेक्षा
विस्मरणशक्तीवर माझा भरवसा आहे…

तो ही तूटणार असेल कदाचित;
पण तोवर
मी काळाला एक संधी देतो आहे
आणि स्वत:ला एक संधी मागतो आहे….


तुझेही पाय मातिचेच असतिलयाची


तुझेही पाय मातिचेच असतिलयाची
जाणिव आधिच होतीम्हणुनच
तुला वाहिलेली प्रत्येक ओंजळ
सुंदर फुलांची पण कागदिच होती !

तुझे काय ते तुला माहित

प्रेम माझे खरे होते
तुला ओळखता नाही आले
मी तर सर्वस्व तुला वाहिले होते.

मन होतं माझं कुठेतरी हरवलेलं,
पण तरी ते तुलाच शोधत होतं,
तुला खरच ओळखता नाही आलं,
ते फक्त तुझ्यासाठीच झुरत होतं.

कळलच नाही कधी
मलातुझ ते आतल्या आत जळण
जवळ असून ही लक्ष्यातच आल नाही
तुझ एकटीचच तरफडण

जवळ असून ही लक्ष्यातच आल नाही
कारण तुझी कळी कधी खुललीच नाही
मिट्लेल्या ओठामागची
निःशब्द भाषा कळलीच नाही

ओठ जरी माझे मिटलेले
डोळे मात्र उघडे होते
तू ओठातून फूटणार्‍या शब्दाची वाट पहिली
पण डोळ्यानी ते कधीच वेक्त केले होते....

डोळ्यांनी व्यक्त केलेस
ते डोळ्यानिच ऎकले
पापण्या मिटता मिटता
आसवांनीच टिपले

आसवांची फुलेच दिलीस मला तु
मौन राखिले तरीका डोळ्यात तु
ज्या सदा प्रश्नभाव
राजसा प्रीत माजी हि खरी

खरी जरी असेल प्रित तुझी...
का केली नाही तु व्यक्त...
सदा वात बघण्यात तुझी...
आटले माझ्या देहाचे रक्त...

अव्यक्ताला व्यक्त होण्याची
वाट मीही पाहिली
तू या वाटेवर वळण्या आधिच
मग ही वाट का ग संपली

मी तर तेथेच होते वाट बघत....
तुझिच नजर ना वळली....
प्रित मझ्या मनाची सदा...
तुलाच ति का न कळली???

वाट होती अजून शिल्लक
प्रवासच संपला
ज्याचा त्याचा वाटा जितका
त्याचा त्याला मिळाला.

ना काही हसत शिकलो
ना काही रडत शिकलो
चालायचे तर मी
पडुन पडूनच शिकलो

कधी तरी आठवणींचा पट खुलतो ,
तुझा माझ्या प्रेमाचा मग डाव रंगतो
विसर मनाला कितीदा मी सांगतो
ते ही हट्टी सारे सोडून त्यामागेच धावतो

माझ्या मनाच माझ्या मेंदुशी
छत्तीसचा आकडा आहे
माझं मन तसं सरळ आहे
या मेंदुचाच रस्ता वाकडा आहे.

प्रतेक गावाबाहेर
छोटा महारवाडा आहेच
वथीच्या पुस्तकात मात्
रसमानतेचा धडा आहे.

इथे वेडं असण्याचे
खुप फायदे आहेत
शहाण्यासाठी जगण्याचे
काटेकोर कायदे आहेत.

संध्याकाळच्या रंगीत आकाशात
जेव्हा दिशा भरकटून जातात
पंख फ़ुटलेली स्मृतीपाखरं
घरट्याकडे परतू लागतात

ओठांवर ओठ टेकवताना
भान दुनियेचं ठेवायचं नसतं
तूच तर सांगत असतेस ना, तेव्हा
डोळ्यांनीच डोळ्यांशी बोलायचं असतं

आयुष्यातल्या अशा प्रत्येक संध्याकाळी
वेदनांच्या सावल्या तीव्र लांबू लागतात
तुझ्याच मिठीत येऊन मी मनमुराद रडतो
गाल गोरे तुझेसुद्धा ओले होऊ पाहतात

आयुष्याच्या अल्बममध्ये
आठवणींचे फ़ोटो असतात
आणखी एक कॉपी काढायला
निगेटिव्ह्ज मात्र शिल्लक नसतात

चारचौघांमध्ये आठवणी वाटणं
ही भावनांची गुंतवणूक असते
मयूरपंखी रेशीमगाठी क्षणार्धात जुळून येतात
त्यातच त्यांची सव्याज परतफ़ेड मिळते

रात पुनवेची तारे आटून गेले,
प्याले नजरेचे ओठ चाटून गेले.
लाजता तू पुन्हा तशी गुलाबी,
रंग नभी पंचमी दाटून गेले.

एकटी स्वप्न माज़ी,
मी स्वप्नातही एकटा.
एकट्यांची ही गर्दी,
या गर्दीत मी एक एकटा...

भरल्या होत्या इथे हजार मैफ़ीली
सुर माझा कधी वाजलाच नाही
मी खेळलो कीत्येकदा रंग स्वरांचा
पण रंग माझा कुणासही लागलाच नाही...

लिहून दाखवले तरी कलले नाही,
बोलून दाखवले तरी कलले नाही,
तू त्याच्या सोबत निघून गेलीस तेव्हा कलले,
ते तुज्या पर्यंत कधी पोहचलेच नाही...

घरात काळोख शिरेल म्हणुन
मी सगळी दारं लावून बसलो
आणि स्वत:च्या खुळेपनावर
अंधारात बसून हसलो

सुंदर लाटेवर भाळून
सूर्य तिच्याकडे आकर्षला
दिवसाची खुप आश्वासन
देऊन रात्री मात्र फितूर झाला

चंद्राबरोबर चांदनी एकच असते
पण तीचं नक्की सांगता येत नाही
त्याला रोज बदलताही येइल पणतीला ते जमणार नाही

गावातले सगळे रस्ते
रात्री गावाबाहेर पडतात
मला घरीच परतायचं असतं
पण ते मला रानात नेउन सोडतात

रात्रीची जागी राहून
मी त्या चांदनिला बघत होती
ती सुद्धा माझ्याप्रमाणे
एकटीच हसत होती........

नाही म्हणाले नसले तरी
हो सुद्धा बोलले नाहीतो
विचारून थांबला तरी
मला काही सुचले नाही ....

तू सोडून जाशील म्हणुन
मी वेडी झाली होती


 

पाऊस दरवर्षी येतो, आणि चिंब भिजवून जातो.....


पाऊस दरवर्षी येतो, आणि चिंब भिजवून जातो
ती दरवर्षीच भिजते आणि त्याला आवर्जून सांगते
पाऊस दरवर्षीच येतो आणि चिंब भिजवून जातो
तो दरवर्षीच गच्चीतून पाहतो, आणि तिला लगेच कळवतो

कधीच एकत्र नाही भिजलीत ती दोघं

तरी एकत्र पहिला पाऊस अनुभवला दोघांनी मिळून
कधीच नाही पाहिला पाऊस बसून जवळ
तरी एकत्र रमलेत पावसात अदभूत जादू जणू

खूप बरसतो पाऊस दर वर्षीच, मजा वाटते तिला
दरवर्षी पावसात चिंब भिजते ती साठवते मनात त्याला
मनात तिच्या नेहमीच भिनतो पाऊस लहान ती होताना
ओठांवरती हसू पसरते डोळे बंद करून भिजताना

तो हि तिच्याच सारखा बेधुंद ह्या जगात जगताना
पाऊस आला कि हसून देतो तिची आठवण काढताना
बरसणारा पाऊस त्याला कधी हसरा कधी रागात वाटतो
अशा पावसात भिजून तो स्वतः च जग अनुभवतो

एकत्र नाही ती दोघं, तरी अडकलेत एकमेंकांत
पडला नाही पाऊस अजून तरी भिजली ती त्याच्या भासत
एकत्र नाही ती दोघं, तरी अडकलेत एकमेंकांत
पडलाच नाही परत पाऊस तर राहील का तो त्याच्याच मिटलेल्या जगात

पाऊस दरवर्षी येतो, आणि चिंब भिजवून जातो
ती दरवर्षीच भिजते आणि त्याला आवर्जून सांगते
पाऊस दरवर्षीच येतो आणि चिंब भिजवून जातो
तो दरवर्षीच गच्चीतून पाहतो, आणि तिला लगेच कळवतो