Friday, June 15, 2012

नुसताच बसलो होतो मी



नुसताच बसलो होतो मी
बराच वेळ हातात कागद-पेन घेऊन...
सुचतच नव्हते काही
मनाच्या आकाशात कधी पाऊस कधी ऊन...
शेवटी कंटाळून बाजूला ठेवून दिले कागद-पेन
आणि सरळ आठवायला घेतले तुला
तुझ हसणं आठवलं
तसे टपटपले दोन-चार शब्द कागदावर
तुझ चिडणं आठवलं
तश्या उमटून गेल्या दोन-चार ओळी
मलाही मग आला उत्साह
आठवत गेलो तुला खूप खूप...
तसे तरंगत आले चुकार शब्द
आणि बसले शहाण्यासारखे
एकेका ओळीत गुपचूप...
मग मी आठवल्या त्या कातरवेळा
ती संकेतस्थळं आणि ती चांदरात...
तसे लाजले शब्द थोडे आणि त्यांनी
लपेटले स्वत:ला वृत्त, लयी आणि यमकांत...
कागद भरुन गेला पार...
छान कविता होत होती तयार...
आता शेवटच राहिला होता फक्त
बाकी सगळं जमलं होतं मस्त
अन मला कुठुनसं आठवलं
आपलं झालेलं भांडण
तुझ्यासारखेच रुसून बसले मग शब्द
परत थोडा मागे गेलो
जुनं-जुनं आठवू लागलो
हाताला लागले काही निसटणारे क्षण
लिहिलंही मी कागदावर काहीबाही
पण ते माझं मलाच पटलं नाही...
जसं आपलं भांडण
कधी कध्धीच मिटलं नाही...
माझं मीच मग समजावलं मला
कधी कधी असं होतं
राहते एखादी कविता 'अपूर्ण'च
जसं राहून गेलंय आपलं नातं
जसं... राहून गेलंय आपलं नातं!



आजकाल मनात ती फारच डोकावत राहते



आजकाल मनात ती फारच डोकावत राहते
तिच्याबद्दल काहीतरी लिहित राहावं असं सतत वाटत राहतं
बरेचदा लिखाणात नात्यांबद्दल तिच्या मतांबद्दल लिहिणं होतं.
.न बोललेल्या ,गाभ्यातच राहिलेल्या गोष्टी..
न कळलेले अर्थ,हळुवार संवाद ,बालीशपणा,भांडणं,शाब्दिक चकमकी .. 
 असं आणि बरचं  काही..
खूप काही घडून गेलय...   ..
जे जे अनुभवलं ते ते आता आपल्या शब्दात उतरत आहे ..
आणि सोबतीने अव्यक्त भावही ...
लिहिता लिहिता असं जाणवत गेलं की प्रत्येक 
प्रसंगातून एक गोष्ट गुंफली जावू शकते..
मग त्याप्रकारे लिहणं सुरु झालाय ..
ते क्षण जगता यावे हि एक धडपड आहे ह्या लिहिण्यामागे 
...त्यांचा अर्थ लावता यावा आणि तीच भावविश्व
 जाणून घेता यावं हा प्रयत्न आहे ...
ती फक्त एक कोणी नाही  ती हि त्याच्या मनात 
असलेली एक प्रतिमा आहे...अनेक "ती"च्या  मनातून भेटलेली
अनेक अनुभवांतून उमटलेली .उमजलेली 
.. ती हि त्याची हळुवार बाजू आहे
 आजकल त्याच्या मनात ती फारच डोकावत राहते 
..म्हणून तो ,ती लिहायला लागलाय ....

डोळ्यात तिच्या मी पहिले



डोळ्यात तिच्या मी पहिले
अन क्षणात सारे बहरून गेले !
अंतर जरी पडले, तरी
मन मात्र एकमेकात कायमचे गुंतून पडले !

डोळ्यांची भाषा डोळ्यांनाच का कळते
बोल पडले कमी तरी
अंगात प्रेमाची एक लहर सळसळते

कधी कधी बोलतांना
केवळ एक नजर पुरेशी असते
अन बोलायला सुरु केला
तर अक्खी रात्र पण अपुरी पडते

हे असे का होते ?
हे असे का घडते ?
स्वप्न पाहण्या साठी सखे
झोप तरी कुठे ग येते ..

स्वप्नात पहिले जे
प्रत्यक्षात मी अनुभवतो आहे !
तिच्या आठवणींच्या सवे,
फ़क़्त तिच्याच येण्याची वाट मी पाहतो आहे !

वाट मी पाहतो आहे .........



कानावर बोल पडता तिचे...



कानावर बोल पडता तिचे
ती काळजाला स्पर्श करते,
मंद- गोड हसण्याने तिच्या
मग दोघांचेही भान हरवते

शब्दांनीच बोलावं असं काही नसते,
बोलण्यासाठी भावना ती महत्वाची असते !
तिची ती भावना, माझ्या मनाला कळते,
अन माझ्या प्रीतीने तिचे हि मन शहारते !

खळखळून हसणारी, माझी ती हसरी,
स्वप्नात देखील हसताना दिसते ..
तिचे ते हास्य टिकवण्यासाठी,
माझे हि मन मग रात्रं-दिवस एक करते !

हसता हसता कधी डोळे ओले हि होतात
काळजीने एकमेकांच्या
हळूच आसू बाहेर पडतात,
शब्द तिचे बाणासारखे ,
काळजावरती घाव करतात ..
अन जखम करून माझ्या मनाला,
शेवटी स्वतःच त्याचे दुख भोगतात

तिचे ते दुख,
मी नाही बघू शकणार
तिच्या प्रत्येक सुखासाठी
जीवाचा माझ्या रान करणार

सुखाच्या प्रत्येक स्वप्नासाठी
सये .. देशील ना ग साथ ,
साकारण्यासाठी ते प्रत्येक स्वप्न
फ़क़्त हाती हवा तुझाच हात !.. तुझाच हात ..



तुझे नी माझे नाते काय? …



तुझे नी माझे नाते काय? …
तु देणारी मी … मी घेणारा
तु घेणारी … मी देणारा
कधी न कळते रुप बदलते
चकाचे आवर्तन घडते
आपुल्यामधले फरक कोणते?
अन आपुल्यातुन समान काय ?….
तुझे नी माझे नाते काय? …
सुखदु: खाची होता व्रुष्टी
कधी हसलो, कधी झालो कष्टी
सायासाविन सहजची घडते
समेस येत टाळी पडते!
कुठल्या जन्माची लय जुळते?
य मात्रान्चे गणित काय?
तुझे नी माझे नाते काय? …


प्रेमात म्हणे कुणी हुरहुरते कुणी मोहरते राणी...



प्रेमात म्हणे कुणी हुरहुरते कुणी मोहरते राणी
प्रेमात म्हणे कुणी अडखलते बघ धडपडते कोणी!
प्रेमात म्हणे मोव्नात बुडी, ना सुते घडी ओठांची
प्रेमात म्हणे शब्दास भूल, जगान्यास जुल कवितेची
प्रेमात म्हणे जो गड़बड़तो तो बडबडतो गाणी!!
प्रेमात म्हणे हातात हात, होतात घात जन्माचे
प्रेमात म्हणे मिटतात श्वास, फिटतात पाश मरणाचे
प्रेमात म्हणे आरम्भ गोड अन अन्तापास विराणी
मज ठाव नसे हे प्रेम कसे पण ऐक तुज्याविन आता
क्षण एक दूर जाताच पुर डोळ्यात दाटती माज्या!
जो बुडालेला तो तरलेला, तरला तो बुडला, राणी!!


मन कधी फ़सत,मन कधी रुसत…



मन कधी फ़सत,मन कधी रुसत…
कुनाला हे कळत,कुणी उगाचच हसत..
हसताना मनात बरंच काही असतं…
सांगायला मात्र काही जमत नसत…
समजुन घ्यावं असं खुप वाटतं….
समजतय त्याला हेही कळत….
शब्दांच्या शोधात मन हरवत…
न बोलताच मग डोळ्यांना समजत..
गालावरच्या हसय्त उत्तर मिळतं….
पापन्यांखाली ते हळुच लपतं………
मन कधी फ़सत,मन कधी रुसत…





तिची आठवण आली कि...



तिची आठवण आली कि
मी आकाशाकडे बघतो
अन् ती दिसेल म्हणुन् उगाचच्..
तारे तुटन्यचि वाट् बघत् राहतो!
वाफ़ळत्या चहात् सुध्दा तिचाच् गन्ध् असतो..
त्या गन्धात् हरवुन्..
चहा मात्र थन्ड् होवुन् जातो!
ती समोर यायचि अन्
श्वास् श्वासत् अडकायचा
तिच्या गोड हसन्यात्…
जिव माझा कासाविस व्हायचा
मग्..
ति घाबरुन् माझा हात हाति घ्यायचि
तिच्या तप्त स्पर्शात्
मि सगळे विसरुन् जायचो!
आता मात्र तिचि आठवण आलि कि..
मि फ़क्त् माझ्याच् हाथाकडे बघतो
अन् हातावरल्या रेघामध्ये
तिच्या हातातल्या रेषा शोधतो!
तिचि आठवण् आल्यावर्….



Friday, June 15, 2012

नुसताच बसलो होतो मी



नुसताच बसलो होतो मी
बराच वेळ हातात कागद-पेन घेऊन...
सुचतच नव्हते काही
मनाच्या आकाशात कधी पाऊस कधी ऊन...
शेवटी कंटाळून बाजूला ठेवून दिले कागद-पेन
आणि सरळ आठवायला घेतले तुला
तुझ हसणं आठवलं
तसे टपटपले दोन-चार शब्द कागदावर
तुझ चिडणं आठवलं
तश्या उमटून गेल्या दोन-चार ओळी
मलाही मग आला उत्साह
आठवत गेलो तुला खूप खूप...
तसे तरंगत आले चुकार शब्द
आणि बसले शहाण्यासारखे
एकेका ओळीत गुपचूप...
मग मी आठवल्या त्या कातरवेळा
ती संकेतस्थळं आणि ती चांदरात...
तसे लाजले शब्द थोडे आणि त्यांनी
लपेटले स्वत:ला वृत्त, लयी आणि यमकांत...
कागद भरुन गेला पार...
छान कविता होत होती तयार...
आता शेवटच राहिला होता फक्त
बाकी सगळं जमलं होतं मस्त
अन मला कुठुनसं आठवलं
आपलं झालेलं भांडण
तुझ्यासारखेच रुसून बसले मग शब्द
परत थोडा मागे गेलो
जुनं-जुनं आठवू लागलो
हाताला लागले काही निसटणारे क्षण
लिहिलंही मी कागदावर काहीबाही
पण ते माझं मलाच पटलं नाही...
जसं आपलं भांडण
कधी कध्धीच मिटलं नाही...
माझं मीच मग समजावलं मला
कधी कधी असं होतं
राहते एखादी कविता 'अपूर्ण'च
जसं राहून गेलंय आपलं नातं
जसं... राहून गेलंय आपलं नातं!



आजकाल मनात ती फारच डोकावत राहते



आजकाल मनात ती फारच डोकावत राहते
तिच्याबद्दल काहीतरी लिहित राहावं असं सतत वाटत राहतं
बरेचदा लिखाणात नात्यांबद्दल तिच्या मतांबद्दल लिहिणं होतं.
.न बोललेल्या ,गाभ्यातच राहिलेल्या गोष्टी..
न कळलेले अर्थ,हळुवार संवाद ,बालीशपणा,भांडणं,शाब्दिक चकमकी .. 
 असं आणि बरचं  काही..
खूप काही घडून गेलय...   ..
जे जे अनुभवलं ते ते आता आपल्या शब्दात उतरत आहे ..
आणि सोबतीने अव्यक्त भावही ...
लिहिता लिहिता असं जाणवत गेलं की प्रत्येक 
प्रसंगातून एक गोष्ट गुंफली जावू शकते..
मग त्याप्रकारे लिहणं सुरु झालाय ..
ते क्षण जगता यावे हि एक धडपड आहे ह्या लिहिण्यामागे 
...त्यांचा अर्थ लावता यावा आणि तीच भावविश्व
 जाणून घेता यावं हा प्रयत्न आहे ...
ती फक्त एक कोणी नाही  ती हि त्याच्या मनात 
असलेली एक प्रतिमा आहे...अनेक "ती"च्या  मनातून भेटलेली
अनेक अनुभवांतून उमटलेली .उमजलेली 
.. ती हि त्याची हळुवार बाजू आहे
 आजकल त्याच्या मनात ती फारच डोकावत राहते 
..म्हणून तो ,ती लिहायला लागलाय ....

डोळ्यात तिच्या मी पहिले



डोळ्यात तिच्या मी पहिले
अन क्षणात सारे बहरून गेले !
अंतर जरी पडले, तरी
मन मात्र एकमेकात कायमचे गुंतून पडले !

डोळ्यांची भाषा डोळ्यांनाच का कळते
बोल पडले कमी तरी
अंगात प्रेमाची एक लहर सळसळते

कधी कधी बोलतांना
केवळ एक नजर पुरेशी असते
अन बोलायला सुरु केला
तर अक्खी रात्र पण अपुरी पडते

हे असे का होते ?
हे असे का घडते ?
स्वप्न पाहण्या साठी सखे
झोप तरी कुठे ग येते ..

स्वप्नात पहिले जे
प्रत्यक्षात मी अनुभवतो आहे !
तिच्या आठवणींच्या सवे,
फ़क़्त तिच्याच येण्याची वाट मी पाहतो आहे !

वाट मी पाहतो आहे .........



कानावर बोल पडता तिचे...



कानावर बोल पडता तिचे
ती काळजाला स्पर्श करते,
मंद- गोड हसण्याने तिच्या
मग दोघांचेही भान हरवते

शब्दांनीच बोलावं असं काही नसते,
बोलण्यासाठी भावना ती महत्वाची असते !
तिची ती भावना, माझ्या मनाला कळते,
अन माझ्या प्रीतीने तिचे हि मन शहारते !

खळखळून हसणारी, माझी ती हसरी,
स्वप्नात देखील हसताना दिसते ..
तिचे ते हास्य टिकवण्यासाठी,
माझे हि मन मग रात्रं-दिवस एक करते !

हसता हसता कधी डोळे ओले हि होतात
काळजीने एकमेकांच्या
हळूच आसू बाहेर पडतात,
शब्द तिचे बाणासारखे ,
काळजावरती घाव करतात ..
अन जखम करून माझ्या मनाला,
शेवटी स्वतःच त्याचे दुख भोगतात

तिचे ते दुख,
मी नाही बघू शकणार
तिच्या प्रत्येक सुखासाठी
जीवाचा माझ्या रान करणार

सुखाच्या प्रत्येक स्वप्नासाठी
सये .. देशील ना ग साथ ,
साकारण्यासाठी ते प्रत्येक स्वप्न
फ़क़्त हाती हवा तुझाच हात !.. तुझाच हात ..



तुझे नी माझे नाते काय? …



तुझे नी माझे नाते काय? …
तु देणारी मी … मी घेणारा
तु घेणारी … मी देणारा
कधी न कळते रुप बदलते
चकाचे आवर्तन घडते
आपुल्यामधले फरक कोणते?
अन आपुल्यातुन समान काय ?….
तुझे नी माझे नाते काय? …
सुखदु: खाची होता व्रुष्टी
कधी हसलो, कधी झालो कष्टी
सायासाविन सहजची घडते
समेस येत टाळी पडते!
कुठल्या जन्माची लय जुळते?
य मात्रान्चे गणित काय?
तुझे नी माझे नाते काय? …


प्रेमात म्हणे कुणी हुरहुरते कुणी मोहरते राणी...



प्रेमात म्हणे कुणी हुरहुरते कुणी मोहरते राणी
प्रेमात म्हणे कुणी अडखलते बघ धडपडते कोणी!
प्रेमात म्हणे मोव्नात बुडी, ना सुते घडी ओठांची
प्रेमात म्हणे शब्दास भूल, जगान्यास जुल कवितेची
प्रेमात म्हणे जो गड़बड़तो तो बडबडतो गाणी!!
प्रेमात म्हणे हातात हात, होतात घात जन्माचे
प्रेमात म्हणे मिटतात श्वास, फिटतात पाश मरणाचे
प्रेमात म्हणे आरम्भ गोड अन अन्तापास विराणी
मज ठाव नसे हे प्रेम कसे पण ऐक तुज्याविन आता
क्षण एक दूर जाताच पुर डोळ्यात दाटती माज्या!
जो बुडालेला तो तरलेला, तरला तो बुडला, राणी!!


मन कधी फ़सत,मन कधी रुसत…



मन कधी फ़सत,मन कधी रुसत…
कुनाला हे कळत,कुणी उगाचच हसत..
हसताना मनात बरंच काही असतं…
सांगायला मात्र काही जमत नसत…
समजुन घ्यावं असं खुप वाटतं….
समजतय त्याला हेही कळत….
शब्दांच्या शोधात मन हरवत…
न बोलताच मग डोळ्यांना समजत..
गालावरच्या हसय्त उत्तर मिळतं….
पापन्यांखाली ते हळुच लपतं………
मन कधी फ़सत,मन कधी रुसत…





तिची आठवण आली कि...



तिची आठवण आली कि
मी आकाशाकडे बघतो
अन् ती दिसेल म्हणुन् उगाचच्..
तारे तुटन्यचि वाट् बघत् राहतो!
वाफ़ळत्या चहात् सुध्दा तिचाच् गन्ध् असतो..
त्या गन्धात् हरवुन्..
चहा मात्र थन्ड् होवुन् जातो!
ती समोर यायचि अन्
श्वास् श्वासत् अडकायचा
तिच्या गोड हसन्यात्…
जिव माझा कासाविस व्हायचा
मग्..
ति घाबरुन् माझा हात हाति घ्यायचि
तिच्या तप्त स्पर्शात्
मि सगळे विसरुन् जायचो!
आता मात्र तिचि आठवण आलि कि..
मि फ़क्त् माझ्याच् हाथाकडे बघतो
अन् हातावरल्या रेघामध्ये
तिच्या हातातल्या रेषा शोधतो!
तिचि आठवण् आल्यावर्….