Friday, June 29, 2012

मन.......



मन,   कधी वाटे दवबिंदूप्रमाणे  कधी विशाल सागराप्रमाणे... 
मन,   कधी वाटे खोल दरीप्रमाणे  कधी उंच आभाळाप्रमाणे... 
मन,   कधी वाटे कर्कश ध्वनिप्रमाणे  कधी भयाण शान्ततेप्रमाणे... 
मन,   कधी वाटे लख्खे प्रकाश्म्ये  कधी  कुट्ट अंधाराप्रमाणे... 
मन हे वेडे,    कधी उडे पक्षांच्या थव्याप्रमाणे... 
                     कधी उदास होई चिमुकल्या बाळा प्रमाणे...





माहित नाही ....



आजवर अनेक कविता केल्या 

त्याहूनही जास्त वारेमाप पुसून टाकल्या
हीसुद्धा कदाचित शेवटी पुसून टाकीन
काय आहे, शब्दांचा सुद्धा येतो कंटाळा, कधी कधी 

मी अडचणीतच कविता खूप करतो,
मी एकटेपणातच खूप लिहितो, असंही नाही 
कागदही फाटतो, शाई उठत नाही
काय आहे, पेन्सीलही नाही म्हणते, कधी कधी 

शब्दांची रेलचेल बघतो आपण,
निष्पाप जीवांची घालमेल बघतो आपण
मन हेलावताना कोंबडी खातो आपण 
काय आहे, कशातच अर्थ नसतो , कधी कधी


तुम्हाला सगळ्या कविता आयुष्याबद्दलच हव्या,
कविता करताना मनाला वेदनाच हव्या 
प्रखर,गंभीर, रसपूर्ण शब्दांची मोहिनी सुद्धा हवी, पण
काय आहे, देवही अमृताऐवजी चहा घेतो कधी कधी 

प्रेमात कवितेच्या कळ्या होतात, वैराग्यात ती फुलते 
धुंदीत कविता दिसते, शुद्धीत तिचं स्तोत्र बनतं, पण 
वेदनेत कविता साधळते आणि मृत्यूत कविताच गोठते 
हे सारं सारं नकोसं वाटतंही , कधी कधी



 

आठवणींच्या आरश्यात जेव्हा ….

डोळ्यांतून पाण्याचे थेंब पडतात ….

त्या हलत्या आरशात मला ….

माझे दोन दोन चेहरे दिसतात ….

अश्रू होते का पाऊस ….

हे ओळखणेही अवघड जाते ….

अश्रू काय आणि पाऊस काय ….

पाहणार्याला दोन्ही सारखेच असते ….

बर्याचदा तुझ्या आठवणी ….

पावलं न वाजवताच येतात ….

जाताना मात्र मनाच्या रस्त्यात ….

तुझ्या पावलांचे ठसे मागे सोडून जातात ….

अवेळी आलेला पाउसही ….

सगळं उध्वस्त करतो ….

भर दुपारी भरल्या ढगांनी ….

काळोखी संध्याकाळ करतो ….




भरपूर मोठ्या रस्त्या वरून चाललोय …

 
 
भरपूर मोठ्या रस्त्या वरून चाललोय …
सोबती मात्र कोणी नाही ….

कुठेतरी शेवट असेल म्हणून चाललोय ….
पायांत ताकात मात्र अजिबात राहिली नाही ….

आयुष्य बाकी आहे म्हणून जगतोय ….
जगायची इच्छा मात्र राहिली नाही ….

मित्र आहेत …. बरेच आहेत …
मैत्री मात्र राहिली नाही ….

प्रेमात पडलोय म्हणून प्रेम आहे ….
प्रेमावर विश्वास मात्र राहिलेला नाही …

नाती आहेत म्हणून नातेवाईक आहेत …
नात्यांतले संबंध मात्र राहिले नाही ….

घड्यालाहे म्हणून time आहे ….
वेळ मात्र कोणाकडेच राहिला नाही …

मंदिर आहे म्हणून देव आहे ….
देवावर विश्वास मात्र राहिलेला नाही ….

दोन पायांवर चालतो म्हणून माणूस आहे …
माणुसकी मात्र राहिलेली नाही….




Friday, June 29, 2012

मन.......



मन,   कधी वाटे दवबिंदूप्रमाणे  कधी विशाल सागराप्रमाणे... 
मन,   कधी वाटे खोल दरीप्रमाणे  कधी उंच आभाळाप्रमाणे... 
मन,   कधी वाटे कर्कश ध्वनिप्रमाणे  कधी भयाण शान्ततेप्रमाणे... 
मन,   कधी वाटे लख्खे प्रकाश्म्ये  कधी  कुट्ट अंधाराप्रमाणे... 
मन हे वेडे,    कधी उडे पक्षांच्या थव्याप्रमाणे... 
                     कधी उदास होई चिमुकल्या बाळा प्रमाणे...





माहित नाही ....



आजवर अनेक कविता केल्या 

त्याहूनही जास्त वारेमाप पुसून टाकल्या
हीसुद्धा कदाचित शेवटी पुसून टाकीन
काय आहे, शब्दांचा सुद्धा येतो कंटाळा, कधी कधी 

मी अडचणीतच कविता खूप करतो,
मी एकटेपणातच खूप लिहितो, असंही नाही 
कागदही फाटतो, शाई उठत नाही
काय आहे, पेन्सीलही नाही म्हणते, कधी कधी 

शब्दांची रेलचेल बघतो आपण,
निष्पाप जीवांची घालमेल बघतो आपण
मन हेलावताना कोंबडी खातो आपण 
काय आहे, कशातच अर्थ नसतो , कधी कधी


तुम्हाला सगळ्या कविता आयुष्याबद्दलच हव्या,
कविता करताना मनाला वेदनाच हव्या 
प्रखर,गंभीर, रसपूर्ण शब्दांची मोहिनी सुद्धा हवी, पण
काय आहे, देवही अमृताऐवजी चहा घेतो कधी कधी 

प्रेमात कवितेच्या कळ्या होतात, वैराग्यात ती फुलते 
धुंदीत कविता दिसते, शुद्धीत तिचं स्तोत्र बनतं, पण 
वेदनेत कविता साधळते आणि मृत्यूत कविताच गोठते 
हे सारं सारं नकोसं वाटतंही , कधी कधी



 

आठवणींच्या आरश्यात जेव्हा ….

डोळ्यांतून पाण्याचे थेंब पडतात ….

त्या हलत्या आरशात मला ….

माझे दोन दोन चेहरे दिसतात ….

अश्रू होते का पाऊस ….

हे ओळखणेही अवघड जाते ….

अश्रू काय आणि पाऊस काय ….

पाहणार्याला दोन्ही सारखेच असते ….

बर्याचदा तुझ्या आठवणी ….

पावलं न वाजवताच येतात ….

जाताना मात्र मनाच्या रस्त्यात ….

तुझ्या पावलांचे ठसे मागे सोडून जातात ….

अवेळी आलेला पाउसही ….

सगळं उध्वस्त करतो ….

भर दुपारी भरल्या ढगांनी ….

काळोखी संध्याकाळ करतो ….




भरपूर मोठ्या रस्त्या वरून चाललोय …

 
 
भरपूर मोठ्या रस्त्या वरून चाललोय …
सोबती मात्र कोणी नाही ….

कुठेतरी शेवट असेल म्हणून चाललोय ….
पायांत ताकात मात्र अजिबात राहिली नाही ….

आयुष्य बाकी आहे म्हणून जगतोय ….
जगायची इच्छा मात्र राहिली नाही ….

मित्र आहेत …. बरेच आहेत …
मैत्री मात्र राहिली नाही ….

प्रेमात पडलोय म्हणून प्रेम आहे ….
प्रेमावर विश्वास मात्र राहिलेला नाही …

नाती आहेत म्हणून नातेवाईक आहेत …
नात्यांतले संबंध मात्र राहिले नाही ….

घड्यालाहे म्हणून time आहे ….
वेळ मात्र कोणाकडेच राहिला नाही …

मंदिर आहे म्हणून देव आहे ….
देवावर विश्वास मात्र राहिलेला नाही ….

दोन पायांवर चालतो म्हणून माणूस आहे …
माणुसकी मात्र राहिलेली नाही….