आज पुन्हा एकदा पंख लावुन,
आभाळात उंच उडावसं वाटतंय,
आज आतुन मन हसत असलं तरी,
उगीचंच कुणावर तरी चिडावसं वाटतंय.....
का होतं असं कुणी सांगेल का...?
आभाळातील ईंद्रधनु रंगेल का...?
हे कुणाला तरी विचारावसं वाटतंय,
कुणाच्या तरी गळ्यात पडून,
मनसोक्त रडावसं वाटतंय.........
आज खुप दिवसांनी बहरलेय मी,
का कुणास ठाऊक पण,
त्याच्या आठवणींनी शहारलेय मी,
हे कुणाला तरी सांगावसं वाटतंय,
आज पुन्हा एकदा राहुन राहुन,
माझं मलाच चिडवावसं वाटतंय......
बावरलेल्या मनाने चहुकडे पाहतेय मी,
आज न राहुन स्वतःच लाजतेय मी,
हितगुज माझ्या मनाशीच करावसं वाटतंय,
आज आभाळाकडे तोंड करुन,
आनंदाने ओरडावसं वाटतंय..........
ऐन वसंतातल्या त्या बेधुंद रात्री,
पावसाची एक जोरदार सर आली,
ऋतुराजाच्या त्या अवचित आगमनाने,
रातराणी ही बेभान झाली.....
अवखळ वारा ही होता संगतीला,
प्राजक्ताचा गंध ही होता पंगतीला,
आसमंत ही कसा बहरून आला,
सुटला दरवळ ओल्या मातीला.....
आकाशीचा चंद्रमा ही,
हसत होता गाली,
चांदणीच्या ही मुखकमलावर,
फुटली होती लाली,
निसर्गाचा हा अनोखा खेळ पहात,
झाडावरची पाखरं ही चिडीचुप झाली.....
तशातच ती,
त्याच्या हाताला धरुन,
आडोसा शोधीत होती,
पावसाच्या अवचित कोसळण्याने,
दोघंही चिंब भिजत होती,
त्याची चोरटी नजर,
तिच्या चेहर्यावर खिळली,
तिच्या केसांतली एक ओली बट,
तिच्या नाजुक गालाशी झोंबत होती.....
मग तोही जरासा बावरला,
तिने ही ढळणारा पदर सावरला,
ती दोघंही मग,
प्रितीची वाट चालू लागली,
कोकिळही बेभानपणे,
मस्त शीळ घालू लागली.....
ऐन वसंतातली ती रात्र,
कशी बेधुंद झाली होती,
त्या प्रेमिकांच्या मनातली,
दरी ही अरुंद झाली होती,
अवखळ वारा आता कसा,
बेधुंद,बेलगाम झाला होता,
अन ओली माती सुगंधाने,
कशी स्वच्छंद न्हाली होती.......
मी त्याचीच होती पण....
मीही प्रेम केले होते त्याच्यावर,
पण त्याला ते ओळखताच आले नाही,
मी तर नेहमी त्याचीच होती,
पण त्यालाच माझे होता आले नाही......
माझ्या मनातील खरे प्रेम,
त्याला कधी पाहताच आले नाही,
डोळ्यांसमोरून दूर केला तरी,
मनातून त्याला काढताच आले नाही......
त्याचा विरहाचा दु:खातून,
अजूनही बाहेर पडता आले नाही......
खूप प्रयत्न करून देखील,
त्याला विसरताच आले नाही.......
तो सोडून गेला तरी,
मला त्याला सोडताच आले,
चार चैघात मला कधीच,
मनमोकळे हसताच आले नाही.......
सात पावलेही आज त्याला,
माझाबरोबर चालता आले नाही.....,
सात जन्माचा जोडीदार ज्याला मानले,
त्याला या एका जन्मांत सुधा माझे होता आले नाही.......
निर्णय चुकतात आयुष्यातले आणि मग आयुष्याच चुकत जाते ..
प्रश्न कळत नाही कधी कधी आणि उत्तरही चुकत जाते ..
सोडवताना वाटते , सुटत गेला गुंता .....
पण प्रत्येक वेळी 1 नवीन गाठ बनत जाते..
दाखवणाऱ्याला वाट माहित नसते ..
चालानार्याचे ध्येय मात्र हरवून जाते..
वाटतात तितक्या सोप्या नसतात काही गोष्टी ..
"अनुभव"म्हणजे काय हे तेव्हाच कळते...!!
जेव्हा एखादी"ठेच"काळजाला लागते ...
आज पुन्हा एकदा पंख लावुन,
आभाळात उंच उडावसं वाटतंय,
आज आतुन मन हसत असलं तरी,
उगीचंच कुणावर तरी चिडावसं वाटतंय.....
का होतं असं कुणी सांगेल का...?
आभाळातील ईंद्रधनु रंगेल का...?
हे कुणाला तरी विचारावसं वाटतंय,
कुणाच्या तरी गळ्यात पडून,
मनसोक्त रडावसं वाटतंय.........
आज खुप दिवसांनी बहरलेय मी,
का कुणास ठाऊक पण,
त्याच्या आठवणींनी शहारलेय मी,
हे कुणाला तरी सांगावसं वाटतंय,
आज पुन्हा एकदा राहुन राहुन,
माझं मलाच चिडवावसं वाटतंय......
बावरलेल्या मनाने चहुकडे पाहतेय मी,
आज न राहुन स्वतःच लाजतेय मी,
हितगुज माझ्या मनाशीच करावसं वाटतंय,
आज आभाळाकडे तोंड करुन,
आनंदाने ओरडावसं वाटतंय..........
ऐन वसंतातल्या त्या बेधुंद रात्री,
पावसाची एक जोरदार सर आली,
ऋतुराजाच्या त्या अवचित आगमनाने,
रातराणी ही बेभान झाली.....
अवखळ वारा ही होता संगतीला,
प्राजक्ताचा गंध ही होता पंगतीला,
आसमंत ही कसा बहरून आला,
सुटला दरवळ ओल्या मातीला.....
आकाशीचा चंद्रमा ही,
हसत होता गाली,
चांदणीच्या ही मुखकमलावर,
फुटली होती लाली,
निसर्गाचा हा अनोखा खेळ पहात,
झाडावरची पाखरं ही चिडीचुप झाली.....
तशातच ती,
त्याच्या हाताला धरुन,
आडोसा शोधीत होती,
पावसाच्या अवचित कोसळण्याने,
दोघंही चिंब भिजत होती,
त्याची चोरटी नजर,
तिच्या चेहर्यावर खिळली,
तिच्या केसांतली एक ओली बट,
तिच्या नाजुक गालाशी झोंबत होती.....
मग तोही जरासा बावरला,
तिने ही ढळणारा पदर सावरला,
ती दोघंही मग,
प्रितीची वाट चालू लागली,
कोकिळही बेभानपणे,
मस्त शीळ घालू लागली.....
ऐन वसंतातली ती रात्र,
कशी बेधुंद झाली होती,
त्या प्रेमिकांच्या मनातली,
दरी ही अरुंद झाली होती,
अवखळ वारा आता कसा,
बेधुंद,बेलगाम झाला होता,
अन ओली माती सुगंधाने,
कशी स्वच्छंद न्हाली होती.......
मी त्याचीच होती पण....
मीही प्रेम केले होते त्याच्यावर,
पण त्याला ते ओळखताच आले नाही,
मी तर नेहमी त्याचीच होती,
पण त्यालाच माझे होता आले नाही......
माझ्या मनातील खरे प्रेम,
त्याला कधी पाहताच आले नाही,
डोळ्यांसमोरून दूर केला तरी,
मनातून त्याला काढताच आले नाही......
त्याचा विरहाचा दु:खातून,
अजूनही बाहेर पडता आले नाही......
खूप प्रयत्न करून देखील,
त्याला विसरताच आले नाही.......
तो सोडून गेला तरी,
मला त्याला सोडताच आले,
चार चैघात मला कधीच,
मनमोकळे हसताच आले नाही.......
सात पावलेही आज त्याला,
माझाबरोबर चालता आले नाही.....,
सात जन्माचा जोडीदार ज्याला मानले,
त्याला या एका जन्मांत सुधा माझे होता आले नाही.......
निर्णय चुकतात आयुष्यातले आणि मग आयुष्याच चुकत जाते ..
प्रश्न कळत नाही कधी कधी आणि उत्तरही चुकत जाते ..
सोडवताना वाटते , सुटत गेला गुंता .....
पण प्रत्येक वेळी 1 नवीन गाठ बनत जाते..
दाखवणाऱ्याला वाट माहित नसते ..
चालानार्याचे ध्येय मात्र हरवून जाते..
वाटतात तितक्या सोप्या नसतात काही गोष्टी ..
"अनुभव"म्हणजे काय हे तेव्हाच कळते...!!
जेव्हा एखादी"ठेच"काळजाला लागते ...