Tuesday, January 17, 2012

प्रारब्धापेक्षा प्रयत्न श्रेष्ठ

प्रारब्धापेक्षा प्रयत्न श्रेष्ठ

प्रयत्नवाद म्हणजे यशस्वी जीवनाची गुरुकिल्ली आहे. अनेकदा अपयशी माणसे अपयशाचे खापर प्रारब्धाच्या माथी फोडतात. समर्थांना हे मान्य नाही. ते प्रयत्नालाच परमेश्वर मानतात. उलट दैववादी माणसाची कानउघाडणी करताना ते म्हणतात –

“अचूक येत्न करवेना । म्हणौन केले ते सजेना ।
आपला अवगुण जाणवेना । काही केल्या ॥
भाग्यासी काय उणे रे । यत्नावाचून राहिले ।
यत्न तो देव जाणावा । अंतरी धरिता बरे ॥“

दुबळी माणसे ज्योतिषाकडे जातात आणि नसलेली साडेसाती मागे लावून घेतात. जो भविष्य सांगतो, त्याच्याकडे जाण्यापेक्षा जो भविष्य घडवतो त्याची कास धरावी. अनेकदा मोठेमोठे उद्योगपती कुठल्यातरी ज्योतिष्याच्या नादी लागलेले पाहायला मिळतात. काहीजण धंद्यात यश मिळावे म्हणून एखाद्या महाराजाच्या नादी लागतात. या बाबतीत समर्थांची भूमिका अत्यंत परखड आणि सडेतोड आहे. यश मिळाल्यानंतर त्याचे श्रेय भगवंताला किंवा एखाद्या सत्पुरुषाला अर्पण करावे. परंतु यश मिळावे म्हणून कुणाला साकडे घालू नये. समर्थ म्हणतात की, कष्ट केल्याशिवाय जीवनात यश मिळणार नाही. प्रयत्नाच्या साहाय्याने माणूस हातावरल्या रेषासुध्दा बदलू शकतो. ते म्हणतात –

“रेखा तितुकी पुसोन जाते । प्रत्यक्ष प्रत्ययास येते ।
डोळे झांकणी करावे ते । काये निमित्त ॥
घालून अकलेचा पवाड । व्हावे ब्रह्मांडाहून जाड ।
तेथे कैचे आणले द्वाड । करंटपण ॥“

बिटको टूथ पावडरचे मालक चव्हाण तरुणपणी अत्यंत गरीब होते. दोन वेळेच्या जेवणाची मारामार होती. अंगावर पुरेसे कपडे नव्हते. त्यांनी दंतमंजन विक्रीचा व्यवसाय सुरु केला. प्रारंभी सायकलवरुन घरोघर टूथ पावडर नेऊन विकत. आज नाशिक शहरात बिटकोंच्या नावाच्या अनेक संस्था आहेत. चव्हाण यांनी मिळालेले यश देणगीरुपाने समाजात वाटले. कै. कमलाकर वालावलकर रावसाहेब गोगटेंसारख्या अनेक उद्योगपतींची चरित्रं वाचण्यासारखी आहेत. अखंड परिश्रमातून त्यांनी यश संपादन केले. याउलट दुसर्‍या किंवा तिसर्‍या पिढीत व्यसनाधीनता वाढल्यामुळे तेच उद्योगसमूह रसातळाला गेले. म्हणून अखंड सावधानता आणि अविश्रांत परिश्रम यांची नितांत गरज आहे.

No comments:

Post a Comment

Tuesday, January 17, 2012

प्रारब्धापेक्षा प्रयत्न श्रेष्ठ

प्रारब्धापेक्षा प्रयत्न श्रेष्ठ

प्रयत्नवाद म्हणजे यशस्वी जीवनाची गुरुकिल्ली आहे. अनेकदा अपयशी माणसे अपयशाचे खापर प्रारब्धाच्या माथी फोडतात. समर्थांना हे मान्य नाही. ते प्रयत्नालाच परमेश्वर मानतात. उलट दैववादी माणसाची कानउघाडणी करताना ते म्हणतात –

“अचूक येत्न करवेना । म्हणौन केले ते सजेना ।
आपला अवगुण जाणवेना । काही केल्या ॥
भाग्यासी काय उणे रे । यत्नावाचून राहिले ।
यत्न तो देव जाणावा । अंतरी धरिता बरे ॥“

दुबळी माणसे ज्योतिषाकडे जातात आणि नसलेली साडेसाती मागे लावून घेतात. जो भविष्य सांगतो, त्याच्याकडे जाण्यापेक्षा जो भविष्य घडवतो त्याची कास धरावी. अनेकदा मोठेमोठे उद्योगपती कुठल्यातरी ज्योतिष्याच्या नादी लागलेले पाहायला मिळतात. काहीजण धंद्यात यश मिळावे म्हणून एखाद्या महाराजाच्या नादी लागतात. या बाबतीत समर्थांची भूमिका अत्यंत परखड आणि सडेतोड आहे. यश मिळाल्यानंतर त्याचे श्रेय भगवंताला किंवा एखाद्या सत्पुरुषाला अर्पण करावे. परंतु यश मिळावे म्हणून कुणाला साकडे घालू नये. समर्थ म्हणतात की, कष्ट केल्याशिवाय जीवनात यश मिळणार नाही. प्रयत्नाच्या साहाय्याने माणूस हातावरल्या रेषासुध्दा बदलू शकतो. ते म्हणतात –

“रेखा तितुकी पुसोन जाते । प्रत्यक्ष प्रत्ययास येते ।
डोळे झांकणी करावे ते । काये निमित्त ॥
घालून अकलेचा पवाड । व्हावे ब्रह्मांडाहून जाड ।
तेथे कैचे आणले द्वाड । करंटपण ॥“

बिटको टूथ पावडरचे मालक चव्हाण तरुणपणी अत्यंत गरीब होते. दोन वेळेच्या जेवणाची मारामार होती. अंगावर पुरेसे कपडे नव्हते. त्यांनी दंतमंजन विक्रीचा व्यवसाय सुरु केला. प्रारंभी सायकलवरुन घरोघर टूथ पावडर नेऊन विकत. आज नाशिक शहरात बिटकोंच्या नावाच्या अनेक संस्था आहेत. चव्हाण यांनी मिळालेले यश देणगीरुपाने समाजात वाटले. कै. कमलाकर वालावलकर रावसाहेब गोगटेंसारख्या अनेक उद्योगपतींची चरित्रं वाचण्यासारखी आहेत. अखंड परिश्रमातून त्यांनी यश संपादन केले. याउलट दुसर्‍या किंवा तिसर्‍या पिढीत व्यसनाधीनता वाढल्यामुळे तेच उद्योगसमूह रसातळाला गेले. म्हणून अखंड सावधानता आणि अविश्रांत परिश्रम यांची नितांत गरज आहे.

No comments:

Post a Comment