Wednesday, July 4, 2012

कंटाळा यावा इतका उत्साह


कंटाळा यावा इतका उत्साह
कुणाला आहे? कंटाळ्याचाही आता
कंटाळा आला आहे ही लाजत लाजत
हसते ती केस विंचरत बघते
प्रत्येक कुटुंबाचा मी अर्धा
घरवाला आहे मृत्यूचा खमंग
दरवळ हृदयाला पाणी सुटले
सध्याचे जीवन म्हणजे नुसताच
मसाला आहे रस्त्यावर
अस्तित्वाला मी कडेकडेने
नेतो हा पुढे निघाला आहे तो
पुढे निघाला आहे बघ मदिरा खराब
आहे हे सांगण्यास आला हा ही
गोष्ट वेगळी आहे की नशेत आला
आहे हा कविकट्ट्यावर 'गेला' तो
कविकट्ट्यावर 'गेला' गेलोही
असतो मीही पण वेळ कुणाला आहे
ठरवाच 'सभी' कुलकर्णी की कुठे
बघावे आता इकडे मधुबाला आहे
तिकडे मधुशाला आहे लाचार
धोरणे तुमची गोत्यात आणती
तुम्हा माझ्याशी वैर धरे तो
मासाच बुडाला आहे ती चामर
वृत्तावरती पाऊल उचलते हल्ली
बघतात लोक हा मुद्दा नुकताच
कळाला आहे होकारार्थी
हलणार्‍या लोकांच्या माना
सार्‍या एकाला समजत नाही हा
काय म्हणाला आहे या दोनच
प्रश्नांवरती मी जन्म खर्चले
लाखो ही दुनिया का आहे अन
'बेफिकिर' कशाला आहे

पायांना मी, कुठे जायचे कधीच


पायांना मी, कुठे जायचे कधीच
सांगत नाही तुडवत जातो रस्ते,
शोध तरीही संपत नाही... इतक्या
वर्षांनंतर तू मागतोस माफी
आता? जखमा भरती काळासोबत, ठणके
संपत नाही! तू आल्यावर, भिंती
फुलती, घर गंधांनी सजते तुझिया
अस्तित्त्वाची जादू मजला
उमगत नाही! स्वप्नांच्या त्या
गावी मजला फिरता यावे, म्हणुनि
मनातली मी कुठली अडगळ कधीच
फेकत नाही! प्रकाश नुस्ता...
प्रकाश... तुजला व्यक्त करावे
कैसे पाहत बसतो तुला एकटक...
कुणास सांगत नाही.

पाहते तुज पाहते लाजते मी


पाहते तुज पाहते लाजते मी
लाजते भावगंधित होउनी भाळते
मी भाळते मोहरून शहारती
अंगअंगीची पिसे काननी
मयुरासवे नाचते मी नाचते
फूलही उमलून देई मनाला पावती
पाखरू चुचकारते, हासते मी
हासते चंद्रकोर उजाडुनी रात
ना जावो कधी कोवळ्या
किरणांतुनी भारते मी भारते
बासरी कुठुनी बरे सूर छेडी
लाघवी कुंद धुंद सुरावरी
डोलते हिंडोलते सागरावर लाट
येता मनासी वाटते अर्पुनी
अवघे स्वत: वाहते मी वाहते
सांजवेळ किनारली, कृष्णवेडी
सावली दीप मी चरणी तुझ्या
लावते, ओवाळते अंतरी नयनातुनी
पाहिले रे मी तुला राजसा तव
मीलना, धावते मी धावते

देशील मला तू अश्रू.... मज हे


देशील मला तू अश्रू.... मज हे
ठावुक नव्हते मी हसतच दु:ख
पचवले, तुला हे जमले नसते मी
सजवित होतो स्वप्नं जरी
माझ्या भवताली जे स्वप्नं
जयाचे असते, ते तर त्याला
मिळते मी एक-एक टाक्याने
विणले, वस्त्र मनाचे उशीराच
कळाले, काळ लोटता रेशीम विरते
तू तुला विसरुनी गेलीस
परदेशात युगांच्या ये पुन्हा
परतुनी, गाव तुझे अजुनी तळमळते
हा छंद तुझा ना तुला कुठेही
पोहचवणारा अन् मार्ग संपता,
आयुष्य रेंगाळत बसते
पाऊलखुणा ज्या सोडून आलो आपण
मागे दे लक्ष जरा, ती वाट रोज
बोलावत असते ये फिरुन मनाच्या
पारावरती पुन्हा एकदा
किलबिलाटात ही मैफल
आयुष्याची सजते

Wednesday, July 4, 2012

कंटाळा यावा इतका उत्साह


कंटाळा यावा इतका उत्साह
कुणाला आहे? कंटाळ्याचाही आता
कंटाळा आला आहे ही लाजत लाजत
हसते ती केस विंचरत बघते
प्रत्येक कुटुंबाचा मी अर्धा
घरवाला आहे मृत्यूचा खमंग
दरवळ हृदयाला पाणी सुटले
सध्याचे जीवन म्हणजे नुसताच
मसाला आहे रस्त्यावर
अस्तित्वाला मी कडेकडेने
नेतो हा पुढे निघाला आहे तो
पुढे निघाला आहे बघ मदिरा खराब
आहे हे सांगण्यास आला हा ही
गोष्ट वेगळी आहे की नशेत आला
आहे हा कविकट्ट्यावर 'गेला' तो
कविकट्ट्यावर 'गेला' गेलोही
असतो मीही पण वेळ कुणाला आहे
ठरवाच 'सभी' कुलकर्णी की कुठे
बघावे आता इकडे मधुबाला आहे
तिकडे मधुशाला आहे लाचार
धोरणे तुमची गोत्यात आणती
तुम्हा माझ्याशी वैर धरे तो
मासाच बुडाला आहे ती चामर
वृत्तावरती पाऊल उचलते हल्ली
बघतात लोक हा मुद्दा नुकताच
कळाला आहे होकारार्थी
हलणार्‍या लोकांच्या माना
सार्‍या एकाला समजत नाही हा
काय म्हणाला आहे या दोनच
प्रश्नांवरती मी जन्म खर्चले
लाखो ही दुनिया का आहे अन
'बेफिकिर' कशाला आहे

पायांना मी, कुठे जायचे कधीच


पायांना मी, कुठे जायचे कधीच
सांगत नाही तुडवत जातो रस्ते,
शोध तरीही संपत नाही... इतक्या
वर्षांनंतर तू मागतोस माफी
आता? जखमा भरती काळासोबत, ठणके
संपत नाही! तू आल्यावर, भिंती
फुलती, घर गंधांनी सजते तुझिया
अस्तित्त्वाची जादू मजला
उमगत नाही! स्वप्नांच्या त्या
गावी मजला फिरता यावे, म्हणुनि
मनातली मी कुठली अडगळ कधीच
फेकत नाही! प्रकाश नुस्ता...
प्रकाश... तुजला व्यक्त करावे
कैसे पाहत बसतो तुला एकटक...
कुणास सांगत नाही.

पाहते तुज पाहते लाजते मी


पाहते तुज पाहते लाजते मी
लाजते भावगंधित होउनी भाळते
मी भाळते मोहरून शहारती
अंगअंगीची पिसे काननी
मयुरासवे नाचते मी नाचते
फूलही उमलून देई मनाला पावती
पाखरू चुचकारते, हासते मी
हासते चंद्रकोर उजाडुनी रात
ना जावो कधी कोवळ्या
किरणांतुनी भारते मी भारते
बासरी कुठुनी बरे सूर छेडी
लाघवी कुंद धुंद सुरावरी
डोलते हिंडोलते सागरावर लाट
येता मनासी वाटते अर्पुनी
अवघे स्वत: वाहते मी वाहते
सांजवेळ किनारली, कृष्णवेडी
सावली दीप मी चरणी तुझ्या
लावते, ओवाळते अंतरी नयनातुनी
पाहिले रे मी तुला राजसा तव
मीलना, धावते मी धावते

देशील मला तू अश्रू.... मज हे


देशील मला तू अश्रू.... मज हे
ठावुक नव्हते मी हसतच दु:ख
पचवले, तुला हे जमले नसते मी
सजवित होतो स्वप्नं जरी
माझ्या भवताली जे स्वप्नं
जयाचे असते, ते तर त्याला
मिळते मी एक-एक टाक्याने
विणले, वस्त्र मनाचे उशीराच
कळाले, काळ लोटता रेशीम विरते
तू तुला विसरुनी गेलीस
परदेशात युगांच्या ये पुन्हा
परतुनी, गाव तुझे अजुनी तळमळते
हा छंद तुझा ना तुला कुठेही
पोहचवणारा अन् मार्ग संपता,
आयुष्य रेंगाळत बसते
पाऊलखुणा ज्या सोडून आलो आपण
मागे दे लक्ष जरा, ती वाट रोज
बोलावत असते ये फिरुन मनाच्या
पारावरती पुन्हा एकदा
किलबिलाटात ही मैफल
आयुष्याची सजते