Saturday, January 26, 2013

अशी ये....

अशी ये....
वा-याच्या वेगानी ये, धुंदीत मस्तीत ये
केस मोकळे सोडून सुस्नात होऊन ये
श्वासात अत्तराचा दरवळ घेऊन ये
ओठात बत्तासा, स्पर्शात साय घेऊन ये
सळसळत्या जिभेवर मधाची धार घेऊन ये
आसुसल्या ओठात थरथर घेऊन ये
अंगावर शहारा आणि फुललेला काटा घेऊन ये
थोडी लाजाळूच्या पानाची लाज घेऊन ये
मखमली शालूत निळं मोरपिस घेऊन ये
अंगभर रातराणीचा सुगंध शिंपडून ये
विचारात विजेची चपळाई घेऊन ये
बोटात कलाकाराची सहजता घेऊन ये
कित्त्येक दिवसात माझ्या जवळ तू आलीच
नाहीस
'कविते' यायचंच असेल तर निदान
माझ्या मनाप्रमाणे तरी ये :)

बोलण्यासारखे खुप आहे

बोलण्यासारखे खुप आहे,
सांगण्यासारखे काहीच नाही;
करण्यासारखे खुप आहे,
होण्यासारखे काहीच नाही….....

कधी माझ्या डोळ्यात,
खोलवर बघुन पहा;
सोसण्यासारखे खुप आहे,
दुखण्यासारखे काहीच नाही…..

उभा रहा आरशासमोर,
न्याहाळ स्वतःचे प्रतिबिंब;
मी दिसले नाही तुला तर,
बघण्यासारखे काहीच नाही…..

तुला नेहमीच वाटत असेल,
मी तुझ्यावर प्रेम का करावं ते;
समजण्यासारखे खुप आहे,
कळण्यास अवघड काहीच नाही…..

माझ्या नेत्रांतील आसवांची,
तुला काय किंमत;
मानले तर अमृताचे थेंब आहेत,
नुसते पाहिलेस तर काहीच नाहीत.

๑♥๑ वैभव ๑♥๑

आयुष्यात खूप माणसे भेटतात

आयुष्यात खूप माणसे भेटतात,
वा-याच्या झुळुके प्रमाणे येतात

आणि जातात.
पण काही अशी असतात,
जी मनात जागा घेतात.

हीच गोड माणसे
जीवनाचा अर्थ सांगतात.
ओठांवर हसू खुलवतात

आणि अश्रुही पुसतात.
कधी हक्काने चेष्टा-
मस्करी करतात,

तर कधी मध्येच
भावनिक होतात.

पण तीच माणसे
अशी असतात,

जी या जगात
आपली असतात.


डोळ्यातील अश्रू पडतात...


डोळ्यातील अश्रू पडतात...
.
डोळ्यातील अश्रू पडतात...
तेव्हा त्यांचा आवाज होत नाहि..
.
याचा अर्थ असा नाहि की..
...तु दुरावल्यावर मला दुःख होत नाहि..
.
शब्दांनाहि कोड पडावं..
अशीही काही माणस असतात..
.
किती आपलं भाग्य असत..
जेव्हा ती आपली असतात..
.
कुणीच आपल नसतं.
मग आपण कुणासाठी असतो.
.
आपलं हे क्षणिक समाधान.
इथ प्रत्येक जण एकटा असतो...
.
डहाळीवरूण ओथंबणारे पावसाचे थेंब..
उगाचच का अडकून बसतात..
.
काहि क्षण फ़ाद्यांशी नातं जोडून..
किती निष्ठूरपणे सोडून जातात...
.
नजरेत जे सामर्थ्य आहे..
ते शब्दांना कसे मिळणार..
.
पण प्रेमात पडल्याशिवाय..
ते तुम्हाला कस कळणार..




Saturday, January 26, 2013

अशी ये....

अशी ये....
वा-याच्या वेगानी ये, धुंदीत मस्तीत ये
केस मोकळे सोडून सुस्नात होऊन ये
श्वासात अत्तराचा दरवळ घेऊन ये
ओठात बत्तासा, स्पर्शात साय घेऊन ये
सळसळत्या जिभेवर मधाची धार घेऊन ये
आसुसल्या ओठात थरथर घेऊन ये
अंगावर शहारा आणि फुललेला काटा घेऊन ये
थोडी लाजाळूच्या पानाची लाज घेऊन ये
मखमली शालूत निळं मोरपिस घेऊन ये
अंगभर रातराणीचा सुगंध शिंपडून ये
विचारात विजेची चपळाई घेऊन ये
बोटात कलाकाराची सहजता घेऊन ये
कित्त्येक दिवसात माझ्या जवळ तू आलीच
नाहीस
'कविते' यायचंच असेल तर निदान
माझ्या मनाप्रमाणे तरी ये :)

बोलण्यासारखे खुप आहे

बोलण्यासारखे खुप आहे,
सांगण्यासारखे काहीच नाही;
करण्यासारखे खुप आहे,
होण्यासारखे काहीच नाही….....

कधी माझ्या डोळ्यात,
खोलवर बघुन पहा;
सोसण्यासारखे खुप आहे,
दुखण्यासारखे काहीच नाही…..

उभा रहा आरशासमोर,
न्याहाळ स्वतःचे प्रतिबिंब;
मी दिसले नाही तुला तर,
बघण्यासारखे काहीच नाही…..

तुला नेहमीच वाटत असेल,
मी तुझ्यावर प्रेम का करावं ते;
समजण्यासारखे खुप आहे,
कळण्यास अवघड काहीच नाही…..

माझ्या नेत्रांतील आसवांची,
तुला काय किंमत;
मानले तर अमृताचे थेंब आहेत,
नुसते पाहिलेस तर काहीच नाहीत.

๑♥๑ वैभव ๑♥๑

आयुष्यात खूप माणसे भेटतात

आयुष्यात खूप माणसे भेटतात,
वा-याच्या झुळुके प्रमाणे येतात

आणि जातात.
पण काही अशी असतात,
जी मनात जागा घेतात.

हीच गोड माणसे
जीवनाचा अर्थ सांगतात.
ओठांवर हसू खुलवतात

आणि अश्रुही पुसतात.
कधी हक्काने चेष्टा-
मस्करी करतात,

तर कधी मध्येच
भावनिक होतात.

पण तीच माणसे
अशी असतात,

जी या जगात
आपली असतात.


डोळ्यातील अश्रू पडतात...


डोळ्यातील अश्रू पडतात...
.
डोळ्यातील अश्रू पडतात...
तेव्हा त्यांचा आवाज होत नाहि..
.
याचा अर्थ असा नाहि की..
...तु दुरावल्यावर मला दुःख होत नाहि..
.
शब्दांनाहि कोड पडावं..
अशीही काही माणस असतात..
.
किती आपलं भाग्य असत..
जेव्हा ती आपली असतात..
.
कुणीच आपल नसतं.
मग आपण कुणासाठी असतो.
.
आपलं हे क्षणिक समाधान.
इथ प्रत्येक जण एकटा असतो...
.
डहाळीवरूण ओथंबणारे पावसाचे थेंब..
उगाचच का अडकून बसतात..
.
काहि क्षण फ़ाद्यांशी नातं जोडून..
किती निष्ठूरपणे सोडून जातात...
.
नजरेत जे सामर्थ्य आहे..
ते शब्दांना कसे मिळणार..
.
पण प्रेमात पडल्याशिवाय..
ते तुम्हाला कस कळणार..