Saturday, November 17, 2012

तुला पाहुनी .......

ये ना , ये ना , तु ये सजनी..... ये माझ्या ह्या अंगणी....
दे प्रेमाला माझ्या जरा...तुझ्या प्रेमाची ती रागिणी....

तुला पाहुनी तुला पाहुनी
तुझ्या प्रितिच्या मनी राहुनी
तुझ्या संगती रंग रंगती
तु्झ्या भोवती फुले गंधती
झालो वेडा मी तुझ्यासाठी
प्रितिच्या फुला तुझ्यासाठी
चंद्र वेडा जसा चांदणी....

स्थिती आहे तशी ह्या मनी...
हवं आणखी काय, मला गं प्रिये
जन्मोजन्माचं हे नातं आहे
तु लेखनी माझ्या मनाची प्रिये
प्रेमाची कहानी लिहून दे
देखणी तुझी हर एक अदा
अदांवरती तुझ्या झालो मी फिदा
प्रेमदेवतेची तु आरती
रुप तुझे आहे चंदनी....

ये ना , ये ना ,तु ये सजनी..... ये माझ्या ह्या अंगणी....
दे प्रेमाला माझ्या जरा...तुझ्या प्रेमाची ति रागिणी....

देव लोकातल्या कोण्या राणी साठी कुणीतरी घेऊन जाताना

देव लोकातल्या कोण्या राणी साठी कुणीतरी घेऊन जाताना गुलाब फुल,
सांडली असेल पाकळी एक ती म्हणजे तू....

रंग गोरा मन निर्मळ,
पापण्यांत मदनाचे ओघळ,
ओठांवरी मोगर्याचा भास,
गंध कस्तुरी अंगास.
अशी तू दिसतें मोहिनी, कामिनी,

तुला बघताना वाटे तू हवीस जीवनी.
वारा जोराचा वाहिल्यावर सुद्धा तुला खरचतट असेल कदाचित,
विरघळत असेल रंग घामाने वगैरे,
तू थांबून थांबून बोलतेस तेव्हा वाटते,

शब्दालाही भीती वाटत असावी त्रास होईल तुझ्या जिभेला वगैरे .........
तुझी हळुवार हालचाल खिळवत ठेवते नजर तुझ्यावर,

रुमाल सुद्धा इतक्या नाजुकतेने उचलतेस कि त्याचीही घडी विस्कटत नसेल कदाचित,

कापसाचा देह सारा,
कापसाचा स्पर्श सारा,
वाराही जोराने वाहता,
येत असेल अंगी शहारा,

इतके नाजुकपणपण बाई काय कामाचे,
कि प्रत्येक स्पर्शावर लागे पहारा,
शरीरावर तुझ्या तांबूस लव जसं सांजवेळी किरणं सोनेरी,

मनमोहक....... जीवघेणी
भुवया धनुष्याकार .......... आणि खाली नितळ नजरेचा बाण.
बोटात हिर्याची अंगठी जसं हिर्यावर हिरा चढवलेला.
मनगटात नाजुकसे घड्याळ...... एकच बांगडी.
गळ्यात नाजुकशी माळ त्यात हृदयाचा आकाराचं लॉकेट सवंगडी.

खांद्यावर सावरलेली ओढणी.....पाठीमागे सोडलेली वेणी.
इतकाच तुझा साज तरी वरदान तुला कि तू रुपाची खणी......
अगदी देखणी...........मनमोहिनी.....मनमोहिनी......

आयुष्यात कधी मागे सरायचं नसतं......

"आयुष्यात कधी मागे सरायचं नसतं
नेहमी नवीन काहीतरी शोधायचं असतं
असली जरी वाट कठीण चालतच जायचं असतं

आयुष्यात मात्र कधी मागे सरायचं नसतं
असेल विश्वास आपल्यांवर जरी
परक्यांवर ठेवायला कधी कातरायचा नसतं

आयुष्यात कधी मागे सरायचं नसतं
नेहमी नवीन काही तरी शोधायचं असतं
नवीन काही तरी शोधताना जुन्यांना मात्र कधी विसरायचं नसतं
पण जुन्यांच्या साथीत राहून नव्यांनाकधी डावलायच नसतं

आयुष्यात कधी मागे सरायचं नसतं
नेहमी नवीन काही तरी शोधायचा असतं

आयुष्यातल्या कटू आठवणी आणि सुखी क्षण वाटण्यासाठी
कुणीतरी असावं लागत असतं
म्हणूनच देवाने बनवली आहे मैत्री या जगात
खरया मित्रांचं ते कर्तव्य असतं पण
खोट्याना ते जमेलच असं नसतं
म्हणूनच आयुष्यात कधी मागे सरायचं नसतं
नेहमी नवीन काही तरी शोधायचा असतं..

आयुष्य असते एक लढाई
ती प्रत्येकालाच जिंकावास वाटत असतं
हरलो जरी त्यात कधी खचायचा नसतं
पुन्हा नव्या उमेदीने जगायला शिकायचंअसतं

आयुष्यात कधी मागे सरायचं नसतं
नेहमी नवीन काहीतरी शोधायचं असतं

आयुष्यात जरी हरलो तरी साथ घ्यायची जिंकनार्याची
कारण तो सुद्धा हारल्यानंतरच जिंकायला शिकलेला असतो
अनुभवाच्या बोलातून त्याच्या सगळं काही शिकायचा असतं

आयुष्यात कधी मागे सरायचं नसतं
नेहमी नवीन काहीतरी शोधायचं असतं

आयुष्यात जे जे काही घडतं ते सगळं पहिल्यांदाच आणि नवीनच घडत असतं
पण घडून गेल्यावर मात्र ते कधी विसरायचा नसतं
त्यातूनच घेऊन बोध चांगल्या वाईट गोष्टींचा

आयुष्य सुंदर बनवायचं असतं
म्हणूनच म्हणतो आयुष्यात कधी मागे सरायचं नसतं.....
नेहमी नवीन काही तरी शोधायचा असतं...."

आठवणींच्या आरश्यात जेव्हा

आठवणींच्या आरश्यात जेव्हा …. डोळ्यांतून पाण्याचे थेंब पडतात …. त्या हलत्या आरशात मला …. माझे दोन दोन चेहरे दिसतात …. अश्रू होते का पाऊस …. हे ओळखणेही अवघड जाते …. अश्रू काय आणि पाऊस काय …. पाहणार्याला दोन्ही सारखेच असते …. बर्याचदा तुझ्या आठवणी …. पावलं न वाजवताच येतात …. जाताना मात्र मनाच्या रस्त्यात …. तुझ्या पावलांचे ठसे मागे सोडून जातात …. अवेळी आलेला पाउसही …. सगळं उध्वस्त करतो …. भर दुपारी भरल्या ढगांनी …. काळोखी संध्याकाळ करतो ….

Saturday, November 17, 2012

तुला पाहुनी .......

ये ना , ये ना , तु ये सजनी..... ये माझ्या ह्या अंगणी....
दे प्रेमाला माझ्या जरा...तुझ्या प्रेमाची ती रागिणी....

तुला पाहुनी तुला पाहुनी
तुझ्या प्रितिच्या मनी राहुनी
तुझ्या संगती रंग रंगती
तु्झ्या भोवती फुले गंधती
झालो वेडा मी तुझ्यासाठी
प्रितिच्या फुला तुझ्यासाठी
चंद्र वेडा जसा चांदणी....

स्थिती आहे तशी ह्या मनी...
हवं आणखी काय, मला गं प्रिये
जन्मोजन्माचं हे नातं आहे
तु लेखनी माझ्या मनाची प्रिये
प्रेमाची कहानी लिहून दे
देखणी तुझी हर एक अदा
अदांवरती तुझ्या झालो मी फिदा
प्रेमदेवतेची तु आरती
रुप तुझे आहे चंदनी....

ये ना , ये ना ,तु ये सजनी..... ये माझ्या ह्या अंगणी....
दे प्रेमाला माझ्या जरा...तुझ्या प्रेमाची ति रागिणी....

देव लोकातल्या कोण्या राणी साठी कुणीतरी घेऊन जाताना

देव लोकातल्या कोण्या राणी साठी कुणीतरी घेऊन जाताना गुलाब फुल,
सांडली असेल पाकळी एक ती म्हणजे तू....

रंग गोरा मन निर्मळ,
पापण्यांत मदनाचे ओघळ,
ओठांवरी मोगर्याचा भास,
गंध कस्तुरी अंगास.
अशी तू दिसतें मोहिनी, कामिनी,

तुला बघताना वाटे तू हवीस जीवनी.
वारा जोराचा वाहिल्यावर सुद्धा तुला खरचतट असेल कदाचित,
विरघळत असेल रंग घामाने वगैरे,
तू थांबून थांबून बोलतेस तेव्हा वाटते,

शब्दालाही भीती वाटत असावी त्रास होईल तुझ्या जिभेला वगैरे .........
तुझी हळुवार हालचाल खिळवत ठेवते नजर तुझ्यावर,

रुमाल सुद्धा इतक्या नाजुकतेने उचलतेस कि त्याचीही घडी विस्कटत नसेल कदाचित,

कापसाचा देह सारा,
कापसाचा स्पर्श सारा,
वाराही जोराने वाहता,
येत असेल अंगी शहारा,

इतके नाजुकपणपण बाई काय कामाचे,
कि प्रत्येक स्पर्शावर लागे पहारा,
शरीरावर तुझ्या तांबूस लव जसं सांजवेळी किरणं सोनेरी,

मनमोहक....... जीवघेणी
भुवया धनुष्याकार .......... आणि खाली नितळ नजरेचा बाण.
बोटात हिर्याची अंगठी जसं हिर्यावर हिरा चढवलेला.
मनगटात नाजुकसे घड्याळ...... एकच बांगडी.
गळ्यात नाजुकशी माळ त्यात हृदयाचा आकाराचं लॉकेट सवंगडी.

खांद्यावर सावरलेली ओढणी.....पाठीमागे सोडलेली वेणी.
इतकाच तुझा साज तरी वरदान तुला कि तू रुपाची खणी......
अगदी देखणी...........मनमोहिनी.....मनमोहिनी......

आयुष्यात कधी मागे सरायचं नसतं......

"आयुष्यात कधी मागे सरायचं नसतं
नेहमी नवीन काहीतरी शोधायचं असतं
असली जरी वाट कठीण चालतच जायचं असतं

आयुष्यात मात्र कधी मागे सरायचं नसतं
असेल विश्वास आपल्यांवर जरी
परक्यांवर ठेवायला कधी कातरायचा नसतं

आयुष्यात कधी मागे सरायचं नसतं
नेहमी नवीन काही तरी शोधायचं असतं
नवीन काही तरी शोधताना जुन्यांना मात्र कधी विसरायचं नसतं
पण जुन्यांच्या साथीत राहून नव्यांनाकधी डावलायच नसतं

आयुष्यात कधी मागे सरायचं नसतं
नेहमी नवीन काही तरी शोधायचा असतं

आयुष्यातल्या कटू आठवणी आणि सुखी क्षण वाटण्यासाठी
कुणीतरी असावं लागत असतं
म्हणूनच देवाने बनवली आहे मैत्री या जगात
खरया मित्रांचं ते कर्तव्य असतं पण
खोट्याना ते जमेलच असं नसतं
म्हणूनच आयुष्यात कधी मागे सरायचं नसतं
नेहमी नवीन काही तरी शोधायचा असतं..

आयुष्य असते एक लढाई
ती प्रत्येकालाच जिंकावास वाटत असतं
हरलो जरी त्यात कधी खचायचा नसतं
पुन्हा नव्या उमेदीने जगायला शिकायचंअसतं

आयुष्यात कधी मागे सरायचं नसतं
नेहमी नवीन काहीतरी शोधायचं असतं

आयुष्यात जरी हरलो तरी साथ घ्यायची जिंकनार्याची
कारण तो सुद्धा हारल्यानंतरच जिंकायला शिकलेला असतो
अनुभवाच्या बोलातून त्याच्या सगळं काही शिकायचा असतं

आयुष्यात कधी मागे सरायचं नसतं
नेहमी नवीन काहीतरी शोधायचं असतं

आयुष्यात जे जे काही घडतं ते सगळं पहिल्यांदाच आणि नवीनच घडत असतं
पण घडून गेल्यावर मात्र ते कधी विसरायचा नसतं
त्यातूनच घेऊन बोध चांगल्या वाईट गोष्टींचा

आयुष्य सुंदर बनवायचं असतं
म्हणूनच म्हणतो आयुष्यात कधी मागे सरायचं नसतं.....
नेहमी नवीन काही तरी शोधायचा असतं...."

आठवणींच्या आरश्यात जेव्हा

आठवणींच्या आरश्यात जेव्हा …. डोळ्यांतून पाण्याचे थेंब पडतात …. त्या हलत्या आरशात मला …. माझे दोन दोन चेहरे दिसतात …. अश्रू होते का पाऊस …. हे ओळखणेही अवघड जाते …. अश्रू काय आणि पाऊस काय …. पाहणार्याला दोन्ही सारखेच असते …. बर्याचदा तुझ्या आठवणी …. पावलं न वाजवताच येतात …. जाताना मात्र मनाच्या रस्त्यात …. तुझ्या पावलांचे ठसे मागे सोडून जातात …. अवेळी आलेला पाउसही …. सगळं उध्वस्त करतो …. भर दुपारी भरल्या ढगांनी …. काळोखी संध्याकाळ करतो ….