Saturday, November 17, 2012

आयुष्यात कधी मागे सरायचं नसतं......

"आयुष्यात कधी मागे सरायचं नसतं
नेहमी नवीन काहीतरी शोधायचं असतं
असली जरी वाट कठीण चालतच जायचं असतं

आयुष्यात मात्र कधी मागे सरायचं नसतं
असेल विश्वास आपल्यांवर जरी
परक्यांवर ठेवायला कधी कातरायचा नसतं

आयुष्यात कधी मागे सरायचं नसतं
नेहमी नवीन काही तरी शोधायचं असतं
नवीन काही तरी शोधताना जुन्यांना मात्र कधी विसरायचं नसतं
पण जुन्यांच्या साथीत राहून नव्यांनाकधी डावलायच नसतं

आयुष्यात कधी मागे सरायचं नसतं
नेहमी नवीन काही तरी शोधायचा असतं

आयुष्यातल्या कटू आठवणी आणि सुखी क्षण वाटण्यासाठी
कुणीतरी असावं लागत असतं
म्हणूनच देवाने बनवली आहे मैत्री या जगात
खरया मित्रांचं ते कर्तव्य असतं पण
खोट्याना ते जमेलच असं नसतं
म्हणूनच आयुष्यात कधी मागे सरायचं नसतं
नेहमी नवीन काही तरी शोधायचा असतं..

आयुष्य असते एक लढाई
ती प्रत्येकालाच जिंकावास वाटत असतं
हरलो जरी त्यात कधी खचायचा नसतं
पुन्हा नव्या उमेदीने जगायला शिकायचंअसतं

आयुष्यात कधी मागे सरायचं नसतं
नेहमी नवीन काहीतरी शोधायचं असतं

आयुष्यात जरी हरलो तरी साथ घ्यायची जिंकनार्याची
कारण तो सुद्धा हारल्यानंतरच जिंकायला शिकलेला असतो
अनुभवाच्या बोलातून त्याच्या सगळं काही शिकायचा असतं

आयुष्यात कधी मागे सरायचं नसतं
नेहमी नवीन काहीतरी शोधायचं असतं

आयुष्यात जे जे काही घडतं ते सगळं पहिल्यांदाच आणि नवीनच घडत असतं
पण घडून गेल्यावर मात्र ते कधी विसरायचा नसतं
त्यातूनच घेऊन बोध चांगल्या वाईट गोष्टींचा

आयुष्य सुंदर बनवायचं असतं
म्हणूनच म्हणतो आयुष्यात कधी मागे सरायचं नसतं.....
नेहमी नवीन काही तरी शोधायचा असतं...."

आठवणींच्या आरश्यात जेव्हा

आठवणींच्या आरश्यात जेव्हा …. डोळ्यांतून पाण्याचे थेंब पडतात …. त्या हलत्या आरशात मला …. माझे दोन दोन चेहरे दिसतात …. अश्रू होते का पाऊस …. हे ओळखणेही अवघड जाते …. अश्रू काय आणि पाऊस काय …. पाहणार्याला दोन्ही सारखेच असते …. बर्याचदा तुझ्या आठवणी …. पावलं न वाजवताच येतात …. जाताना मात्र मनाच्या रस्त्यात …. तुझ्या पावलांचे ठसे मागे सोडून जातात …. अवेळी आलेला पाउसही …. सगळं उध्वस्त करतो …. भर दुपारी भरल्या ढगांनी …. काळोखी संध्याकाळ करतो ….

Sunday, November 11, 2012

पुन्हा पाऊस कोसळतोय बाहेर!

पुन्हा पाऊस कोसळतोय बाहेर!
आणि इथे आत नुसता आठवणींचा पाऊस
बाहेरच्या पावसापेक्षाही मुसळधार कोसळतोय!
तुझे नी माझे कितीतरी पाऊस सहज कवेत घेत....
तुला आठवतं आपण पहिल्यांदा एकत्र पावसात भिजलो होतो....
पावसापेक्षाही तुझ्या सहवासाने येणारा शहारा!
नंतर जसं काही व्यसनच लागलं पावसाचं....
दरवेळी नव्याने पाऊस अनुभवायचं....
आणि मग कितीवेळा त्या कोसळणार्‍या धारांमधे हरवून जायचो आपण...
स्वत:ला विसरून.....
आणि अचानक एके दिवशी पाऊस रुसला माझ्यावर...
आता इथे कायमचाच दुष्काळाचा मुक्काम आहे!
माझं भेगाळलेलं मन वाट पहातंय पावसाची
तू म्हणशील, की इतका आठवणींचा पाऊस आहे की.....
पण तुला माहीत आहे ना....
इतकं पाणी असलं सगळीकडे तरी
चातकाची तहान भागायला पावसाचेच थेंब हवेत ना?
हल्ली नुसतंच भरून येतं मनाचं आभाळ..
माझा पाऊस तर कधीच वाहून गेला डोळ्यांमधून.....
आता तुझा पाऊस पाठवशील? 

प्रपातासारखा रोरावत कोसळणारा तू

प्रपातासारखा रोरावत कोसळणारा तू
आणि नदीसारखी स्थिर, शांत मी
उन्मत्त वृक्षासारखा वादळाशी झुंजणारा तू
आणि जमिनीशी नातं जोडणारी मी
क्षितीजाच्यापार झेपावणारा तू
आणि किनार्‍यावरच वाळूचं घरटं जपणारी मी
'साथ देशील का' विचारतोयस खरा
पण भीती वाटते मला,हे सगळं कसं काय जमणार मला?
****
तो

कोसळणारा प्रपात दिसतो सगळ्यांना
पण कड्याच्या टोकापर्यंत शान्त वाहून
त्याला शक्ती देणारी नदीच असते ना?
वृक्ष जेव्हा झुंजतो वादळाशी
मुळं घट्ट धरून ठेवून
त्याला आधार देणारी जमीनच असते ना?
आणि वेडे,पक्षी क्षितिजापार झेपावला तरी
समुद्रावर थोडच विसावणार तो?
संध्याकाळी परतून यायला,घरटंच हवं ना त्याला? 

Saturday, November 17, 2012

आयुष्यात कधी मागे सरायचं नसतं......

"आयुष्यात कधी मागे सरायचं नसतं
नेहमी नवीन काहीतरी शोधायचं असतं
असली जरी वाट कठीण चालतच जायचं असतं

आयुष्यात मात्र कधी मागे सरायचं नसतं
असेल विश्वास आपल्यांवर जरी
परक्यांवर ठेवायला कधी कातरायचा नसतं

आयुष्यात कधी मागे सरायचं नसतं
नेहमी नवीन काही तरी शोधायचं असतं
नवीन काही तरी शोधताना जुन्यांना मात्र कधी विसरायचं नसतं
पण जुन्यांच्या साथीत राहून नव्यांनाकधी डावलायच नसतं

आयुष्यात कधी मागे सरायचं नसतं
नेहमी नवीन काही तरी शोधायचा असतं

आयुष्यातल्या कटू आठवणी आणि सुखी क्षण वाटण्यासाठी
कुणीतरी असावं लागत असतं
म्हणूनच देवाने बनवली आहे मैत्री या जगात
खरया मित्रांचं ते कर्तव्य असतं पण
खोट्याना ते जमेलच असं नसतं
म्हणूनच आयुष्यात कधी मागे सरायचं नसतं
नेहमी नवीन काही तरी शोधायचा असतं..

आयुष्य असते एक लढाई
ती प्रत्येकालाच जिंकावास वाटत असतं
हरलो जरी त्यात कधी खचायचा नसतं
पुन्हा नव्या उमेदीने जगायला शिकायचंअसतं

आयुष्यात कधी मागे सरायचं नसतं
नेहमी नवीन काहीतरी शोधायचं असतं

आयुष्यात जरी हरलो तरी साथ घ्यायची जिंकनार्याची
कारण तो सुद्धा हारल्यानंतरच जिंकायला शिकलेला असतो
अनुभवाच्या बोलातून त्याच्या सगळं काही शिकायचा असतं

आयुष्यात कधी मागे सरायचं नसतं
नेहमी नवीन काहीतरी शोधायचं असतं

आयुष्यात जे जे काही घडतं ते सगळं पहिल्यांदाच आणि नवीनच घडत असतं
पण घडून गेल्यावर मात्र ते कधी विसरायचा नसतं
त्यातूनच घेऊन बोध चांगल्या वाईट गोष्टींचा

आयुष्य सुंदर बनवायचं असतं
म्हणूनच म्हणतो आयुष्यात कधी मागे सरायचं नसतं.....
नेहमी नवीन काही तरी शोधायचा असतं...."

आठवणींच्या आरश्यात जेव्हा

आठवणींच्या आरश्यात जेव्हा …. डोळ्यांतून पाण्याचे थेंब पडतात …. त्या हलत्या आरशात मला …. माझे दोन दोन चेहरे दिसतात …. अश्रू होते का पाऊस …. हे ओळखणेही अवघड जाते …. अश्रू काय आणि पाऊस काय …. पाहणार्याला दोन्ही सारखेच असते …. बर्याचदा तुझ्या आठवणी …. पावलं न वाजवताच येतात …. जाताना मात्र मनाच्या रस्त्यात …. तुझ्या पावलांचे ठसे मागे सोडून जातात …. अवेळी आलेला पाउसही …. सगळं उध्वस्त करतो …. भर दुपारी भरल्या ढगांनी …. काळोखी संध्याकाळ करतो ….

Sunday, November 11, 2012

पुन्हा पाऊस कोसळतोय बाहेर!

पुन्हा पाऊस कोसळतोय बाहेर!
आणि इथे आत नुसता आठवणींचा पाऊस
बाहेरच्या पावसापेक्षाही मुसळधार कोसळतोय!
तुझे नी माझे कितीतरी पाऊस सहज कवेत घेत....
तुला आठवतं आपण पहिल्यांदा एकत्र पावसात भिजलो होतो....
पावसापेक्षाही तुझ्या सहवासाने येणारा शहारा!
नंतर जसं काही व्यसनच लागलं पावसाचं....
दरवेळी नव्याने पाऊस अनुभवायचं....
आणि मग कितीवेळा त्या कोसळणार्‍या धारांमधे हरवून जायचो आपण...
स्वत:ला विसरून.....
आणि अचानक एके दिवशी पाऊस रुसला माझ्यावर...
आता इथे कायमचाच दुष्काळाचा मुक्काम आहे!
माझं भेगाळलेलं मन वाट पहातंय पावसाची
तू म्हणशील, की इतका आठवणींचा पाऊस आहे की.....
पण तुला माहीत आहे ना....
इतकं पाणी असलं सगळीकडे तरी
चातकाची तहान भागायला पावसाचेच थेंब हवेत ना?
हल्ली नुसतंच भरून येतं मनाचं आभाळ..
माझा पाऊस तर कधीच वाहून गेला डोळ्यांमधून.....
आता तुझा पाऊस पाठवशील? 

प्रपातासारखा रोरावत कोसळणारा तू

प्रपातासारखा रोरावत कोसळणारा तू
आणि नदीसारखी स्थिर, शांत मी
उन्मत्त वृक्षासारखा वादळाशी झुंजणारा तू
आणि जमिनीशी नातं जोडणारी मी
क्षितीजाच्यापार झेपावणारा तू
आणि किनार्‍यावरच वाळूचं घरटं जपणारी मी
'साथ देशील का' विचारतोयस खरा
पण भीती वाटते मला,हे सगळं कसं काय जमणार मला?
****
तो

कोसळणारा प्रपात दिसतो सगळ्यांना
पण कड्याच्या टोकापर्यंत शान्त वाहून
त्याला शक्ती देणारी नदीच असते ना?
वृक्ष जेव्हा झुंजतो वादळाशी
मुळं घट्ट धरून ठेवून
त्याला आधार देणारी जमीनच असते ना?
आणि वेडे,पक्षी क्षितिजापार झेपावला तरी
समुद्रावर थोडच विसावणार तो?
संध्याकाळी परतून यायला,घरटंच हवं ना त्याला?