Tuesday, November 6, 2012

आधीच ठरले होते तुझे माझे नाते

आधीच ठरले होते तुझे माझे नाते
म्हणुनच ह्रदय फक्त तुझे गीत गाते
एकांतपणी ही माझ्या साथ तु येते
कळत न कळत गीत तयार होते
योगा योग म्हण नाही तर अंधश्रधा
पण लाखोंच्या दुनियेत मन तुझेच का होते ?
आधीच ठरले होते तुझे माझे नाते
म्हणुनच ह्रदय फक्त तुझे गीत गाते
टाळतो मी , जाळतो मी, तरी ही
मनापुढे कित्येकदा हारतो मी
स्वप्नात ही तुझाच वावर
झोपेत ही मुखी नाव तुझेच येते
आधीच ठरले होते तुझे माझे नाते
म्हणुनच ह्रदय फक्त तुझे गीत गाते
नाही कळत जगाला जगापलिकडे हे जाते
"कृष्ण, कृष्ण "करीत मीरा विष ही पीते
ठरविले होते आधीच त्याने म्हणुन हे होते
मान न मान तु पण मन गीत तुझेच गाते
आधीच ठरले होते तुझे माझे नाते
म्हणुनच ह्रदय फक्त तुझे गीत गाते 


एक नाते मैत्रिचे

एक नाते मैत्रिचे
आपल्या आयुष्याला कधी सुंदर कलाटणी,

तर कधी वेडेवाकडे वळण देणारे!
एक नाते मैत्रिचे सुख-दुखात साथ देणारे

तर कधी अर्ध्या वाटेवरचं सोडून जाणारे!
एक नाते मैत्रिचे

चुकलेल्या योग्य मार्ग दाखवणारे,
तर कधी चूकीच्या रस्त्यावर चालत जायला सांगणारे!

एक नाते मैत्रिचे
सुर्यासारखे तेजस्वी प्रकाश देणारे

तर कधी अंधारातच सोडून जाणारे!
म्हणूनच, तर मैत्री करावी

सुख-दुःखात साथ देणाऱ्या मित्रांशी
ना चूकीच्या रस्त्यावर चालावला सांगणाऱ्यांशी

म्हणून.. मैत्रीचे नाते असावे
फुल-काट्यांच्या जोडीसारखे,

नेहमीच कष्टाने सुखी रहंणारे!


वेळ आली तर तुलाही सांगीन

वेळ आली तर तुलाही सांगीन,
आयुष्य कस जगायचं असत.
एका-एका शब्दामधून
वाक्य कस बनवायचा असत.
वेळ आली तर तुलाही सांगीन,
मन कस जिंकायचं असत.
आवडी-निवडी सांगताना कस
मनात मन गुंतवायच असत.
वेळ आली तर तुलाही सांगीन,
स्पर्श कसा करायचा असतो.
नाजूक उमललेल्या ओठांवरून कसा
हळुवार हात फिरवायचा असतो.
वेळ आली तर तुलाही सांगीन,
दुखं कस झिजवायच असत.
अश्रूंचा नवीन संसार करून
सुखाने कस नांदायचं असत.
वेळ आली तर तुलाही सांगीन,
प्रेम कस करायचं असत.
विरहात प्रेमाची आहुती देऊन
क्षितिजाकडे कस बघायचं असत


जगतांना किती खेळले जुगार आम्ही

जगतांना किती खेळले जुगार आम्ही,
दुखाने पेटविली जीवनाची सिगार आम्ही
नका छेड काढू नशिल्या आसवांची
पापण्यांची तोरणे ठेविली उधार आम्ही
भले ते लोक होते जे रडून गेले
मांडला न कधी अश्रूंचा बाजार आम्ही
जरी शोक किती वेचले ओंजळी मधुनी
धार जखमांची जपली अलवार आम्ही
कशास शोध आता मंद काजव्याचा
सुर्यास ही केले अता उबदार आम्ही
हे सागरा ! जरा जपून वाग अता
कैद तुझी केली किनार आम्ही
नका अता पैज कासवा वरी लावू
किती तरी ससे केले पसार आम्ही
जरी पाहुणे होतो दोन-चार घडीचे
फेकले तुमच्यावरी शेर हजार आम्ही


 

Tuesday, November 6, 2012

आधीच ठरले होते तुझे माझे नाते

आधीच ठरले होते तुझे माझे नाते
म्हणुनच ह्रदय फक्त तुझे गीत गाते
एकांतपणी ही माझ्या साथ तु येते
कळत न कळत गीत तयार होते
योगा योग म्हण नाही तर अंधश्रधा
पण लाखोंच्या दुनियेत मन तुझेच का होते ?
आधीच ठरले होते तुझे माझे नाते
म्हणुनच ह्रदय फक्त तुझे गीत गाते
टाळतो मी , जाळतो मी, तरी ही
मनापुढे कित्येकदा हारतो मी
स्वप्नात ही तुझाच वावर
झोपेत ही मुखी नाव तुझेच येते
आधीच ठरले होते तुझे माझे नाते
म्हणुनच ह्रदय फक्त तुझे गीत गाते
नाही कळत जगाला जगापलिकडे हे जाते
"कृष्ण, कृष्ण "करीत मीरा विष ही पीते
ठरविले होते आधीच त्याने म्हणुन हे होते
मान न मान तु पण मन गीत तुझेच गाते
आधीच ठरले होते तुझे माझे नाते
म्हणुनच ह्रदय फक्त तुझे गीत गाते 


एक नाते मैत्रिचे

एक नाते मैत्रिचे
आपल्या आयुष्याला कधी सुंदर कलाटणी,

तर कधी वेडेवाकडे वळण देणारे!
एक नाते मैत्रिचे सुख-दुखात साथ देणारे

तर कधी अर्ध्या वाटेवरचं सोडून जाणारे!
एक नाते मैत्रिचे

चुकलेल्या योग्य मार्ग दाखवणारे,
तर कधी चूकीच्या रस्त्यावर चालत जायला सांगणारे!

एक नाते मैत्रिचे
सुर्यासारखे तेजस्वी प्रकाश देणारे

तर कधी अंधारातच सोडून जाणारे!
म्हणूनच, तर मैत्री करावी

सुख-दुःखात साथ देणाऱ्या मित्रांशी
ना चूकीच्या रस्त्यावर चालावला सांगणाऱ्यांशी

म्हणून.. मैत्रीचे नाते असावे
फुल-काट्यांच्या जोडीसारखे,

नेहमीच कष्टाने सुखी रहंणारे!


वेळ आली तर तुलाही सांगीन

वेळ आली तर तुलाही सांगीन,
आयुष्य कस जगायचं असत.
एका-एका शब्दामधून
वाक्य कस बनवायचा असत.
वेळ आली तर तुलाही सांगीन,
मन कस जिंकायचं असत.
आवडी-निवडी सांगताना कस
मनात मन गुंतवायच असत.
वेळ आली तर तुलाही सांगीन,
स्पर्श कसा करायचा असतो.
नाजूक उमललेल्या ओठांवरून कसा
हळुवार हात फिरवायचा असतो.
वेळ आली तर तुलाही सांगीन,
दुखं कस झिजवायच असत.
अश्रूंचा नवीन संसार करून
सुखाने कस नांदायचं असत.
वेळ आली तर तुलाही सांगीन,
प्रेम कस करायचं असत.
विरहात प्रेमाची आहुती देऊन
क्षितिजाकडे कस बघायचं असत


जगतांना किती खेळले जुगार आम्ही

जगतांना किती खेळले जुगार आम्ही,
दुखाने पेटविली जीवनाची सिगार आम्ही
नका छेड काढू नशिल्या आसवांची
पापण्यांची तोरणे ठेविली उधार आम्ही
भले ते लोक होते जे रडून गेले
मांडला न कधी अश्रूंचा बाजार आम्ही
जरी शोक किती वेचले ओंजळी मधुनी
धार जखमांची जपली अलवार आम्ही
कशास शोध आता मंद काजव्याचा
सुर्यास ही केले अता उबदार आम्ही
हे सागरा ! जरा जपून वाग अता
कैद तुझी केली किनार आम्ही
नका अता पैज कासवा वरी लावू
किती तरी ससे केले पसार आम्ही
जरी पाहुणे होतो दोन-चार घडीचे
फेकले तुमच्यावरी शेर हजार आम्ही