एक नाते मैत्रिचे
आपल्या आयुष्याला कधी सुंदर कलाटणी,
तर कधी वेडेवाकडे वळण देणारे!
एक नाते मैत्रिचे सुख-दुखात साथ देणारे
तर कधी अर्ध्या वाटेवरचं सोडून जाणारे!
एक नाते मैत्रिचे
चुकलेल्या योग्य मार्ग दाखवणारे,
तर कधी चूकीच्या रस्त्यावर चालत जायला सांगणारे!
एक नाते मैत्रिचे
सुर्यासारखे तेजस्वी प्रकाश देणारे
तर कधी अंधारातच सोडून जाणारे!
म्हणूनच, तर मैत्री करावी
सुख-दुःखात साथ देणाऱ्या मित्रांशी
ना चूकीच्या रस्त्यावर चालावला सांगणाऱ्यांशी
म्हणून.. मैत्रीचे नाते असावे
फुल-काट्यांच्या जोडीसारखे,
नेहमीच कष्टाने सुखी रहंणारे!
वेळ आली तर तुलाही सांगीन,
आयुष्य कस जगायचं असत.
एका-एका शब्दामधून
वाक्य कस बनवायचा असत.
वेळ आली तर तुलाही सांगीन,
मन कस जिंकायचं असत.
आवडी-निवडी सांगताना कस
मनात मन गुंतवायच असत.
वेळ आली तर तुलाही सांगीन,
स्पर्श कसा करायचा असतो.
नाजूक उमललेल्या ओठांवरून कसा
हळुवार हात फिरवायचा असतो.
वेळ आली तर तुलाही सांगीन,
दुखं कस झिजवायच असत.
अश्रूंचा नवीन संसार करून
सुखाने कस नांदायचं असत.
वेळ आली तर तुलाही सांगीन,
प्रेम कस करायचं असत.
विरहात प्रेमाची आहुती देऊन
क्षितिजाकडे कस बघायचं असत
जगतांना किती खेळले जुगार आम्ही,
दुखाने पेटविली जीवनाची सिगार आम्ही
नका छेड काढू नशिल्या आसवांची
पापण्यांची तोरणे ठेविली उधार आम्ही
भले ते लोक होते जे रडून गेले
मांडला न कधी अश्रूंचा बाजार आम्ही
जरी शोक किती वेचले ओंजळी मधुनी
धार जखमांची जपली अलवार आम्ही
कशास शोध आता मंद काजव्याचा
सुर्यास ही केले अता उबदार आम्ही
हे सागरा ! जरा जपून वाग अता
कैद तुझी केली किनार आम्ही
नका अता पैज कासवा वरी लावू
किती तरी ससे केले पसार आम्ही
जरी पाहुणे होतो दोन-चार घडीचे
फेकले तुमच्यावरी शेर हजार आम्ही
जुनेच मॅसेज पुन्हा पुन्हा वाचत असतं
कोणीतरी..
पावसाच्या थेंबात अश्रु लपवुन रडत असतं
कोणीतरी..
...
कोणाला तरी हसतांना लपुन बघत असतं
कोणीतरी..
दिवे सगळे विझल्यावर का जळत असतं
कोणीतरी..
सगळ जग झोपेत
असताना उघड्या डोळ्यांनी स्वप्न बघत
असतं कोणीतरी..
कुणी येणार नाही तरी वाट बघत असतं
कोणीतरी..
माणसांच्या या इतक्या गर्दीत का एकट
असतं कोणीतरी.
एक नाते मैत्रिचे
आपल्या आयुष्याला कधी सुंदर कलाटणी,
तर कधी वेडेवाकडे वळण देणारे!
एक नाते मैत्रिचे सुख-दुखात साथ देणारे
तर कधी अर्ध्या वाटेवरचं सोडून जाणारे!
एक नाते मैत्रिचे
चुकलेल्या योग्य मार्ग दाखवणारे,
तर कधी चूकीच्या रस्त्यावर चालत जायला सांगणारे!
एक नाते मैत्रिचे
सुर्यासारखे तेजस्वी प्रकाश देणारे
तर कधी अंधारातच सोडून जाणारे!
म्हणूनच, तर मैत्री करावी
सुख-दुःखात साथ देणाऱ्या मित्रांशी
ना चूकीच्या रस्त्यावर चालावला सांगणाऱ्यांशी
म्हणून.. मैत्रीचे नाते असावे
फुल-काट्यांच्या जोडीसारखे,
नेहमीच कष्टाने सुखी रहंणारे!
वेळ आली तर तुलाही सांगीन,
आयुष्य कस जगायचं असत.
एका-एका शब्दामधून
वाक्य कस बनवायचा असत.
वेळ आली तर तुलाही सांगीन,
मन कस जिंकायचं असत.
आवडी-निवडी सांगताना कस
मनात मन गुंतवायच असत.
वेळ आली तर तुलाही सांगीन,
स्पर्श कसा करायचा असतो.
नाजूक उमललेल्या ओठांवरून कसा
हळुवार हात फिरवायचा असतो.
वेळ आली तर तुलाही सांगीन,
दुखं कस झिजवायच असत.
अश्रूंचा नवीन संसार करून
सुखाने कस नांदायचं असत.
वेळ आली तर तुलाही सांगीन,
प्रेम कस करायचं असत.
विरहात प्रेमाची आहुती देऊन
क्षितिजाकडे कस बघायचं असत
जगतांना किती खेळले जुगार आम्ही,
दुखाने पेटविली जीवनाची सिगार आम्ही
नका छेड काढू नशिल्या आसवांची
पापण्यांची तोरणे ठेविली उधार आम्ही
भले ते लोक होते जे रडून गेले
मांडला न कधी अश्रूंचा बाजार आम्ही
जरी शोक किती वेचले ओंजळी मधुनी
धार जखमांची जपली अलवार आम्ही
कशास शोध आता मंद काजव्याचा
सुर्यास ही केले अता उबदार आम्ही
हे सागरा ! जरा जपून वाग अता
कैद तुझी केली किनार आम्ही
नका अता पैज कासवा वरी लावू
किती तरी ससे केले पसार आम्ही
जरी पाहुणे होतो दोन-चार घडीचे
फेकले तुमच्यावरी शेर हजार आम्ही
जुनेच मॅसेज पुन्हा पुन्हा वाचत असतं
कोणीतरी..
पावसाच्या थेंबात अश्रु लपवुन रडत असतं
कोणीतरी..
...
कोणाला तरी हसतांना लपुन बघत असतं
कोणीतरी..
दिवे सगळे विझल्यावर का जळत असतं
कोणीतरी..
सगळ जग झोपेत
असताना उघड्या डोळ्यांनी स्वप्न बघत
असतं कोणीतरी..
कुणी येणार नाही तरी वाट बघत असतं
कोणीतरी..
माणसांच्या या इतक्या गर्दीत का एकट
असतं कोणीतरी.