Tuesday, November 6, 2012

मैत्री आणि प्रेम अगदी गफ़लतच होते

मैत्री आणि प्रेम अगदी गफ़लतच होते, अनोळखीशी मैत्री मनात घर करून जाते,

तो सहवास अगदी हवाहवासा वाटतो, चंद्र आणि तारयांसोबती गप्पा करू लागतो,

मनात विचारांचा चालू असतो खेळ, पण काही गोष्टींशी बसतच नाही मेळ,

त्या नात्याचा गंध काही कळतच नाही, पाउले वेगळ्या दिशेने चालतात पण मन काही वळतच नाही,

दिवस - रात्र गप्पांचा चालू असतो प्रवास, कधी जर नाही काढली तिने आठवण तर होतो त्रास,

त्या नात्यामध्ये अचानक आपलेपण वाढते, सतत मन तिचीच आठवण काढ़ते,

रागावणे, रुसने, एकदम अधिकार गाजवणे, जसं माझ्यासाठी ती आणि तिच्यासाठी मीच असणे,

मैत्रीच्या नावाखाली हे असचं चालू असतं, कोण विचारेल अगोदर मन वाटचं बघत असतं,

जोड्या स्वर्गात बनतात, त्या अशाच कुठेतरी भेटतात,

कित्येकांचे स्वप्न साकारतात, तर काही पत्यांसारखे कोसळतात,

मी ही आज त्याच वाटेवर चालतोय, माझ्या भावना अशा शब्दात मांडतोय,

कळत नाहीये ती मैत्री आहे की प्रेम, म्हणून तुमच्याकडून ह्या प्रश्नाचे उत्तर मागतोय....


रोज अनेक चेहरे दिसतात

रोज अनेक चेहरे दिसतात
पण कॉलेजमधल्या त्या
चेहऱ्याकडे बघायची
मजा काही वेगळीच होती

हे सर्व आठवल्यावर वाटते
अश्या त्या कॉलेज लाईफ़ची
मजाच काही वेगळीच होती..............


आयुष्यं म्हणजे असतो एक प्रवास

आयुष्यं म्हणजे असतो एक प्रवास
जो सुरु होतो,
आपल्या जन्मापासुन
न कदाचित
मरणानंतरही संपत नाही.

अनेक उन्हाळे-पावसाळे
पहायला मिळतात या प्रवासात.
काही सुखाचे क्षण
अनुभवायला मिळतात,
तर काही कायमचा
धडा शिकवुन जातात

काही स्वप्ने नकळतपणे पाहिली जातात
तर काही जाणुन बुजुन
पण अनेकदा त्यातली काही स्वप्ने
अर्धवटच राहुन जातात

अशा ह्या प्रवासाच्या पुस्तकात
काही पाने नकळत जोडली जातात
तर काही कोरीच राहुन जातात....
आणि मग शेवटी ह्या कोऱ्या
कागदांचे तयार होते एक वेगळेच पुस्तक
ज्याला आपण नाव देतो "माझे आयुष्यं".


एकदाची उगवली ती सकाळ

एकदाची उगवली ती सकाळ
वाट पहात होतो जिची

होते मन उतावीळ
तिच्या तोंडुन ते शब्दं ऎकण्यासाठी

पण ते शब्दं माझ्यासाठी
नव्हतेच कदाचीत

त्यानंतर वाईट असे कधी
वाटलेच नाही

डोळ्यात ह्या अष्रु
कधी तरळलेच नाहीत

ह्या पुढे कदाचीत प्रेमाचा
विचारही हे मन करणार नाही

हसाय्च्याही आधी खुप
वेळा विचार करेल हे मन

आहे खात्री मला ती विसरणार नाही
तरीही मी काही बोलणार नाही

असे असुनही वेडे हे मन माझे
काही केल्या शांत बसेना

आजही मनात कुठेतरी आहे एक आस
की ती येईल परत कदाचित...........

Tuesday, November 6, 2012

मैत्री आणि प्रेम अगदी गफ़लतच होते

मैत्री आणि प्रेम अगदी गफ़लतच होते, अनोळखीशी मैत्री मनात घर करून जाते,

तो सहवास अगदी हवाहवासा वाटतो, चंद्र आणि तारयांसोबती गप्पा करू लागतो,

मनात विचारांचा चालू असतो खेळ, पण काही गोष्टींशी बसतच नाही मेळ,

त्या नात्याचा गंध काही कळतच नाही, पाउले वेगळ्या दिशेने चालतात पण मन काही वळतच नाही,

दिवस - रात्र गप्पांचा चालू असतो प्रवास, कधी जर नाही काढली तिने आठवण तर होतो त्रास,

त्या नात्यामध्ये अचानक आपलेपण वाढते, सतत मन तिचीच आठवण काढ़ते,

रागावणे, रुसने, एकदम अधिकार गाजवणे, जसं माझ्यासाठी ती आणि तिच्यासाठी मीच असणे,

मैत्रीच्या नावाखाली हे असचं चालू असतं, कोण विचारेल अगोदर मन वाटचं बघत असतं,

जोड्या स्वर्गात बनतात, त्या अशाच कुठेतरी भेटतात,

कित्येकांचे स्वप्न साकारतात, तर काही पत्यांसारखे कोसळतात,

मी ही आज त्याच वाटेवर चालतोय, माझ्या भावना अशा शब्दात मांडतोय,

कळत नाहीये ती मैत्री आहे की प्रेम, म्हणून तुमच्याकडून ह्या प्रश्नाचे उत्तर मागतोय....


रोज अनेक चेहरे दिसतात

रोज अनेक चेहरे दिसतात
पण कॉलेजमधल्या त्या
चेहऱ्याकडे बघायची
मजा काही वेगळीच होती

हे सर्व आठवल्यावर वाटते
अश्या त्या कॉलेज लाईफ़ची
मजाच काही वेगळीच होती..............


आयुष्यं म्हणजे असतो एक प्रवास

आयुष्यं म्हणजे असतो एक प्रवास
जो सुरु होतो,
आपल्या जन्मापासुन
न कदाचित
मरणानंतरही संपत नाही.

अनेक उन्हाळे-पावसाळे
पहायला मिळतात या प्रवासात.
काही सुखाचे क्षण
अनुभवायला मिळतात,
तर काही कायमचा
धडा शिकवुन जातात

काही स्वप्ने नकळतपणे पाहिली जातात
तर काही जाणुन बुजुन
पण अनेकदा त्यातली काही स्वप्ने
अर्धवटच राहुन जातात

अशा ह्या प्रवासाच्या पुस्तकात
काही पाने नकळत जोडली जातात
तर काही कोरीच राहुन जातात....
आणि मग शेवटी ह्या कोऱ्या
कागदांचे तयार होते एक वेगळेच पुस्तक
ज्याला आपण नाव देतो "माझे आयुष्यं".


एकदाची उगवली ती सकाळ

एकदाची उगवली ती सकाळ
वाट पहात होतो जिची

होते मन उतावीळ
तिच्या तोंडुन ते शब्दं ऎकण्यासाठी

पण ते शब्दं माझ्यासाठी
नव्हतेच कदाचीत

त्यानंतर वाईट असे कधी
वाटलेच नाही

डोळ्यात ह्या अष्रु
कधी तरळलेच नाहीत

ह्या पुढे कदाचीत प्रेमाचा
विचारही हे मन करणार नाही

हसाय्च्याही आधी खुप
वेळा विचार करेल हे मन

आहे खात्री मला ती विसरणार नाही
तरीही मी काही बोलणार नाही

असे असुनही वेडे हे मन माझे
काही केल्या शांत बसेना

आजही मनात कुठेतरी आहे एक आस
की ती येईल परत कदाचित...........