Tuesday, November 6, 2012

आयुष्यं म्हणजे असतो एक प्रवास

आयुष्यं म्हणजे असतो एक प्रवास
जो सुरु होतो,
आपल्या जन्मापासुन
न कदाचित
मरणानंतरही संपत नाही.

अनेक उन्हाळे-पावसाळे
पहायला मिळतात या प्रवासात.
काही सुखाचे क्षण
अनुभवायला मिळतात,
तर काही कायमचा
धडा शिकवुन जातात

काही स्वप्ने नकळतपणे पाहिली जातात
तर काही जाणुन बुजुन
पण अनेकदा त्यातली काही स्वप्ने
अर्धवटच राहुन जातात

अशा ह्या प्रवासाच्या पुस्तकात
काही पाने नकळत जोडली जातात
तर काही कोरीच राहुन जातात....
आणि मग शेवटी ह्या कोऱ्या
कागदांचे तयार होते एक वेगळेच पुस्तक
ज्याला आपण नाव देतो "माझे आयुष्यं".


एकदाची उगवली ती सकाळ

एकदाची उगवली ती सकाळ
वाट पहात होतो जिची

होते मन उतावीळ
तिच्या तोंडुन ते शब्दं ऎकण्यासाठी

पण ते शब्दं माझ्यासाठी
नव्हतेच कदाचीत

त्यानंतर वाईट असे कधी
वाटलेच नाही

डोळ्यात ह्या अष्रु
कधी तरळलेच नाहीत

ह्या पुढे कदाचीत प्रेमाचा
विचारही हे मन करणार नाही

हसाय्च्याही आधी खुप
वेळा विचार करेल हे मन

आहे खात्री मला ती विसरणार नाही
तरीही मी काही बोलणार नाही

असे असुनही वेडे हे मन माझे
काही केल्या शांत बसेना

आजही मनात कुठेतरी आहे एक आस
की ती येईल परत कदाचित...........

आजपर्यंतच्या प्रवासात

आजपर्यंतच्या प्रवासात
अनेक गोष्टी शिकलो

विचार करायला शिकलो
भर दिवसा स्वप्नं बघायला शिकलो

अनेकदा अडखळूनहि पुन्हा
स्वत:ला सावरायला शिकलो

स्वत:साठी जगता जगता
दुसऱ्यांसाठी जगायला शिकलो

शब्दांचे अर्थं समजुन घेऊन
कविता लिहायला शिकलो

छोट्या छोट्या गोष्टींमध्ये
आनंदीत व्हायला शिकलो

स्वत:ला समजुन घेता नाही आले तरी
दुसऱ्यांना ओळखायला शिकलो

एवढे शिकुनही अत्तापर्यंत
"प्रेम" करायला नाही शिकलो............

अंधारलेल्या माझ्या दुनियेत

अंधारलेल्या माझ्या दुनियेत
होतो मी एकटाच जगत..........

होते फ़क्त माझेच शब्दं
माझ्या अवतीभवती

अचानक या दुनियेत आली एक परी
एक आषेचा किरण बनुन.........

बहरली एक नवी उमेद
दिसु लागले सुर्यकिरण..........

शब्दांना माझ्या गवसले अर्थं
माझ्यातच मी झालो धुंद...........

क्षणभर का होईना, वाटू लागले
somewhere I belong

पण विसरलो होतो मी की....
काही स्वप्नं हि स्वप्नंच रहातात
न काही लोक शेवटपर्यंत
"शापित गंधर्व" रहातात.............

Tuesday, November 6, 2012

आयुष्यं म्हणजे असतो एक प्रवास

आयुष्यं म्हणजे असतो एक प्रवास
जो सुरु होतो,
आपल्या जन्मापासुन
न कदाचित
मरणानंतरही संपत नाही.

अनेक उन्हाळे-पावसाळे
पहायला मिळतात या प्रवासात.
काही सुखाचे क्षण
अनुभवायला मिळतात,
तर काही कायमचा
धडा शिकवुन जातात

काही स्वप्ने नकळतपणे पाहिली जातात
तर काही जाणुन बुजुन
पण अनेकदा त्यातली काही स्वप्ने
अर्धवटच राहुन जातात

अशा ह्या प्रवासाच्या पुस्तकात
काही पाने नकळत जोडली जातात
तर काही कोरीच राहुन जातात....
आणि मग शेवटी ह्या कोऱ्या
कागदांचे तयार होते एक वेगळेच पुस्तक
ज्याला आपण नाव देतो "माझे आयुष्यं".


एकदाची उगवली ती सकाळ

एकदाची उगवली ती सकाळ
वाट पहात होतो जिची

होते मन उतावीळ
तिच्या तोंडुन ते शब्दं ऎकण्यासाठी

पण ते शब्दं माझ्यासाठी
नव्हतेच कदाचीत

त्यानंतर वाईट असे कधी
वाटलेच नाही

डोळ्यात ह्या अष्रु
कधी तरळलेच नाहीत

ह्या पुढे कदाचीत प्रेमाचा
विचारही हे मन करणार नाही

हसाय्च्याही आधी खुप
वेळा विचार करेल हे मन

आहे खात्री मला ती विसरणार नाही
तरीही मी काही बोलणार नाही

असे असुनही वेडे हे मन माझे
काही केल्या शांत बसेना

आजही मनात कुठेतरी आहे एक आस
की ती येईल परत कदाचित...........

आजपर्यंतच्या प्रवासात

आजपर्यंतच्या प्रवासात
अनेक गोष्टी शिकलो

विचार करायला शिकलो
भर दिवसा स्वप्नं बघायला शिकलो

अनेकदा अडखळूनहि पुन्हा
स्वत:ला सावरायला शिकलो

स्वत:साठी जगता जगता
दुसऱ्यांसाठी जगायला शिकलो

शब्दांचे अर्थं समजुन घेऊन
कविता लिहायला शिकलो

छोट्या छोट्या गोष्टींमध्ये
आनंदीत व्हायला शिकलो

स्वत:ला समजुन घेता नाही आले तरी
दुसऱ्यांना ओळखायला शिकलो

एवढे शिकुनही अत्तापर्यंत
"प्रेम" करायला नाही शिकलो............

अंधारलेल्या माझ्या दुनियेत

अंधारलेल्या माझ्या दुनियेत
होतो मी एकटाच जगत..........

होते फ़क्त माझेच शब्दं
माझ्या अवतीभवती

अचानक या दुनियेत आली एक परी
एक आषेचा किरण बनुन.........

बहरली एक नवी उमेद
दिसु लागले सुर्यकिरण..........

शब्दांना माझ्या गवसले अर्थं
माझ्यातच मी झालो धुंद...........

क्षणभर का होईना, वाटू लागले
somewhere I belong

पण विसरलो होतो मी की....
काही स्वप्नं हि स्वप्नंच रहातात
न काही लोक शेवटपर्यंत
"शापित गंधर्व" रहातात.............