Tuesday, November 6, 2012

आजपर्यंतच्या प्रवासात

आजपर्यंतच्या प्रवासात
अनेक गोष्टी शिकलो

विचार करायला शिकलो
भर दिवसा स्वप्नं बघायला शिकलो

अनेकदा अडखळूनहि पुन्हा
स्वत:ला सावरायला शिकलो

स्वत:साठी जगता जगता
दुसऱ्यांसाठी जगायला शिकलो

शब्दांचे अर्थं समजुन घेऊन
कविता लिहायला शिकलो

छोट्या छोट्या गोष्टींमध्ये
आनंदीत व्हायला शिकलो

स्वत:ला समजुन घेता नाही आले तरी
दुसऱ्यांना ओळखायला शिकलो

एवढे शिकुनही अत्तापर्यंत
"प्रेम" करायला नाही शिकलो............

अंधारलेल्या माझ्या दुनियेत

अंधारलेल्या माझ्या दुनियेत
होतो मी एकटाच जगत..........

होते फ़क्त माझेच शब्दं
माझ्या अवतीभवती

अचानक या दुनियेत आली एक परी
एक आषेचा किरण बनुन.........

बहरली एक नवी उमेद
दिसु लागले सुर्यकिरण..........

शब्दांना माझ्या गवसले अर्थं
माझ्यातच मी झालो धुंद...........

क्षणभर का होईना, वाटू लागले
somewhere I belong

पण विसरलो होतो मी की....
काही स्वप्नं हि स्वप्नंच रहातात
न काही लोक शेवटपर्यंत
"शापित गंधर्व" रहातात.............

घरात येणाऱ्या प्रत्येक सुर्य किरणांत....

घरात येणाऱ्या प्रत्येक सुर्य किरणांत....

सकाळच्या त्या धुंद वातावरणात..

पक्षांच्या त्या किलबिलाटात.......

घड्याळात वाजणाऱ्या प्रत्येक सेकंदात......

पडणाऱ्या पावसाच्या थेंबात.........

दरवळणाऱ्या मातीच्या सुगंधात......

आठवणीतल्या प्रत्येक दिवसात....

सहज मिळालेल्या रिकम्या वेळात...

अडखळुन पडल्यावर
झालेल्या प्रत्येक जखमेत....

मनात योजलेल्या हर एक कल्पनेत
"जीवन" शोधतो मी..............

जीवन शोधता शोधता
आज स्व:ताला शोधतो मी.............


असं का होतय ?

असं का होतय ?

झोप येत असुनही
जागरण करावेसे वाटते

भुक असुनही
काहीच खावेसे वाटत नाही

"नाही" बोलायचे असतानाही
"हो" का बोलतो मी ?

मनात प्रचंड राग असताना
ओठांवर हसू का येते ?

अपुऱ्या ईछा पुर्ण करुनही
कसलीतरी उणीव का जाणवतेय ?

सगळे जवळ असतानाही
एकटे एकटे का वाटतय ?

Engg पर्यंत कविता काय असते
हे पण माहीत नव्हते
पण अत्ता ही चौथी कविता लिहितोय

कोणी सांगेल का मला
असं का होतय ?


Tuesday, November 6, 2012

आजपर्यंतच्या प्रवासात

आजपर्यंतच्या प्रवासात
अनेक गोष्टी शिकलो

विचार करायला शिकलो
भर दिवसा स्वप्नं बघायला शिकलो

अनेकदा अडखळूनहि पुन्हा
स्वत:ला सावरायला शिकलो

स्वत:साठी जगता जगता
दुसऱ्यांसाठी जगायला शिकलो

शब्दांचे अर्थं समजुन घेऊन
कविता लिहायला शिकलो

छोट्या छोट्या गोष्टींमध्ये
आनंदीत व्हायला शिकलो

स्वत:ला समजुन घेता नाही आले तरी
दुसऱ्यांना ओळखायला शिकलो

एवढे शिकुनही अत्तापर्यंत
"प्रेम" करायला नाही शिकलो............

अंधारलेल्या माझ्या दुनियेत

अंधारलेल्या माझ्या दुनियेत
होतो मी एकटाच जगत..........

होते फ़क्त माझेच शब्दं
माझ्या अवतीभवती

अचानक या दुनियेत आली एक परी
एक आषेचा किरण बनुन.........

बहरली एक नवी उमेद
दिसु लागले सुर्यकिरण..........

शब्दांना माझ्या गवसले अर्थं
माझ्यातच मी झालो धुंद...........

क्षणभर का होईना, वाटू लागले
somewhere I belong

पण विसरलो होतो मी की....
काही स्वप्नं हि स्वप्नंच रहातात
न काही लोक शेवटपर्यंत
"शापित गंधर्व" रहातात.............

घरात येणाऱ्या प्रत्येक सुर्य किरणांत....

घरात येणाऱ्या प्रत्येक सुर्य किरणांत....

सकाळच्या त्या धुंद वातावरणात..

पक्षांच्या त्या किलबिलाटात.......

घड्याळात वाजणाऱ्या प्रत्येक सेकंदात......

पडणाऱ्या पावसाच्या थेंबात.........

दरवळणाऱ्या मातीच्या सुगंधात......

आठवणीतल्या प्रत्येक दिवसात....

सहज मिळालेल्या रिकम्या वेळात...

अडखळुन पडल्यावर
झालेल्या प्रत्येक जखमेत....

मनात योजलेल्या हर एक कल्पनेत
"जीवन" शोधतो मी..............

जीवन शोधता शोधता
आज स्व:ताला शोधतो मी.............


असं का होतय ?

असं का होतय ?

झोप येत असुनही
जागरण करावेसे वाटते

भुक असुनही
काहीच खावेसे वाटत नाही

"नाही" बोलायचे असतानाही
"हो" का बोलतो मी ?

मनात प्रचंड राग असताना
ओठांवर हसू का येते ?

अपुऱ्या ईछा पुर्ण करुनही
कसलीतरी उणीव का जाणवतेय ?

सगळे जवळ असतानाही
एकटे एकटे का वाटतय ?

Engg पर्यंत कविता काय असते
हे पण माहीत नव्हते
पण अत्ता ही चौथी कविता लिहितोय

कोणी सांगेल का मला
असं का होतय ?