Monday, July 30, 2012

स्वप्नांवर माणूस जगतो का?



मला वाटत बरीच माणसे आपल्या मनातील भावना न दाखवता आपल्या अंतरमनात साठऊन तसेच जीवन जगत असतात .त्या आठवणीच्या स्वप्नातच आपण सारे जगत असतो. आणि एखाद्या आठवणींच्या स्वप्नावरच आपण झोपत असतो.आणि त्यात रमतो सुद्धा, पण जाग येईपर्यंतच.

जागेपणीही स्वप्ने उराशी बाळगली तर परत झोपण्याची वेळ येते माणसावर.
मला वाटत आपण सारे स्वप्नावरच जगत असतो.`कारण जशी एखादी सुगंधीत अगरबत्ती स्वत: जळून दुसर्‍यासाठी सुगंध दरवळत असते.मला वाटत चांगली  सुगंधीत अगरबत्ती आणि स्वप्न यांचा अगदी जवळचा संबंध आहे,कारण शेवठी दोघांची ही रखाच होते. 

हो आणि ते आपल्या माणण्यावर -सुद्धा आहे. काहीजण ही अशी मजेशीर,आपल्याला शिकवण देणारी स्वप्ने घाबरून किवा त्यांचा तिरस्कार वाटून ती धुडकाऊन लावत असतात .
जेव्हा कधी माझे मन बैचेन होते त्या-त्या वेळी मी स्वप्नांचा आधार घेतल्याशिवाय राहत नाही.आणि हीच स्वप्ने आपल्याला जीवन जगण्याची दिशा ऊमेदिने दाखवत आसतात. आपल्याला फक्त ती ओळखता आली पाहिजेत.स्वप्न म्हणजेच मानसच्या मनातील स्फूर्ति होय. जी मोठ्या मनाची माणसे असतात त्यांनाच त्या स्वप्नांचा अर्थ समजतो.स्वप्न नसेल तर आपल मन एखाद्या ओसाड माळरानाप्रमाणे होऊन जात. 

मी मात्र स्वप्नात जेवढा रमतो , तेवढा कशातच रमत नाही .काही माणसे स्वप्नांची आठवण झाली की तळमळत असतात.मी त्या स्वप्नांनमध्येच सुखावतो.कारण-
 स्वप्न मात्र माझ्या मालकीची आहेत.जीवन माझ्या मालकीच नाही.त्यामुळे स्वप्नांत मला हव्या-त्या सगळ्या गोष्टी घडू शकतात. पाहिजे त्या व्यक्ति भेटू शकतात. पुन्हा त्यात कुणाचीही भीती नाही. ना घरातल्यांची नाही,
 ना बाहेरच्यांची.

आणि स्टेटस- स्टेटस काय ते अगदी अबाधित राहत

.
वैभव ..............


ते दिवस म्हणजे ..


ते दिवस म्हणजे तारुण्यातील बेरीज-वजाबाकीचा आलेखच ......
तारुण्यआयुष्यातील सळसळत्या उत्साहाचा काळ.
प्रेम करण्याचा, प्रेमात हरवण्याचा,प्रेमासाठी वाट्टेलते करण्याचा.
स्वताची झालेली फटफजिती कबुल करण्याचा,दुसर्याची गंमत मजेतच दुरून बघण्याचा एक वेगळा आनंद .
पण कधीकधी भलतीच ठेच लागते, अगदी जिव्हारी लागते.
विसरू म्हणता विसरता येत नाही .नकळत झालेली चूक स्वीकारताही येत नाही.वास्तवाला सामोरे जायचे धैर्य
कधी-कधी दाखवावे लागते.प्रेमात पडल्यावर दुखरा कोपरा मनात तसाच ठेऊन काहीजण जगत असतात.
काही त्यातून बाहेरच येत नाहीत .
मागचे भोग विसरून वाटेला आलेल्या मार्गाने नेटकेपणाने चालणारे मोजकेच असतात .
तर काहीजण जीवनात भलत्याच काळ्या वाटेने जाऊन फसवे सुख मिळवतात .
प्रेमातील निरनिराळ्या छटा,त्यातील आत्मीयता, जोम,वेळेनुसार असफल झालेल्या प्रेमातील वेदना,कारुण्य,
तडजोड,सच्चेपणा,
या सर्व आठवणी कधी-कधी विनोदाने मनाला खुद्कन हसवणार्या,तर कधी डोळ्यांच्या कडा ओल्या करणार्या असता

वैभव......

Monday, July 16, 2012

माझ्या स्मरणातील एक आठवण ...............



मला चांगलं आठवतय त्या दिवशी मी माझ्या मित्राच्या घरी गेलो होतो. माझ काम उरकून मी पुन्हा घरी यायला निघालो. मी माझी बाइक रस्त्यातच उभीकरून गेलो होतो .मी गाडीच्या दिशेनं येत होतो तेवड्यात मला मित्राचा फोन आला नेहमीच्या सवयी प्रमाणे मी फोन रिसिव करत-करत मी गाडीची किक मारणार एवढ्यात माझ्या समोर अचानक वीज चमकावी तसा मी बिथरलो पूर्वीच्या सर्व आठवणी अंतकरनात उफाळून येत घर करू लागल्या होत्या. मी कसाबसा हातातील मोबाईल सावरत मित्राला बर-बर म्हणत फोन ठेवला आणि मी एक क्षणभर स्तब्ध उभा राहिलो.समोर माझ्या स्मरणातील एक चेहरा समोरून येतांना मला दिसला तो दूसरा कोणी नसून तीच होती ती. मी एक मिनिट भर तिच्या डोळ्यात पाहत उभा होतो.मला असा अचानक आपल्या समोर बेधडक उभा बघूण तीही क्षणभर बावरून गेली. तिच्या सोबत तिची आई पण होती वाटत .माझ्या वरील आपली नजर चोरत ती आई च्या मागून जात  त्या दोघी समोरील दुकानाच्या दिशेने गेल्या मी माझी बाइक ढकलत जरा पुढे गेलो व तिच्या दिशेने पाहू लागलो  “त्यावेळी माझ मन मला सांगत होत की,का वेड्या मला पुन्हा-पुन्हा त्या आठवणीच्या वेदना देतोस,ती विसरली ही असेल तूला आणि तुझ्या त्या नजर भेटीला ” तरी ही मी तिच्या माठमोर्‍या चेहर्‍याकडे  पाहत उभा होतो. मला माझ्या मनाचे संकेत खरेच वाटू लागले होते. “कि ती विसरली विसरली ही असेल मला”,हा विचार मनात येतो-न-तोच तीने मागे वळून माज्यावर एक कटाक्ष्य टाकला ,मी एकदम सुखाऊन गेलो तिच्या त्या नजरेत अस काही सामर्थ्य होते कि माझ्या मनात दोन वर्षापूर्वीवीच्या त्या नजर भेटीक्या आठवणी ताज्या झाल्या . तिच्या डोळ्यात एक विलक्षण तेज होते ,ते तेज मला रोज जीवन जगण्याची एक नवी दिशा दाखवत होते.मीपण त्यातच समाधान मानत असे .”माझ्या आयुष्यातील  ती पहिलीच मुलगी होती ती ,तिच्या डोळ्यातील तेज मला तिच्याकडे आकर्षित करत होते,मी मात्र तिच्या नजर भेटीतच माझे विश्व शोधत होतो “.

त्या दोघी परत माझ्या दिशेने येऊ लागल्या मी क्षणभर स्तब्ध राहून आजू-बाजूला नजर फिरवीत  पुन्हा तिच्या दिशेने पाहू लागलो तिच्या समवेत तिची आई असावी,तिच्या आईच्या डोळ्यात एक स्मित हास्य मला दिसत होते.”ती आपल्या मनात म्हणत असेल की काय बाई ही आज कालची मूल मुलगी दिसली कि “अचानक  काहीतरी हरवल्यागत घुटमळत राहतात “.  “ मी तिच्या आई ची नजर चुकवित पुन्हा तीच्या नजरेचा आनंद अनुभवू लागलो आणि क्षनातच माय-लेक माझ्या बाजूने पुढे-पुढे  चालत जाऊ लागल्या .............................

मी तसाच गाडीवर बसून मागे वळून तीच्या नजर कटाक्षाची वाट बघत होतो. आता मात्र तिने माघे वळून पहिले नाही हातातील पिशवी पायात रेंगाळत तशीच ती चालत राहिली आणि तीला शक्य ही झाले नसते...........................
हा आमच्या नजर भेटीचा खेळ फक्त पाच-ते –सहा मिनटेच चालला.मी ही स्वताला क्षणभर सावरत आपल्याकडे कोणी पाहत तर नाही ना याचा अंदाज  घेत पुढे निघून गेलो ........त्यावेळी जाताना माझ्या मध्ये एक वेगळीच स्फूर्ति निर्माण होत होती.मला गगन ठेंगण झाल्या सारख वाटत होत .पण मनात मात्र एक प्रकारची भीती पण वाटत होती.कारण तीच्या मनात काय चालयल हे तर मला माहीतच नव्हतं “कारण मी उगाचच तिचा विचार करून माझ्या स्थिर मनाला बैचेन करत होतो .”तीच्या मनात तसे नसेल ही काही ,पण तीच्या मुळे मला क्षनिक का होईना समाधान मिळत होते.  

झाले दोनदिवस असेच गेले  त्या दोन दिवसात माझे मन एवढे  बैचेन झाले  कि मला क्षना- क्षनाला तिचे ते बोलके  डोळे माझ्या नजरे समोर येत असत .पण मी माझ्या मानला समजावत होतो कि कशाला उगाचच नकोत्या कटकटी आपल्या मागे लाऊन घ्या.कारण आमच्या कुडाळ परिसरात माझ्या “वैभव कुडतरकर ”या नावाला किंमत –एक वट होती ,बर्‍याच मोठ मोठ्या लोकांमध्ये  वावरणारा मी ,त्यांच्या मनात  मी एक चांगला मुलगा म्हणून असलेली मूर्ति मला बेरंग कराची  नव्हती,कारण मला माहीत होत कि नाव कंमवायला संपूर्ण आयुष्य जात ,पण ते कमवलेल नाव घालवण्यासाठी एक कारण पुरेसं असतं “.मला मात्र तस काही कराच नव्हत .पण   त्यादिवशी नियतीच्या मनात काही वेगळच होत .कॉलेज मध्ये थोडा अगोदरच उशीरच झाला होता, पोटात भुकपण जोराची होती, सरल गाडी घेऊन आमच्या ऑफिस जवळ आलो व माझी बॅग ऑफिस मध्ये ठेऊन घरी जाण्यासाठी निघालो पावसाचे दिवस होते. आभाळ चारी बाजूंनी भरून आले होते . मी माझा रेनसिटर अंगात चढवत माझ्या गाडीच्या दिशेने जात होतो तोच माझ्या लाक्षात  आल कि आपल्याला कोणी तरी नेहाळतय म्हणून मी रेनसीटरची हाताची बटणे लावत-लावत समोर पहिले ,समोर एक गाडी उभी होती आणि तीच “नजर”  मला नेहाळत होती. म्हणजे माझे डोळे त्या नजरेची वाट  बघत होते . तीच होती ती . मी क्षनभर माझे डोळे मिटून एक दीर्घ श्वास घेतला व संपूर्ण अंग शहारल्या गत स्तब्ध उभा राहिलो .लगेचच मी तीच्याकडे नजर फिरवली ,तिचे डोळे मला काही तरी सांगत होते. क्षनात माझ्या मनाने मला जाणीव करून दिली कि,”वैभव तू पुन्हा उगाचच अडकतो आहेस बघ .........मी स्वताला सावरत माझ्या गाडीवर बसलो ,गाडीची किक कधी सहज न बसणारी त्यावेळी अगदी सहज बसली ,मी गाडी वळवली आणि पुन्हा एक क्षन तीच्या कडे पहिले ,तिने पण माझ्या कडे पाहून न पाहिल्या सारखे करत नजर फिरवली . “त्यावेळी माझ मन मला सांगत कि “, “ती मनात म्हणत असेल कि अरे वेड्या तू माझ्यावर एवढ प्रेम करतोस ,निदान माझ नाव तरी विचार मला”. त्यावेळी तिच्या सोबत तिचा पाच-सहा वर्षाचा भाऊ पण होता .”त्याच वेळी माझ्या मनात एक विचार येऊन गेला कि मला पण एक बहीण आहे. आणि तीच्या बाबतीत असे काही ............ष्ये मी तो विचार ही करू शकत नव्हतो .मग ती पण दुसर्‍या कुणाची बहीण आहेच ना”.

मी स्वताला सावरत विलंब न लावता तिथुन पुढे निघून गेलो. पुढे गाडी वळवताना माझी नजर पुन्हा गाडीच्या दिशेने वळली ,मागे पाहतो तर काय तिची नजर माझ्या नजरेची मागे वळून आतुरतेने वाट पाहत होती .....................................   
माझ मन अजूनही ती नजर विसरायला तयार नाही .माझ्या बाबतीत हा मुलीचा पहिलाच प्रसंग होता. आज-काल मी ते एक माझ्या जागेपणीतले स्वप्न होते असेच समजून विसरून जायचा प्रयत्न करतोय. याच्या अगोधर कुठल्या  मुलीच्या नजरेला –नजर भिडवण्याची माझी हिम्मतच नाही झाली .पण मात्र हिच्या बाबतीत तसे काही घडे नाही. कारण तिच्या नजरेत असे काही सामर्थ्य होते की मी तिच्या कडे आकर्षित झालो होतो. पण आपलेच नशीब अशा घटना घालून आपली परिक्षाच घेत असते  जणू.
मी एक मोठ्या मनाचा मुलगा आहे. आता मी हे सर्व विसरून माझ्या करीअर कडे लक्ष्य केन्द्रित केले आहे. कारण नुसत्या कल्पना करून पोट भरत नसत . आज काल च्या काळात पैसाच हा सर्वस्व आहे.पैसा असेलतर सर्व काही या दुनियेत शक्य आहे .मला पण मोठं बणायचे खूप नाव नाव कमवयचे . आपल आयुष्य हे आपल्यालाच  घडवायच असत. वेळ निघून गेल्यावर उगाचच नशिबाला दोष देत बसण्या पेक्षा असलेल्या वेळेचा योग्य उपयोग करून घेण हे आपल्याच हातात असत.तसे माझ्यावर माझ्या आई-वडिलांचे चांगले संस्कार पण आहेत. चांगले काय आणि वाईट काय याचा चांगला निवडा करता येत होता. मी माझ्या आईकडून एक गोष्ट शिकलो होतो ती अशी की “पुरुष हा व्रुक्षा प्रमाणे असतो आणि स्त्री ही वेली प्रमाणे असते. वेलीने फुलताना नेहमी झाडाचा आधार घ्यावा  नाहीतर ती तुडवली जाण्याची क्षक्यता असते आणि पुरुषाने आयूष्यात एका वेलीला आधार द्यायचा असतो. आणि आपल्या आयुष्यात जी कोण येईल तिच्यातच आपल सुख मानून तिला आधार द्यायचा असतो.  
        
आमचे सर आम्हाला नेहमी सांगायचे कि माणसाने प्रेमात पडून “चटके बसून सुद्धा गोड वाटणारं सुख” आयुष्यात एकदातरी अनुभवावे आणि ते क्षण प्रत्येकाच्या नशिबात नसतात . मी मात्र त्याला अपवाद होतो . मात्र त्या स्थितीत एका सुखद क्षनाची आणि आपल्या कर्तव्याची जाणीव मात्र वार्ंवार होत राहते हे खर.

                        शेवटी  पहिलं प्रेम हे पहिलं प्रेम असतं ......................              
                              माझ्या मते ती तशी मुलगी नसवी .तिच्या नजरेत मला दुसर्‍या बद्दल नेहमी आदराची भावना दिसे .शेवट पर्यंत तिच नाव पण माल माहीत नव्हतं आता मात्र माहीत आहे. अशी कोणतीही घटना घडली कि मला तिची आठवण आल्याशिवाय राहत नाही .
नभ फाटून वीज पडावी आणि एकच कल्लोळ व्हावा मी तसाच अगतिक व्हायचो .माझ्या अशा वागण्यामुळे तिला कदाचित त्रास ही झाला असेल या अपराधा बद्दल तिने मला माफ काराव एवढच. 

शेवटी  नशिबात जे काही विधात्याने लिहिले असेल तेच घडते ........................  

आता माझ मन पांढर्‍याशुभ्र आकाशाप्रमाणे स्वच्छ आहे. असे मनात वादळ निर्माण करणारे संशयाचे ढग मी कायमचे घालवून टाकले आहेत. मी फक्त आता माझ्या बद्दलच विचार करतोय सर्वांबरोबर पुढे चाललोय. एकदा जीवनात सेटल झालं की ह्या सर्व गोष्टी माणसाच्या आयुष्यात येत जातात.आपण उगाचच त्यांच्या मागे-मागे धावत असतो आणि आपला मार्ग हरवून बसतो.
मित्रांनो माझी ही आठवण तुम्हाला नक्कीच आवडली असेल यातील चांगलं तेवढ घ्या येवढच मी तुम्हाला सांगू इच्छितो.                         
                                                                         
                                                                             
                                                               

                                                    वैभव .......................

                                                       ती   A.............. a





वरील फोटो तिचा नसून फक्त हि साधारण तिच्या सारखी दिसते म्हणून वापरला गेला आहे तुम्हाला आणखी संशय नको ......

Saturday, July 14, 2012

त्या प्रेमाची आठवण...!


त्या प्रेमाची आठवण...!
मी बरसलो आज शब्दांतुन ,
तीला एकही शब्द ना कळला कधीमी ओघळलो आज डोळ्यांतुन ,
तीचा थेबंही ना गळला कधी.
सोडुन मान सन्मान माझा मीच दगडापुढे हात जोडीले मी कोसळलो दरड होऊन ,
तीचा एकही बुरुज ना ढळला कधी.
तीची एकही बोली नाही आज लिलावात या माझ्यामी बसलो बाजार मांडून ,
तीने भाव माझा ना विचारला कधी.
आयुष्यभर तीच्या कुपंणाबाहेर जागा माझी नित्याचीमी राहीलो कुंपण बनुन ,
तीने हा निवडूंग अंगणात ना लावला कधी.
सा-याच राती तीच्या चादंण्याच्यां मिठीत गेल्या मी जगलो काजवा होऊन ,
तीला उजेड माझा ना दिसला कधी.
आठवतय रोज जाळं तीच पसरवण तळ्यात चद्रंबिबांसाठीमी राहीलो शिपलं बनुन ,
माझ्यातला मोती तीने ना शोधला कधी
मी होतो पाखरु जळणारा ती ज्योत होती मला जाळणारी मी जळालो पाखरु बनुन ,
तिला एकही चटका ना लागला कधी.
मी लाचार इतका की आज माझीच कीव मज यावीमी मला दिले आगीत झोकून ,
तीचा धुराकडेही जिव ना वळला कधी.
आता मज नकोच तिच्या प्रेमाच्या उसण्या त्या थापामी चाललो स्वप्न मोडुन ,
तीने स्वप्नांतही मला ना सोडला कधी।

Monday, July 30, 2012

स्वप्नांवर माणूस जगतो का?



मला वाटत बरीच माणसे आपल्या मनातील भावना न दाखवता आपल्या अंतरमनात साठऊन तसेच जीवन जगत असतात .त्या आठवणीच्या स्वप्नातच आपण सारे जगत असतो. आणि एखाद्या आठवणींच्या स्वप्नावरच आपण झोपत असतो.आणि त्यात रमतो सुद्धा, पण जाग येईपर्यंतच.

जागेपणीही स्वप्ने उराशी बाळगली तर परत झोपण्याची वेळ येते माणसावर.
मला वाटत आपण सारे स्वप्नावरच जगत असतो.`कारण जशी एखादी सुगंधीत अगरबत्ती स्वत: जळून दुसर्‍यासाठी सुगंध दरवळत असते.मला वाटत चांगली  सुगंधीत अगरबत्ती आणि स्वप्न यांचा अगदी जवळचा संबंध आहे,कारण शेवठी दोघांची ही रखाच होते. 

हो आणि ते आपल्या माणण्यावर -सुद्धा आहे. काहीजण ही अशी मजेशीर,आपल्याला शिकवण देणारी स्वप्ने घाबरून किवा त्यांचा तिरस्कार वाटून ती धुडकाऊन लावत असतात .
जेव्हा कधी माझे मन बैचेन होते त्या-त्या वेळी मी स्वप्नांचा आधार घेतल्याशिवाय राहत नाही.आणि हीच स्वप्ने आपल्याला जीवन जगण्याची दिशा ऊमेदिने दाखवत आसतात. आपल्याला फक्त ती ओळखता आली पाहिजेत.स्वप्न म्हणजेच मानसच्या मनातील स्फूर्ति होय. जी मोठ्या मनाची माणसे असतात त्यांनाच त्या स्वप्नांचा अर्थ समजतो.स्वप्न नसेल तर आपल मन एखाद्या ओसाड माळरानाप्रमाणे होऊन जात. 

मी मात्र स्वप्नात जेवढा रमतो , तेवढा कशातच रमत नाही .काही माणसे स्वप्नांची आठवण झाली की तळमळत असतात.मी त्या स्वप्नांनमध्येच सुखावतो.कारण-
 स्वप्न मात्र माझ्या मालकीची आहेत.जीवन माझ्या मालकीच नाही.त्यामुळे स्वप्नांत मला हव्या-त्या सगळ्या गोष्टी घडू शकतात. पाहिजे त्या व्यक्ति भेटू शकतात. पुन्हा त्यात कुणाचीही भीती नाही. ना घरातल्यांची नाही,
 ना बाहेरच्यांची.

आणि स्टेटस- स्टेटस काय ते अगदी अबाधित राहत

.
वैभव ..............


ते दिवस म्हणजे ..


ते दिवस म्हणजे तारुण्यातील बेरीज-वजाबाकीचा आलेखच ......
तारुण्यआयुष्यातील सळसळत्या उत्साहाचा काळ.
प्रेम करण्याचा, प्रेमात हरवण्याचा,प्रेमासाठी वाट्टेलते करण्याचा.
स्वताची झालेली फटफजिती कबुल करण्याचा,दुसर्याची गंमत मजेतच दुरून बघण्याचा एक वेगळा आनंद .
पण कधीकधी भलतीच ठेच लागते, अगदी जिव्हारी लागते.
विसरू म्हणता विसरता येत नाही .नकळत झालेली चूक स्वीकारताही येत नाही.वास्तवाला सामोरे जायचे धैर्य
कधी-कधी दाखवावे लागते.प्रेमात पडल्यावर दुखरा कोपरा मनात तसाच ठेऊन काहीजण जगत असतात.
काही त्यातून बाहेरच येत नाहीत .
मागचे भोग विसरून वाटेला आलेल्या मार्गाने नेटकेपणाने चालणारे मोजकेच असतात .
तर काहीजण जीवनात भलत्याच काळ्या वाटेने जाऊन फसवे सुख मिळवतात .
प्रेमातील निरनिराळ्या छटा,त्यातील आत्मीयता, जोम,वेळेनुसार असफल झालेल्या प्रेमातील वेदना,कारुण्य,
तडजोड,सच्चेपणा,
या सर्व आठवणी कधी-कधी विनोदाने मनाला खुद्कन हसवणार्या,तर कधी डोळ्यांच्या कडा ओल्या करणार्या असता

वैभव......

Monday, July 16, 2012

माझ्या स्मरणातील एक आठवण ...............



मला चांगलं आठवतय त्या दिवशी मी माझ्या मित्राच्या घरी गेलो होतो. माझ काम उरकून मी पुन्हा घरी यायला निघालो. मी माझी बाइक रस्त्यातच उभीकरून गेलो होतो .मी गाडीच्या दिशेनं येत होतो तेवड्यात मला मित्राचा फोन आला नेहमीच्या सवयी प्रमाणे मी फोन रिसिव करत-करत मी गाडीची किक मारणार एवढ्यात माझ्या समोर अचानक वीज चमकावी तसा मी बिथरलो पूर्वीच्या सर्व आठवणी अंतकरनात उफाळून येत घर करू लागल्या होत्या. मी कसाबसा हातातील मोबाईल सावरत मित्राला बर-बर म्हणत फोन ठेवला आणि मी एक क्षणभर स्तब्ध उभा राहिलो.समोर माझ्या स्मरणातील एक चेहरा समोरून येतांना मला दिसला तो दूसरा कोणी नसून तीच होती ती. मी एक मिनिट भर तिच्या डोळ्यात पाहत उभा होतो.मला असा अचानक आपल्या समोर बेधडक उभा बघूण तीही क्षणभर बावरून गेली. तिच्या सोबत तिची आई पण होती वाटत .माझ्या वरील आपली नजर चोरत ती आई च्या मागून जात  त्या दोघी समोरील दुकानाच्या दिशेने गेल्या मी माझी बाइक ढकलत जरा पुढे गेलो व तिच्या दिशेने पाहू लागलो  “त्यावेळी माझ मन मला सांगत होत की,का वेड्या मला पुन्हा-पुन्हा त्या आठवणीच्या वेदना देतोस,ती विसरली ही असेल तूला आणि तुझ्या त्या नजर भेटीला ” तरी ही मी तिच्या माठमोर्‍या चेहर्‍याकडे  पाहत उभा होतो. मला माझ्या मनाचे संकेत खरेच वाटू लागले होते. “कि ती विसरली विसरली ही असेल मला”,हा विचार मनात येतो-न-तोच तीने मागे वळून माज्यावर एक कटाक्ष्य टाकला ,मी एकदम सुखाऊन गेलो तिच्या त्या नजरेत अस काही सामर्थ्य होते कि माझ्या मनात दोन वर्षापूर्वीवीच्या त्या नजर भेटीक्या आठवणी ताज्या झाल्या . तिच्या डोळ्यात एक विलक्षण तेज होते ,ते तेज मला रोज जीवन जगण्याची एक नवी दिशा दाखवत होते.मीपण त्यातच समाधान मानत असे .”माझ्या आयुष्यातील  ती पहिलीच मुलगी होती ती ,तिच्या डोळ्यातील तेज मला तिच्याकडे आकर्षित करत होते,मी मात्र तिच्या नजर भेटीतच माझे विश्व शोधत होतो “.

त्या दोघी परत माझ्या दिशेने येऊ लागल्या मी क्षणभर स्तब्ध राहून आजू-बाजूला नजर फिरवीत  पुन्हा तिच्या दिशेने पाहू लागलो तिच्या समवेत तिची आई असावी,तिच्या आईच्या डोळ्यात एक स्मित हास्य मला दिसत होते.”ती आपल्या मनात म्हणत असेल की काय बाई ही आज कालची मूल मुलगी दिसली कि “अचानक  काहीतरी हरवल्यागत घुटमळत राहतात “.  “ मी तिच्या आई ची नजर चुकवित पुन्हा तीच्या नजरेचा आनंद अनुभवू लागलो आणि क्षनातच माय-लेक माझ्या बाजूने पुढे-पुढे  चालत जाऊ लागल्या .............................

मी तसाच गाडीवर बसून मागे वळून तीच्या नजर कटाक्षाची वाट बघत होतो. आता मात्र तिने माघे वळून पहिले नाही हातातील पिशवी पायात रेंगाळत तशीच ती चालत राहिली आणि तीला शक्य ही झाले नसते...........................
हा आमच्या नजर भेटीचा खेळ फक्त पाच-ते –सहा मिनटेच चालला.मी ही स्वताला क्षणभर सावरत आपल्याकडे कोणी पाहत तर नाही ना याचा अंदाज  घेत पुढे निघून गेलो ........त्यावेळी जाताना माझ्या मध्ये एक वेगळीच स्फूर्ति निर्माण होत होती.मला गगन ठेंगण झाल्या सारख वाटत होत .पण मनात मात्र एक प्रकारची भीती पण वाटत होती.कारण तीच्या मनात काय चालयल हे तर मला माहीतच नव्हतं “कारण मी उगाचच तिचा विचार करून माझ्या स्थिर मनाला बैचेन करत होतो .”तीच्या मनात तसे नसेल ही काही ,पण तीच्या मुळे मला क्षनिक का होईना समाधान मिळत होते.  

झाले दोनदिवस असेच गेले  त्या दोन दिवसात माझे मन एवढे  बैचेन झाले  कि मला क्षना- क्षनाला तिचे ते बोलके  डोळे माझ्या नजरे समोर येत असत .पण मी माझ्या मानला समजावत होतो कि कशाला उगाचच नकोत्या कटकटी आपल्या मागे लाऊन घ्या.कारण आमच्या कुडाळ परिसरात माझ्या “वैभव कुडतरकर ”या नावाला किंमत –एक वट होती ,बर्‍याच मोठ मोठ्या लोकांमध्ये  वावरणारा मी ,त्यांच्या मनात  मी एक चांगला मुलगा म्हणून असलेली मूर्ति मला बेरंग कराची  नव्हती,कारण मला माहीत होत कि नाव कंमवायला संपूर्ण आयुष्य जात ,पण ते कमवलेल नाव घालवण्यासाठी एक कारण पुरेसं असतं “.मला मात्र तस काही कराच नव्हत .पण   त्यादिवशी नियतीच्या मनात काही वेगळच होत .कॉलेज मध्ये थोडा अगोदरच उशीरच झाला होता, पोटात भुकपण जोराची होती, सरल गाडी घेऊन आमच्या ऑफिस जवळ आलो व माझी बॅग ऑफिस मध्ये ठेऊन घरी जाण्यासाठी निघालो पावसाचे दिवस होते. आभाळ चारी बाजूंनी भरून आले होते . मी माझा रेनसिटर अंगात चढवत माझ्या गाडीच्या दिशेने जात होतो तोच माझ्या लाक्षात  आल कि आपल्याला कोणी तरी नेहाळतय म्हणून मी रेनसीटरची हाताची बटणे लावत-लावत समोर पहिले ,समोर एक गाडी उभी होती आणि तीच “नजर”  मला नेहाळत होती. म्हणजे माझे डोळे त्या नजरेची वाट  बघत होते . तीच होती ती . मी क्षनभर माझे डोळे मिटून एक दीर्घ श्वास घेतला व संपूर्ण अंग शहारल्या गत स्तब्ध उभा राहिलो .लगेचच मी तीच्याकडे नजर फिरवली ,तिचे डोळे मला काही तरी सांगत होते. क्षनात माझ्या मनाने मला जाणीव करून दिली कि,”वैभव तू पुन्हा उगाचच अडकतो आहेस बघ .........मी स्वताला सावरत माझ्या गाडीवर बसलो ,गाडीची किक कधी सहज न बसणारी त्यावेळी अगदी सहज बसली ,मी गाडी वळवली आणि पुन्हा एक क्षन तीच्या कडे पहिले ,तिने पण माझ्या कडे पाहून न पाहिल्या सारखे करत नजर फिरवली . “त्यावेळी माझ मन मला सांगत कि “, “ती मनात म्हणत असेल कि अरे वेड्या तू माझ्यावर एवढ प्रेम करतोस ,निदान माझ नाव तरी विचार मला”. त्यावेळी तिच्या सोबत तिचा पाच-सहा वर्षाचा भाऊ पण होता .”त्याच वेळी माझ्या मनात एक विचार येऊन गेला कि मला पण एक बहीण आहे. आणि तीच्या बाबतीत असे काही ............ष्ये मी तो विचार ही करू शकत नव्हतो .मग ती पण दुसर्‍या कुणाची बहीण आहेच ना”.

मी स्वताला सावरत विलंब न लावता तिथुन पुढे निघून गेलो. पुढे गाडी वळवताना माझी नजर पुन्हा गाडीच्या दिशेने वळली ,मागे पाहतो तर काय तिची नजर माझ्या नजरेची मागे वळून आतुरतेने वाट पाहत होती .....................................   
माझ मन अजूनही ती नजर विसरायला तयार नाही .माझ्या बाबतीत हा मुलीचा पहिलाच प्रसंग होता. आज-काल मी ते एक माझ्या जागेपणीतले स्वप्न होते असेच समजून विसरून जायचा प्रयत्न करतोय. याच्या अगोधर कुठल्या  मुलीच्या नजरेला –नजर भिडवण्याची माझी हिम्मतच नाही झाली .पण मात्र हिच्या बाबतीत तसे काही घडे नाही. कारण तिच्या नजरेत असे काही सामर्थ्य होते की मी तिच्या कडे आकर्षित झालो होतो. पण आपलेच नशीब अशा घटना घालून आपली परिक्षाच घेत असते  जणू.
मी एक मोठ्या मनाचा मुलगा आहे. आता मी हे सर्व विसरून माझ्या करीअर कडे लक्ष्य केन्द्रित केले आहे. कारण नुसत्या कल्पना करून पोट भरत नसत . आज काल च्या काळात पैसाच हा सर्वस्व आहे.पैसा असेलतर सर्व काही या दुनियेत शक्य आहे .मला पण मोठं बणायचे खूप नाव नाव कमवयचे . आपल आयुष्य हे आपल्यालाच  घडवायच असत. वेळ निघून गेल्यावर उगाचच नशिबाला दोष देत बसण्या पेक्षा असलेल्या वेळेचा योग्य उपयोग करून घेण हे आपल्याच हातात असत.तसे माझ्यावर माझ्या आई-वडिलांचे चांगले संस्कार पण आहेत. चांगले काय आणि वाईट काय याचा चांगला निवडा करता येत होता. मी माझ्या आईकडून एक गोष्ट शिकलो होतो ती अशी की “पुरुष हा व्रुक्षा प्रमाणे असतो आणि स्त्री ही वेली प्रमाणे असते. वेलीने फुलताना नेहमी झाडाचा आधार घ्यावा  नाहीतर ती तुडवली जाण्याची क्षक्यता असते आणि पुरुषाने आयूष्यात एका वेलीला आधार द्यायचा असतो. आणि आपल्या आयुष्यात जी कोण येईल तिच्यातच आपल सुख मानून तिला आधार द्यायचा असतो.  
        
आमचे सर आम्हाला नेहमी सांगायचे कि माणसाने प्रेमात पडून “चटके बसून सुद्धा गोड वाटणारं सुख” आयुष्यात एकदातरी अनुभवावे आणि ते क्षण प्रत्येकाच्या नशिबात नसतात . मी मात्र त्याला अपवाद होतो . मात्र त्या स्थितीत एका सुखद क्षनाची आणि आपल्या कर्तव्याची जाणीव मात्र वार्ंवार होत राहते हे खर.

                        शेवटी  पहिलं प्रेम हे पहिलं प्रेम असतं ......................              
                              माझ्या मते ती तशी मुलगी नसवी .तिच्या नजरेत मला दुसर्‍या बद्दल नेहमी आदराची भावना दिसे .शेवट पर्यंत तिच नाव पण माल माहीत नव्हतं आता मात्र माहीत आहे. अशी कोणतीही घटना घडली कि मला तिची आठवण आल्याशिवाय राहत नाही .
नभ फाटून वीज पडावी आणि एकच कल्लोळ व्हावा मी तसाच अगतिक व्हायचो .माझ्या अशा वागण्यामुळे तिला कदाचित त्रास ही झाला असेल या अपराधा बद्दल तिने मला माफ काराव एवढच. 

शेवटी  नशिबात जे काही विधात्याने लिहिले असेल तेच घडते ........................  

आता माझ मन पांढर्‍याशुभ्र आकाशाप्रमाणे स्वच्छ आहे. असे मनात वादळ निर्माण करणारे संशयाचे ढग मी कायमचे घालवून टाकले आहेत. मी फक्त आता माझ्या बद्दलच विचार करतोय सर्वांबरोबर पुढे चाललोय. एकदा जीवनात सेटल झालं की ह्या सर्व गोष्टी माणसाच्या आयुष्यात येत जातात.आपण उगाचच त्यांच्या मागे-मागे धावत असतो आणि आपला मार्ग हरवून बसतो.
मित्रांनो माझी ही आठवण तुम्हाला नक्कीच आवडली असेल यातील चांगलं तेवढ घ्या येवढच मी तुम्हाला सांगू इच्छितो.                         
                                                                         
                                                                             
                                                               

                                                    वैभव .......................

                                                       ती   A.............. a





वरील फोटो तिचा नसून फक्त हि साधारण तिच्या सारखी दिसते म्हणून वापरला गेला आहे तुम्हाला आणखी संशय नको ......

Saturday, July 14, 2012

त्या प्रेमाची आठवण...!


त्या प्रेमाची आठवण...!
मी बरसलो आज शब्दांतुन ,
तीला एकही शब्द ना कळला कधीमी ओघळलो आज डोळ्यांतुन ,
तीचा थेबंही ना गळला कधी.
सोडुन मान सन्मान माझा मीच दगडापुढे हात जोडीले मी कोसळलो दरड होऊन ,
तीचा एकही बुरुज ना ढळला कधी.
तीची एकही बोली नाही आज लिलावात या माझ्यामी बसलो बाजार मांडून ,
तीने भाव माझा ना विचारला कधी.
आयुष्यभर तीच्या कुपंणाबाहेर जागा माझी नित्याचीमी राहीलो कुंपण बनुन ,
तीने हा निवडूंग अंगणात ना लावला कधी.
सा-याच राती तीच्या चादंण्याच्यां मिठीत गेल्या मी जगलो काजवा होऊन ,
तीला उजेड माझा ना दिसला कधी.
आठवतय रोज जाळं तीच पसरवण तळ्यात चद्रंबिबांसाठीमी राहीलो शिपलं बनुन ,
माझ्यातला मोती तीने ना शोधला कधी
मी होतो पाखरु जळणारा ती ज्योत होती मला जाळणारी मी जळालो पाखरु बनुन ,
तिला एकही चटका ना लागला कधी.
मी लाचार इतका की आज माझीच कीव मज यावीमी मला दिले आगीत झोकून ,
तीचा धुराकडेही जिव ना वळला कधी.
आता मज नकोच तिच्या प्रेमाच्या उसण्या त्या थापामी चाललो स्वप्न मोडुन ,
तीने स्वप्नांतही मला ना सोडला कधी।