Friday, June 29, 2012

माहित नाही ....



आजवर अनेक कविता केल्या 

त्याहूनही जास्त वारेमाप पुसून टाकल्या
हीसुद्धा कदाचित शेवटी पुसून टाकीन
काय आहे, शब्दांचा सुद्धा येतो कंटाळा, कधी कधी 

मी अडचणीतच कविता खूप करतो,
मी एकटेपणातच खूप लिहितो, असंही नाही 
कागदही फाटतो, शाई उठत नाही
काय आहे, पेन्सीलही नाही म्हणते, कधी कधी 

शब्दांची रेलचेल बघतो आपण,
निष्पाप जीवांची घालमेल बघतो आपण
मन हेलावताना कोंबडी खातो आपण 
काय आहे, कशातच अर्थ नसतो , कधी कधी


तुम्हाला सगळ्या कविता आयुष्याबद्दलच हव्या,
कविता करताना मनाला वेदनाच हव्या 
प्रखर,गंभीर, रसपूर्ण शब्दांची मोहिनी सुद्धा हवी, पण
काय आहे, देवही अमृताऐवजी चहा घेतो कधी कधी 

प्रेमात कवितेच्या कळ्या होतात, वैराग्यात ती फुलते 
धुंदीत कविता दिसते, शुद्धीत तिचं स्तोत्र बनतं, पण 
वेदनेत कविता साधळते आणि मृत्यूत कविताच गोठते 
हे सारं सारं नकोसं वाटतंही , कधी कधी



 

आठवणींच्या आरश्यात जेव्हा ….

डोळ्यांतून पाण्याचे थेंब पडतात ….

त्या हलत्या आरशात मला ….

माझे दोन दोन चेहरे दिसतात ….

अश्रू होते का पाऊस ….

हे ओळखणेही अवघड जाते ….

अश्रू काय आणि पाऊस काय ….

पाहणार्याला दोन्ही सारखेच असते ….

बर्याचदा तुझ्या आठवणी ….

पावलं न वाजवताच येतात ….

जाताना मात्र मनाच्या रस्त्यात ….

तुझ्या पावलांचे ठसे मागे सोडून जातात ….

अवेळी आलेला पाउसही ….

सगळं उध्वस्त करतो ….

भर दुपारी भरल्या ढगांनी ….

काळोखी संध्याकाळ करतो ….




भरपूर मोठ्या रस्त्या वरून चाललोय …

 
 
भरपूर मोठ्या रस्त्या वरून चाललोय …
सोबती मात्र कोणी नाही ….

कुठेतरी शेवट असेल म्हणून चाललोय ….
पायांत ताकात मात्र अजिबात राहिली नाही ….

आयुष्य बाकी आहे म्हणून जगतोय ….
जगायची इच्छा मात्र राहिली नाही ….

मित्र आहेत …. बरेच आहेत …
मैत्री मात्र राहिली नाही ….

प्रेमात पडलोय म्हणून प्रेम आहे ….
प्रेमावर विश्वास मात्र राहिलेला नाही …

नाती आहेत म्हणून नातेवाईक आहेत …
नात्यांतले संबंध मात्र राहिले नाही ….

घड्यालाहे म्हणून time आहे ….
वेळ मात्र कोणाकडेच राहिला नाही …

मंदिर आहे म्हणून देव आहे ….
देवावर विश्वास मात्र राहिलेला नाही ….

दोन पायांवर चालतो म्हणून माणूस आहे …
माणुसकी मात्र राहिलेली नाही….




शाळेचे ते दिवस आठवले की …



शाळेचे ते दिवस आठवले की …
उगीचच मोठं झाल्यासारखं वाटतं ….
bus -stop ची मागची ती शाळा पाहून ,
पुन्हा शाळेत जावसं वाटतं ….


शाळा आमची छान होती …
Last bench वर आमची team होती ….
Cricket च्या वेळी ground वर cheating व्हायची …
आणि मधल्या सुट्टीत कॅन्टीन मधल्या वडा-पाव साठी ….
साला नेहमीच line असायची …


जन-गण-मन ला कधी कधी ..
शाळे बाहेर सुद्धा उभे रहायचो …
प्रतिज्ञेच्या वेळी हाताला टेकू देऊनही ….
प्रतिज्ञा म्हणायचो …
प्रार्थनेच्या वेळी मात्र …. सगळ्यांसारखे …
नुसतेच ओठ हालवायचो ….


पावसाळ्यात शाळेत जाताना ,
छत्री दप्तरात ठेऊन …. मुद्दामच भिजत जायचं …
पुस्तक भिजू नये म्हणून ….
त्याना पिशव्यांमध्ये ठेवायचं ….
शाळेतून येता येता … एखाद्या डबक्यात उडी मारून …
उगीचच सगळ्यांच्या अंगावर पाणी उडवायचं ….


Black -board वर बोलणार्या मुलांमध्ये ….
Monitor नेहमीच आमचं नाव लिहायचा …
नेहमीच्याच incomplete गृपाठामुळे …
हातावर duster चा व्रण असायचा ….
प्रयेत्येक Off -period ला P.T. साठी ….
आमचा आरडाओरडा असायचा …
शाळेतून घरी येताना शाळेबाहेरचा ….
तो बर्फाचा गोळा संपवायचा ….


मुलीं बरोबर कितीही बोललो तरीही ….
कधी कोणी link नाही लावायचं …
प्रत्येक महिन्यातून एकदातरी …
डोक्यावरचे केस कापायचो …
आणि आज-काल सारख्या प्रत्येक वाक्यात ….
शिव्या सूद्धा नाही द्यायचो …


इतिहासात वाटतं …. होता शाहिस्तेखान …
नागरिक शास्त्रात पंतप्रधान ….
गणित… भुमितीत होतं … पायथागोरस च प्रमेय …
भूगोलात वाहायचे वारे …. नैऋत्य … मॉन्सून …
का कुठलेतरी … वायव्य….
हिंदीतली आठवते ती “चिंटी कि आत्मकथा”
English मधल्या grammar नेच झाली होती आमची व्यथा …


शाळेतल्या gathering चा dance …
बसल्या बसल्या झोपान्यासाठीचा … तो मराठी चा तास ….
दरवर्षी नवीन भेटायचे ….
Uniforms आणि वह्या पुस्तकांचा set …..
पण नवीन दप्तरासाठी नेहमीच करावा लागायचा wait ….


शाळा म्हटली कि अजूनही आठवतात ….
desk वर pen ने त्या “pen fights” खेळणं ….
exams मधल्या … रिकाम्या जागा भरणं … आणि जोड्या जुळवणं …
चिखलातल्या त्या football च्या matches …
कबड्डीत … पडून धडपडून ….
हातापायांवर आलेले scraches …


खरच कंटाळा आलाय या मोठेपणाचा ….
मला पुन्हा लहान व्हायचं ….
हसायचं …. खेळायचं ….
मला पुन्हा शाळेत जायचं ….






Friday, June 29, 2012

माहित नाही ....



आजवर अनेक कविता केल्या 

त्याहूनही जास्त वारेमाप पुसून टाकल्या
हीसुद्धा कदाचित शेवटी पुसून टाकीन
काय आहे, शब्दांचा सुद्धा येतो कंटाळा, कधी कधी 

मी अडचणीतच कविता खूप करतो,
मी एकटेपणातच खूप लिहितो, असंही नाही 
कागदही फाटतो, शाई उठत नाही
काय आहे, पेन्सीलही नाही म्हणते, कधी कधी 

शब्दांची रेलचेल बघतो आपण,
निष्पाप जीवांची घालमेल बघतो आपण
मन हेलावताना कोंबडी खातो आपण 
काय आहे, कशातच अर्थ नसतो , कधी कधी


तुम्हाला सगळ्या कविता आयुष्याबद्दलच हव्या,
कविता करताना मनाला वेदनाच हव्या 
प्रखर,गंभीर, रसपूर्ण शब्दांची मोहिनी सुद्धा हवी, पण
काय आहे, देवही अमृताऐवजी चहा घेतो कधी कधी 

प्रेमात कवितेच्या कळ्या होतात, वैराग्यात ती फुलते 
धुंदीत कविता दिसते, शुद्धीत तिचं स्तोत्र बनतं, पण 
वेदनेत कविता साधळते आणि मृत्यूत कविताच गोठते 
हे सारं सारं नकोसं वाटतंही , कधी कधी



 

आठवणींच्या आरश्यात जेव्हा ….

डोळ्यांतून पाण्याचे थेंब पडतात ….

त्या हलत्या आरशात मला ….

माझे दोन दोन चेहरे दिसतात ….

अश्रू होते का पाऊस ….

हे ओळखणेही अवघड जाते ….

अश्रू काय आणि पाऊस काय ….

पाहणार्याला दोन्ही सारखेच असते ….

बर्याचदा तुझ्या आठवणी ….

पावलं न वाजवताच येतात ….

जाताना मात्र मनाच्या रस्त्यात ….

तुझ्या पावलांचे ठसे मागे सोडून जातात ….

अवेळी आलेला पाउसही ….

सगळं उध्वस्त करतो ….

भर दुपारी भरल्या ढगांनी ….

काळोखी संध्याकाळ करतो ….




भरपूर मोठ्या रस्त्या वरून चाललोय …

 
 
भरपूर मोठ्या रस्त्या वरून चाललोय …
सोबती मात्र कोणी नाही ….

कुठेतरी शेवट असेल म्हणून चाललोय ….
पायांत ताकात मात्र अजिबात राहिली नाही ….

आयुष्य बाकी आहे म्हणून जगतोय ….
जगायची इच्छा मात्र राहिली नाही ….

मित्र आहेत …. बरेच आहेत …
मैत्री मात्र राहिली नाही ….

प्रेमात पडलोय म्हणून प्रेम आहे ….
प्रेमावर विश्वास मात्र राहिलेला नाही …

नाती आहेत म्हणून नातेवाईक आहेत …
नात्यांतले संबंध मात्र राहिले नाही ….

घड्यालाहे म्हणून time आहे ….
वेळ मात्र कोणाकडेच राहिला नाही …

मंदिर आहे म्हणून देव आहे ….
देवावर विश्वास मात्र राहिलेला नाही ….

दोन पायांवर चालतो म्हणून माणूस आहे …
माणुसकी मात्र राहिलेली नाही….




शाळेचे ते दिवस आठवले की …



शाळेचे ते दिवस आठवले की …
उगीचच मोठं झाल्यासारखं वाटतं ….
bus -stop ची मागची ती शाळा पाहून ,
पुन्हा शाळेत जावसं वाटतं ….


शाळा आमची छान होती …
Last bench वर आमची team होती ….
Cricket च्या वेळी ground वर cheating व्हायची …
आणि मधल्या सुट्टीत कॅन्टीन मधल्या वडा-पाव साठी ….
साला नेहमीच line असायची …


जन-गण-मन ला कधी कधी ..
शाळे बाहेर सुद्धा उभे रहायचो …
प्रतिज्ञेच्या वेळी हाताला टेकू देऊनही ….
प्रतिज्ञा म्हणायचो …
प्रार्थनेच्या वेळी मात्र …. सगळ्यांसारखे …
नुसतेच ओठ हालवायचो ….


पावसाळ्यात शाळेत जाताना ,
छत्री दप्तरात ठेऊन …. मुद्दामच भिजत जायचं …
पुस्तक भिजू नये म्हणून ….
त्याना पिशव्यांमध्ये ठेवायचं ….
शाळेतून येता येता … एखाद्या डबक्यात उडी मारून …
उगीचच सगळ्यांच्या अंगावर पाणी उडवायचं ….


Black -board वर बोलणार्या मुलांमध्ये ….
Monitor नेहमीच आमचं नाव लिहायचा …
नेहमीच्याच incomplete गृपाठामुळे …
हातावर duster चा व्रण असायचा ….
प्रयेत्येक Off -period ला P.T. साठी ….
आमचा आरडाओरडा असायचा …
शाळेतून घरी येताना शाळेबाहेरचा ….
तो बर्फाचा गोळा संपवायचा ….


मुलीं बरोबर कितीही बोललो तरीही ….
कधी कोणी link नाही लावायचं …
प्रत्येक महिन्यातून एकदातरी …
डोक्यावरचे केस कापायचो …
आणि आज-काल सारख्या प्रत्येक वाक्यात ….
शिव्या सूद्धा नाही द्यायचो …


इतिहासात वाटतं …. होता शाहिस्तेखान …
नागरिक शास्त्रात पंतप्रधान ….
गणित… भुमितीत होतं … पायथागोरस च प्रमेय …
भूगोलात वाहायचे वारे …. नैऋत्य … मॉन्सून …
का कुठलेतरी … वायव्य….
हिंदीतली आठवते ती “चिंटी कि आत्मकथा”
English मधल्या grammar नेच झाली होती आमची व्यथा …


शाळेतल्या gathering चा dance …
बसल्या बसल्या झोपान्यासाठीचा … तो मराठी चा तास ….
दरवर्षी नवीन भेटायचे ….
Uniforms आणि वह्या पुस्तकांचा set …..
पण नवीन दप्तरासाठी नेहमीच करावा लागायचा wait ….


शाळा म्हटली कि अजूनही आठवतात ….
desk वर pen ने त्या “pen fights” खेळणं ….
exams मधल्या … रिकाम्या जागा भरणं … आणि जोड्या जुळवणं …
चिखलातल्या त्या football च्या matches …
कबड्डीत … पडून धडपडून ….
हातापायांवर आलेले scraches …


खरच कंटाळा आलाय या मोठेपणाचा ….
मला पुन्हा लहान व्हायचं ….
हसायचं …. खेळायचं ….
मला पुन्हा शाळेत जायचं ….