विसरलोय मी...
तिची न माझी झालेली पहिली भेट
विसरलोय मी...
जी मनात बसली होती एकदम थेट
विसरलोय मी....
तिने त्या दिवशी घातलेला अबोली कलरचा ड्रेस
विसरलोय मी....
तेव्हाचे तिचे वार्यावर उडणारे काळे केस
विसरलोय मी....
सरळ मनावर वार करणारा तिचा एक कटाक्ष
विसरलोय मी....
तेव्हाची रिमझिम पावसाची साक्ष
विसरलोय मी....
तिच चिडून मला खडूस म्हणन
विसरलोय मी....
लटक्या रागात सुद्धा प्रेमान काळजी घेण
विसरलोय मी....
दोघांनी घेतलेला वाफाळलेला चहाचा कप
विसरलोय मी....
तिने दिलेलं चाफ्याचं रोप
विसरलोय मी....
मला सतवण्यासाठी तिच मुद्दाम अबोल राहण
विसरलोय मी....
मला बोलता बोलता निशब्द करण
विसरलोय मी....
आमच्यात भांडणाच, मैत्रीच, आणि .....प्रेमाचं बोलण झालेलं.
.
आणि
विसरलोय मी....
तिने मला " मला विसर " म्हटलेलं....
वार्याला पावले थेंबांची घेऊन पाऊस आला !
आकाशी पांखरे ढगांची घेऊन पाऊस आला !
उजाडल्या डोळ्यांकाठी,
तहानल्या ओठांसाठी,
जगण्याचे थेंब चार ताजे घेऊन पाऊस आला !
आतुरश्या काळजांचे,
वाटेकडल्या नजरांचे,
क्षितिजाला रंग काजळाचे घेऊन पाऊस आला !
सरसरत्या लयतालांचे,
झिमझिमत्या झंकारांचे,
धरतीचे स्वप्न मैफलीचे घेऊन पाऊस आला !
हृदयातुन दाटलेला,
अश्रूंतून फाटलेला,
शब्दांना पूर एक वेडा घेऊन पाऊस आला !
पक्षी होऊनी ऊडण्या मन हे सरसावले
नवा गंध हा हूंगण्या मन हे रे वेडावले,
वार्यावरती झूलण्यास मन हे झेपावले
कुणास बघूनी मग इथेच रे थबकले...
मनात माझ्या अलगद कोण हे रे शिरले
मनाचा माझ्या ताबा घेऊनी हसत बसले,
आता माझे हे मन बघ माझे न राहिले
कुणास भुलूनी मग हे स्वत:शीच हरले...
तुला बघितले अन् भानच रे हरपले
पाऊस नसताही मन माझे चिंब भिजले,
कुणास ठाऊक हे कसे अन कधी घडले
पण माझे वेडे मन हे तुजवर जडले...
वारा नसताही मन माझे हे थरथरले
पाणी नसतानाही मन तृप्त हे रे जाहले,
आनंदात मग ते हळूच बघ वदले
तुजवर माझे प्रेम असे जडले...
मनास माझ्या आताशा काय असे झाले
हे मग रे मला सहजच उमजले,
मनाने मनाशी तुझ्या बघ नाते हे जोडले
नात्यास या प्रेमाचे नाव आपण दिधले...
जगण्याचा या मज अर्थ कळेना
रस्त्याचा या मज शेवट दिसेना,
जणू कळस इथे स्वार्थाचा हो स्वार्थाचा
वर चढे हर एक पाय खेचून दुसर्याचा,
कुठेच बघ हा रस्ता संपेना
जगण्याचा या मज अर्थ कळेना
नोकरीसाठी शिक्षण असे हे
पैशासाठीच असे ही नोकरी,
समाधान मात्र कुठेच मिळेना
जगण्याचा या मज अर्थ कळेना
राब राब राबतो माणूस हा यंत्रागत
सदा सर्वदा अडकलेला व्यवहाराच्या गर्तेत,
प्रेमाचा इथे लवलेश दिसेना
जगण्याचा या मज अर्थ कळेना
दु:खात ना कुणी साथी ना सोबती
सुखात मात्र सारे अवती-भवती,
कुणापास बोलावे काही उमजेना
जगण्याचा या मज अर्थ कळेना
असे कसे रे जगलो इथवर
पुढे कसे कसे रे जगणार
उत्तर कुठेही बघ हे मिळेना
विसरलोय मी...
तिची न माझी झालेली पहिली भेट
विसरलोय मी...
जी मनात बसली होती एकदम थेट
विसरलोय मी....
तिने त्या दिवशी घातलेला अबोली कलरचा ड्रेस
विसरलोय मी....
तेव्हाचे तिचे वार्यावर उडणारे काळे केस
विसरलोय मी....
सरळ मनावर वार करणारा तिचा एक कटाक्ष
विसरलोय मी....
तेव्हाची रिमझिम पावसाची साक्ष
विसरलोय मी....
तिच चिडून मला खडूस म्हणन
विसरलोय मी....
लटक्या रागात सुद्धा प्रेमान काळजी घेण
विसरलोय मी....
दोघांनी घेतलेला वाफाळलेला चहाचा कप
विसरलोय मी....
तिने दिलेलं चाफ्याचं रोप
विसरलोय मी....
मला सतवण्यासाठी तिच मुद्दाम अबोल राहण
विसरलोय मी....
मला बोलता बोलता निशब्द करण
विसरलोय मी....
आमच्यात भांडणाच, मैत्रीच, आणि .....प्रेमाचं बोलण झालेलं.
.
आणि
विसरलोय मी....
तिने मला " मला विसर " म्हटलेलं....
वार्याला पावले थेंबांची घेऊन पाऊस आला !
आकाशी पांखरे ढगांची घेऊन पाऊस आला !
उजाडल्या डोळ्यांकाठी,
तहानल्या ओठांसाठी,
जगण्याचे थेंब चार ताजे घेऊन पाऊस आला !
आतुरश्या काळजांचे,
वाटेकडल्या नजरांचे,
क्षितिजाला रंग काजळाचे घेऊन पाऊस आला !
सरसरत्या लयतालांचे,
झिमझिमत्या झंकारांचे,
धरतीचे स्वप्न मैफलीचे घेऊन पाऊस आला !
हृदयातुन दाटलेला,
अश्रूंतून फाटलेला,
शब्दांना पूर एक वेडा घेऊन पाऊस आला !
पक्षी होऊनी ऊडण्या मन हे सरसावले
नवा गंध हा हूंगण्या मन हे रे वेडावले,
वार्यावरती झूलण्यास मन हे झेपावले
कुणास बघूनी मग इथेच रे थबकले...
मनात माझ्या अलगद कोण हे रे शिरले
मनाचा माझ्या ताबा घेऊनी हसत बसले,
आता माझे हे मन बघ माझे न राहिले
कुणास भुलूनी मग हे स्वत:शीच हरले...
तुला बघितले अन् भानच रे हरपले
पाऊस नसताही मन माझे चिंब भिजले,
कुणास ठाऊक हे कसे अन कधी घडले
पण माझे वेडे मन हे तुजवर जडले...
वारा नसताही मन माझे हे थरथरले
पाणी नसतानाही मन तृप्त हे रे जाहले,
आनंदात मग ते हळूच बघ वदले
तुजवर माझे प्रेम असे जडले...
मनास माझ्या आताशा काय असे झाले
हे मग रे मला सहजच उमजले,
मनाने मनाशी तुझ्या बघ नाते हे जोडले
नात्यास या प्रेमाचे नाव आपण दिधले...
जगण्याचा या मज अर्थ कळेना
रस्त्याचा या मज शेवट दिसेना,
जणू कळस इथे स्वार्थाचा हो स्वार्थाचा
वर चढे हर एक पाय खेचून दुसर्याचा,
कुठेच बघ हा रस्ता संपेना
जगण्याचा या मज अर्थ कळेना
नोकरीसाठी शिक्षण असे हे
पैशासाठीच असे ही नोकरी,
समाधान मात्र कुठेच मिळेना
जगण्याचा या मज अर्थ कळेना
राब राब राबतो माणूस हा यंत्रागत
सदा सर्वदा अडकलेला व्यवहाराच्या गर्तेत,
प्रेमाचा इथे लवलेश दिसेना
जगण्याचा या मज अर्थ कळेना
दु:खात ना कुणी साथी ना सोबती
सुखात मात्र सारे अवती-भवती,
कुणापास बोलावे काही उमजेना
जगण्याचा या मज अर्थ कळेना
असे कसे रे जगलो इथवर
पुढे कसे कसे रे जगणार
उत्तर कुठेही बघ हे मिळेना