Monday, June 18, 2012

नुरली इथे माणुसकी, नुरली चाड नात्यांची



नुरली इथे माणुसकी, नुरली चाड नात्यांची
नुरला इथे प्रेम जिव्हाळा,उरली तहान देहाची
लज्जा,शरम,अब्रू खेळी फ़क्त शब्दांची
किंमत नुरली जगती या शब्दांच्या अर्थाची

भूक देहाची शमविण्या खुडली एक कळी
पुसोनिया कुंकू यातनांचा संग्राम तिच्या भाळी
समाजास लागली वाळ्वी ही नराधमांची
पोखरूनी स्त्रियांना तहान शमवी हे देहाची

शिक्षा होऊनी त्यांना व्रण हे मिटणार नाही
कोमेजलेली कळी परत कधी फुलणार नाही
चर्चा करुनी समाज हा बघा झोपी जाई
स्वग्रूही अघटीत घडण्याची जणू वाट पाही

जोडूनी हात पाय विनविते तुम्हा
माणुसकीला जरा जागे करा
एकाकी स्त्रीचा टाहो हा ऐका जरा
किड ही नष्ट करण्या पेटूनी आता ऊठा जरा. 


आला काळोख दाटूनी



आला काळोख दाटूनी
काहूर विचारांचे घेऊनी
दिस नकळत सरला
रातीला एकटेपणा उरला

मन एकाकी एकाकी
गाठ पडे प्रश्नांची
या भयाण काळोखी
घालमेल होई जीवाची

मन गुंतती गुंतती
गुंतल्यात आठवणी
तारे ते बघूनी
डोळा येते मग पाणी

गेला तारा बनण्या
डाव अर्ध्यावर सोडून
थकले मी आता
रथ तुझ्याविना ओढून

लाखो ता‍र्‍यांत त्या
तुला शोधायचे कुठे?
हितगुज तुझ्याशी
आता साधायचे कसे?

नको वाटते आता
रात एकाकी भकास
तुझ्याविना माझा
इथेच थांबावा प्रवास... 


आला बेभान हा वारा



आला बेभान हा वारा
चाहूल पावसाची घेऊनी
धरती ही सुखावली
शाल लाजेची ओढूनी

विजेची ही तार आली
त्याचा सांगावा घेऊनी
उठा उठा धरणी माते
राजे येताहेत मागुनी

प्रेयसिच्या ओढीने
वरुणराज हा धावत आला
सरसावली मग ही धरा
त्याला आलिंगन देण्या

विरहाने रुसलेल्या धरेला
आणली भेट हिरव्या चोळीची
दिली भरुन ओंजळ तिला
राजाने गार टपोर्‍या मोत्यांची

धरेने शिंपडला स्वागता
सुगंधी असा सडा अत्तराचा
सामावला कणाकणात
परीपूर्ण गंध या पावसाचा

मिठीत पावसाच्या
गेली धरा रंगून
स्वार होऊन सरीवर
आली बघा बहरुन 


Sunday, June 17, 2012

पाऊस आला की हे असं होतं

 
 
पाऊस आला की हे असं होतं
मनात दडून बसलेल्या
कोंडून ठेवलेल्या भावनांमध्ये
कुजबुज सुरु होते
कुजबुज वाढत जाते
आणि त्याचा गलका होतो
आणि मग मी
मनाची कवाड उधडतो
शब्द बाहेर येतात
कागदावर उतरतात
आणि त्याची कविता होते
“पावसाची कविता”
मी त्याला नाव देतो ..!!
 
 

Monday, June 18, 2012

नुरली इथे माणुसकी, नुरली चाड नात्यांची



नुरली इथे माणुसकी, नुरली चाड नात्यांची
नुरला इथे प्रेम जिव्हाळा,उरली तहान देहाची
लज्जा,शरम,अब्रू खेळी फ़क्त शब्दांची
किंमत नुरली जगती या शब्दांच्या अर्थाची

भूक देहाची शमविण्या खुडली एक कळी
पुसोनिया कुंकू यातनांचा संग्राम तिच्या भाळी
समाजास लागली वाळ्वी ही नराधमांची
पोखरूनी स्त्रियांना तहान शमवी हे देहाची

शिक्षा होऊनी त्यांना व्रण हे मिटणार नाही
कोमेजलेली कळी परत कधी फुलणार नाही
चर्चा करुनी समाज हा बघा झोपी जाई
स्वग्रूही अघटीत घडण्याची जणू वाट पाही

जोडूनी हात पाय विनविते तुम्हा
माणुसकीला जरा जागे करा
एकाकी स्त्रीचा टाहो हा ऐका जरा
किड ही नष्ट करण्या पेटूनी आता ऊठा जरा. 


आला काळोख दाटूनी



आला काळोख दाटूनी
काहूर विचारांचे घेऊनी
दिस नकळत सरला
रातीला एकटेपणा उरला

मन एकाकी एकाकी
गाठ पडे प्रश्नांची
या भयाण काळोखी
घालमेल होई जीवाची

मन गुंतती गुंतती
गुंतल्यात आठवणी
तारे ते बघूनी
डोळा येते मग पाणी

गेला तारा बनण्या
डाव अर्ध्यावर सोडून
थकले मी आता
रथ तुझ्याविना ओढून

लाखो ता‍र्‍यांत त्या
तुला शोधायचे कुठे?
हितगुज तुझ्याशी
आता साधायचे कसे?

नको वाटते आता
रात एकाकी भकास
तुझ्याविना माझा
इथेच थांबावा प्रवास... 


आला बेभान हा वारा



आला बेभान हा वारा
चाहूल पावसाची घेऊनी
धरती ही सुखावली
शाल लाजेची ओढूनी

विजेची ही तार आली
त्याचा सांगावा घेऊनी
उठा उठा धरणी माते
राजे येताहेत मागुनी

प्रेयसिच्या ओढीने
वरुणराज हा धावत आला
सरसावली मग ही धरा
त्याला आलिंगन देण्या

विरहाने रुसलेल्या धरेला
आणली भेट हिरव्या चोळीची
दिली भरुन ओंजळ तिला
राजाने गार टपोर्‍या मोत्यांची

धरेने शिंपडला स्वागता
सुगंधी असा सडा अत्तराचा
सामावला कणाकणात
परीपूर्ण गंध या पावसाचा

मिठीत पावसाच्या
गेली धरा रंगून
स्वार होऊन सरीवर
आली बघा बहरुन 


Sunday, June 17, 2012

पाऊस आला की हे असं होतं

 
 
पाऊस आला की हे असं होतं
मनात दडून बसलेल्या
कोंडून ठेवलेल्या भावनांमध्ये
कुजबुज सुरु होते
कुजबुज वाढत जाते
आणि त्याचा गलका होतो
आणि मग मी
मनाची कवाड उधडतो
शब्द बाहेर येतात
कागदावर उतरतात
आणि त्याची कविता होते
“पावसाची कविता”
मी त्याला नाव देतो ..!!