आजकाल मनात ती फारच डोकावत राहते
तिच्याबद्दल काहीतरी लिहित राहावं असं सतत वाटत राहतं
बरेचदा लिखाणात नात्यांबद्दल तिच्या मतांबद्दल लिहिणं होतं.
.न बोललेल्या ,गाभ्यातच राहिलेल्या गोष्टी..
न कळलेले अर्थ,हळुवार संवाद ,बालीशपणा,भांडणं,शाब्दिक चकमकी ..
असं आणि बरचं काही..
खूप काही घडून गेलय... ..
जे जे अनुभवलं ते ते आता आपल्या शब्दात उतरत आहे ..
आणि सोबतीने अव्यक्त भावही ...
लिहिता लिहिता असं जाणवत गेलं की प्रत्येक
प्रसंगातून एक गोष्ट गुंफली जावू शकते..
मग त्याप्रकारे लिहणं सुरु झालाय ..
ते क्षण जगता यावे हि एक धडपड आहे ह्या लिहिण्यामागे
...त्यांचा अर्थ लावता
यावा आणि तीच भावविश्व
जाणून घेता यावं हा प्रयत्न आहे ...
ती फक्त एक कोणी नाही ती हि त्याच्या मनात
असलेली एक प्रतिमा आहे...अनेक "ती"च्या मनातून भेटलेली
अनेक अनुभवांतून उमटलेली .उमजलेली
.. ती हि त्याची हळुवार बाजू आहे
आजकल त्याच्या मनात ती फारच डोकावत राहते
..म्हणून तो ,ती लिहायला लागलाय ....