Saturday, June 2, 2012

असे वाटते आज-काल, नवे काही मांडू नये ...



उत्कट-बित्कट होऊ नये, भांडू नये, तंडू नये॥
असे वाटते आज-काल, नवे काही मांडू नये ॥ धृ ॥
नको कुठला नवा भार, जुनेच गुंते शिल्लक फार॥
सूर गाठ-नीर गाठ, राहून द्याव्यात, ओढू नये...
असे वाटते आज-काल, नवे काही मांडू नये ॥ १
असे वाटते बसून घ्यावे, उरले श्वास मोजत रहावे॥
जन्मा-बिन्मा आलो त्याचे, पांग सुद्धा फेडू नये...
असे वाटते आज-काल, नवे काही मांडू नये ॥ २
शिंकांसारखे सोपस्कार, मला झालीये गर्दी फार॥
असल्या गळक्या जगण्यासाठी, रूमालसुद्धा काढू नये...
असे वाटते आज-काल, नवे काही मांडू नये ॥ ३
कुठे कधी रमला जीव, खरंच फार दमला जीव॥
वजन, ज्ञान, ओळख, पित्त काही-काही वाढू नये...
असे वाटते आज-काल, नवे काही मांडू नये ॥ ४ ॥
आधी उत्सुक्‍तांचा जीव, त्याला बांधून घ्यावी शीव॥
घर दार उबवत रहावे फक्‍त, डबके सोडून हिंडू नये...
असे वाटते आज-काल, नवे काही मांडू नये ॥ ५ ॥
स्वतःलाच घालत धाक, कुरकूर रेटत ठवलं चाक॥
खेचत ठेवले अजून गाडे, आता फार ओढू नये...
असे वाटते आज-काल, नवे काही मांडू नये ॥ ६ ॥
कसले प्रहर, कसला काळ, मनात कायम संध्याकाळ॥
तिच्या कुशीत मांडली कविता, तेवढी मात्र मोडू नये...
असे वाटते आज-काल, नवे काही मांडू नये ॥ ७ ॥


 



--- संदीप खरे






Saturday, May 26, 2012

तु जवळ नाहीस तरीही..........

तु जवळ नाहीस तरीही
मी एकटा कधीच नसतो
तुझ्या अस्तित्वाचा गध
माझ्याभोवती दरवळत असतो
विरहाचे ऊन जाळते कधी
मनाची तगमग होते
तुझ्या डोळ्यातील शितलता
त्यावर ह्ळुच फुकर घालते
तुझ्या भेटीची ओढ
थन्डी होउन अन्गाला झोबते
तुझ्या आठवणी शाल होउन
पाघरुन घालीत उब देतात
स्नध्याकाळी,एकान्तवेळी
आठवणीचा वारा सुटतो
मझ्या प्रत्येक श्वासागणिक
तुझ्या केसाचा सुन्गध् येतो
होतो अबोल मग मी सुध्दा
अन् तुझ्यामधे रन्गुन जातो,
मी प्रेमात पडल्याच
प्रत्येक क्शण सान्गुण जातो...............
 
 

Friday, May 25, 2012

कल्पनेतलं जग मी उभ केलं होतं....

कल्पनेतलं जग मी उभ केलं होतं
मन हसत होत ह्रदय गीत गात होत
राहिलं साहिलं अस्तित्व मानानं जगत होतं
कुणापुढे लाचारपणे स्वाभिमान झुकवत नव्हतं

कधी मनात येता आकाशी जात होतं
तुफान वेगाच्या विमानाला शिवुन येत होतं
सात्विक मिळणारया सुखानं भारावुन जात होतं
कल्पनेतलं जग अस स्वप्नात जात होतं

ती न मिळालेलं दुख उराशी होतं
नकारात तिच्या मन सुख मानत होतं
दुसरीकडे कधीही चित्त लागत नव्हतं
मनाच संतुलन ढळलं तरी काहीच बिघडत नव्हतं

आताशी कुठे मनाला जीवन समजत होतं
परिस्थितीशी जगण्याची सांगड घालत होतं
सकाळच्या सोनेरी किरणांची उब घेत होतं
मन माझं कल्पनेला जोर देत होतं

आता पाऊस येईल...

आता पाऊस येईल
आभाळ काळकुट्ट झालय
ढग गर्जु लागलेत
हवा जोरजोरात वाहतेय
प्राणि पक्षी किलबिल करताहेत
आता पाऊस येईल

पावसासाठी गावकरी वडभोजन करतील
पावशा पावशा म्हणत वरुण राजाला स्मरतील
पीक पेरणीसाठी शेती सुसज्ज ठेवतील
पावसाच्या पहिल्या धारेची वाट पाहत राहतील

नुकतच मोराच थुईथुई नाचण चालु होईल
रानपाखरांच इकडुन तिकडं बागडणं राहिल
झाडांच्या फांद्या पानांच सळसळणं राहिल
चातक पक्षी पहिल्या पावसाची वाट पाहिल

पावसाच्या सरीवर सरी कोसळतील
दुथडी भरुन वाहणार्या नद्या समुद्रात मिसळतील
पावसाच्या पुर्वसंध्येला गुरंढोरं माघारा वळतील
शेतकरयाच्या बैलगाड्या सुसाट घराकडे पळतील

आनंदात कोकिळा कुहुकुहु गाईल
राघु मैनेचंसुद्धा गुटर्गु चालु होईल
सृष्टीला नवीनच हिरवागार बहर येईल
प्रत्येक छोटामोठा जीव त्यावर बागडत राहिल

सावधान आता रिमझिम चालु होईल
छत्र्या रेनकोटची रस्त्यावर गर्दी होईल
लवकर आपापली घरे गाठा
आता पाऊस येईल


Saturday, June 2, 2012

असे वाटते आज-काल, नवे काही मांडू नये ...



उत्कट-बित्कट होऊ नये, भांडू नये, तंडू नये॥
असे वाटते आज-काल, नवे काही मांडू नये ॥ धृ ॥
नको कुठला नवा भार, जुनेच गुंते शिल्लक फार॥
सूर गाठ-नीर गाठ, राहून द्याव्यात, ओढू नये...
असे वाटते आज-काल, नवे काही मांडू नये ॥ १
असे वाटते बसून घ्यावे, उरले श्वास मोजत रहावे॥
जन्मा-बिन्मा आलो त्याचे, पांग सुद्धा फेडू नये...
असे वाटते आज-काल, नवे काही मांडू नये ॥ २
शिंकांसारखे सोपस्कार, मला झालीये गर्दी फार॥
असल्या गळक्या जगण्यासाठी, रूमालसुद्धा काढू नये...
असे वाटते आज-काल, नवे काही मांडू नये ॥ ३
कुठे कधी रमला जीव, खरंच फार दमला जीव॥
वजन, ज्ञान, ओळख, पित्त काही-काही वाढू नये...
असे वाटते आज-काल, नवे काही मांडू नये ॥ ४ ॥
आधी उत्सुक्‍तांचा जीव, त्याला बांधून घ्यावी शीव॥
घर दार उबवत रहावे फक्‍त, डबके सोडून हिंडू नये...
असे वाटते आज-काल, नवे काही मांडू नये ॥ ५ ॥
स्वतःलाच घालत धाक, कुरकूर रेटत ठवलं चाक॥
खेचत ठेवले अजून गाडे, आता फार ओढू नये...
असे वाटते आज-काल, नवे काही मांडू नये ॥ ६ ॥
कसले प्रहर, कसला काळ, मनात कायम संध्याकाळ॥
तिच्या कुशीत मांडली कविता, तेवढी मात्र मोडू नये...
असे वाटते आज-काल, नवे काही मांडू नये ॥ ७ ॥


 



--- संदीप खरे






Saturday, May 26, 2012

तु जवळ नाहीस तरीही..........

तु जवळ नाहीस तरीही
मी एकटा कधीच नसतो
तुझ्या अस्तित्वाचा गध
माझ्याभोवती दरवळत असतो
विरहाचे ऊन जाळते कधी
मनाची तगमग होते
तुझ्या डोळ्यातील शितलता
त्यावर ह्ळुच फुकर घालते
तुझ्या भेटीची ओढ
थन्डी होउन अन्गाला झोबते
तुझ्या आठवणी शाल होउन
पाघरुन घालीत उब देतात
स्नध्याकाळी,एकान्तवेळी
आठवणीचा वारा सुटतो
मझ्या प्रत्येक श्वासागणिक
तुझ्या केसाचा सुन्गध् येतो
होतो अबोल मग मी सुध्दा
अन् तुझ्यामधे रन्गुन जातो,
मी प्रेमात पडल्याच
प्रत्येक क्शण सान्गुण जातो...............
 
 

Friday, May 25, 2012

कल्पनेतलं जग मी उभ केलं होतं....

कल्पनेतलं जग मी उभ केलं होतं
मन हसत होत ह्रदय गीत गात होत
राहिलं साहिलं अस्तित्व मानानं जगत होतं
कुणापुढे लाचारपणे स्वाभिमान झुकवत नव्हतं

कधी मनात येता आकाशी जात होतं
तुफान वेगाच्या विमानाला शिवुन येत होतं
सात्विक मिळणारया सुखानं भारावुन जात होतं
कल्पनेतलं जग अस स्वप्नात जात होतं

ती न मिळालेलं दुख उराशी होतं
नकारात तिच्या मन सुख मानत होतं
दुसरीकडे कधीही चित्त लागत नव्हतं
मनाच संतुलन ढळलं तरी काहीच बिघडत नव्हतं

आताशी कुठे मनाला जीवन समजत होतं
परिस्थितीशी जगण्याची सांगड घालत होतं
सकाळच्या सोनेरी किरणांची उब घेत होतं
मन माझं कल्पनेला जोर देत होतं

आता पाऊस येईल...

आता पाऊस येईल
आभाळ काळकुट्ट झालय
ढग गर्जु लागलेत
हवा जोरजोरात वाहतेय
प्राणि पक्षी किलबिल करताहेत
आता पाऊस येईल

पावसासाठी गावकरी वडभोजन करतील
पावशा पावशा म्हणत वरुण राजाला स्मरतील
पीक पेरणीसाठी शेती सुसज्ज ठेवतील
पावसाच्या पहिल्या धारेची वाट पाहत राहतील

नुकतच मोराच थुईथुई नाचण चालु होईल
रानपाखरांच इकडुन तिकडं बागडणं राहिल
झाडांच्या फांद्या पानांच सळसळणं राहिल
चातक पक्षी पहिल्या पावसाची वाट पाहिल

पावसाच्या सरीवर सरी कोसळतील
दुथडी भरुन वाहणार्या नद्या समुद्रात मिसळतील
पावसाच्या पुर्वसंध्येला गुरंढोरं माघारा वळतील
शेतकरयाच्या बैलगाड्या सुसाट घराकडे पळतील

आनंदात कोकिळा कुहुकुहु गाईल
राघु मैनेचंसुद्धा गुटर्गु चालु होईल
सृष्टीला नवीनच हिरवागार बहर येईल
प्रत्येक छोटामोठा जीव त्यावर बागडत राहिल

सावधान आता रिमझिम चालु होईल
छत्र्या रेनकोटची रस्त्यावर गर्दी होईल
लवकर आपापली घरे गाठा
आता पाऊस येईल