शब्द काही वळत नाही
भावना काही कळत नाही
जोडले जातात शब्द मनात
पण कागदावर काही उमटत नाही
होती एक वेळ अशी
जेव्हा शब्दा-शब्दांवर बनायची कविता
आता तर शब्दा सुद्धा सुचत नाही
तर कशी सुचेल कविता
झाली होती माझी चूक
जे मी तुझ्या प्रेमात पडलो
कधी इथे कधी तिथे
कोपऱ्यात बसून रडलो
संपले माझे शब्द
अपुऱ्या पडल्या माझ्या भावना
ह्या हृदयात तूच आहे
हे तुला कधी कळेना
