Pages

Monday, July 30, 2012

स्वप्नांवर माणूस जगतो का?



मला वाटत बरीच माणसे आपल्या मनातील भावना न दाखवता आपल्या अंतरमनात साठऊन तसेच जीवन जगत असतात .त्या आठवणीच्या स्वप्नातच आपण सारे जगत असतो. आणि एखाद्या आठवणींच्या स्वप्नावरच आपण झोपत असतो.आणि त्यात रमतो सुद्धा, पण जाग येईपर्यंतच.

जागेपणीही स्वप्ने उराशी बाळगली तर परत झोपण्याची वेळ येते माणसावर.
मला वाटत आपण सारे स्वप्नावरच जगत असतो.`कारण जशी एखादी सुगंधीत अगरबत्ती स्वत: जळून दुसर्‍यासाठी सुगंध दरवळत असते.मला वाटत चांगली  सुगंधीत अगरबत्ती आणि स्वप्न यांचा अगदी जवळचा संबंध आहे,कारण शेवठी दोघांची ही रखाच होते. 

हो आणि ते आपल्या माणण्यावर -सुद्धा आहे. काहीजण ही अशी मजेशीर,आपल्याला शिकवण देणारी स्वप्ने घाबरून किवा त्यांचा तिरस्कार वाटून ती धुडकाऊन लावत असतात .
जेव्हा कधी माझे मन बैचेन होते त्या-त्या वेळी मी स्वप्नांचा आधार घेतल्याशिवाय राहत नाही.आणि हीच स्वप्ने आपल्याला जीवन जगण्याची दिशा ऊमेदिने दाखवत आसतात. आपल्याला फक्त ती ओळखता आली पाहिजेत.स्वप्न म्हणजेच मानसच्या मनातील स्फूर्ति होय. जी मोठ्या मनाची माणसे असतात त्यांनाच त्या स्वप्नांचा अर्थ समजतो.स्वप्न नसेल तर आपल मन एखाद्या ओसाड माळरानाप्रमाणे होऊन जात. 

मी मात्र स्वप्नात जेवढा रमतो , तेवढा कशातच रमत नाही .काही माणसे स्वप्नांची आठवण झाली की तळमळत असतात.मी त्या स्वप्नांनमध्येच सुखावतो.कारण-
 स्वप्न मात्र माझ्या मालकीची आहेत.जीवन माझ्या मालकीच नाही.त्यामुळे स्वप्नांत मला हव्या-त्या सगळ्या गोष्टी घडू शकतात. पाहिजे त्या व्यक्ति भेटू शकतात. पुन्हा त्यात कुणाचीही भीती नाही. ना घरातल्यांची नाही,
 ना बाहेरच्यांची.

आणि स्टेटस- स्टेटस काय ते अगदी अबाधित राहत

.
वैभव ..............