ते दिवस म्हणजे तारुण्यातील बेरीज-वजाबाकीचा आलेखच ......
तारुण्य–आयुष्यातील सळसळत्या उत्साहाचा काळ.
प्रेम करण्याचा, प्रेमात हरवण्याचा,प्रेमासाठी वाट्टेलते करण्याचा.
स्वताची झालेली फटफजिती कबुल करण्याचा,दुसर्याची गंमत मजेतच दुरून बघण्याचा एक वेगळा आनंद .
पण कधीकधी भलतीच ठेच लागते, अगदी जिव्हारी लागते.
विसरू म्हणता विसरता येत नाही .नकळत झालेली चूक स्वीकारताही येत नाही.वास्तवाला सामोरे जायचे धैर्य
कधी-कधी दाखवावे लागते.प्रेमात पडल्यावर दुखरा कोपरा मनात तसाच ठेऊन काहीजण जगत असतात.
काही त्यातून बाहेरच येत नाहीत .
मागचे भोग विसरून वाटेला आलेल्या मार्गाने नेटकेपणाने चालणारे मोजकेच असतात .
तर काहीजण जीवनात भलत्याच काळ्या वाटेने जाऊन फसवे सुख मिळवतात .
प्रेमातील निरनिराळ्या छटा,त्यातील आत्मीयता, जोम,वेळेनुसार असफल झालेल्या प्रेमातील वेदना,कारुण्य,
तडजोड,सच्चेपणा,
या सर्व आठवणी कधी-कधी विनोदाने मनाला खुद्कन हसवणार्या,तर कधी डोळ्यांच्या कडा ओल्या करणार्या असता
वैभव......