Pages

Tuesday, November 6, 2012

आज-काल मला जुन्या आठवणी फार फार सतावतात शाळेतल्या-कॉलेजमधल्या सगळ्या सगळ्या गोष्टी आठवतात

आज-काल मला जुन्या आठवणी फार फार सतावतात
शाळेतल्या-कॉलेजमधल्या सगळ्या सगळ्या गोष्टी आठवतात
सध्या काम कमी अन् वेळ भरपूर
कंटाळा आलाय आता नेट सर्फिंग करून
काय करणार सध्या बेंच वर आहे
कारण शेवटी मी एक प्रोफेशनल आहे

दिवसातले किमान 10 तास मी कंपनी मध्ये घालवतो
कंपनीच्या पैश्याचे A\C, नेट अन् टेलिफोन्स वापरतो
चार-चार वेळा कॉफी प्यायची सवय लागली आहे मला पण माझ्या
कॉलेज canteenच्या कटींगची सर नाही त्याला
कंपनीतले बेचव जेवण गोड मानून घेतो आहे
कारण शेवटी मी एक प्रोफेशनल आहे

कट्ट्यावरच्या गप्पा तर कधीच मागे पडल्या
A\C Coneference roomsमध्ये आता मीटिंग्स होऊ लागल्या
टीम-मेटसच्या गर्दीत माझ्या मित्रांची टोळी हरवली
पक्या, अज्या, रघूची जागा आता मूर्थी, कृष्णन आणि रेवतीने घेतली
ODCमध्ये एकतरी मराठी माणूस शोधतो आहे
कारण शेवटी मी एक प्रोफेशनल आहे

सुरुवातीला खूप फोन SMS व्हायचे
कोण कुठे काय करतोय लगोलग कळायचे
आजकाल जो-तो projectमध्ये बिझी ज़ालाय
भुला भटका missed call आता महाग झालाय
forwards आणि chain mailsमध्ये खुषालीची मैल शोधतो आहे
कारण शेवटी मी एक प्रोफेशनल आहे

दर वीकएण्डसला मे मल्टीप्लेक्स मध्ये जातो
दीड-दमडीच्या मुव्हीसाठी शे-दीडशे मोजतो
सेलेब्रेशन्स,पार्टीज साठी pizza hutchaचा रस्ता गाठतो
vegie crust, paporonie कसले कसले फ्लेवर्स मागवतो
पण pocket moneyसाठवून केलेल्या partyची मजा ह्यात शोधत आहे
कारण शेवटी मी एक प्रोफेशनल आहे


रोजचा शिरस्ता म्हणून घरी एक फोन लावतो
एकुलता-एक असण्याचे आपले कर्तव्य पार पाडतो
"आता कधी येशील?" असे आई रोज विचारते
बाबांच्याही आवाजात हल्ली खूप चिंता जाणवते
करियर आणि आई-बाबांपैकी मे माझ्या करियरला निवडले आहे
कारण शेवटी मी एक प्रोफेशनल आहे

खरच सारे काही गेलेय आता बदलून
एका टॅग ने ठेवलाय माझे आयुष्य जखडून
कधीतरी तो दिवस येईल
officeमधून थेट मी माझ्या घरी जाईन
पण मला माहितेय हे एक स्वप्न आहे
कारण शेवटी मी एक प्रोफेशनल आह



ते पण एक वय असतं

ते पण एक वय असतं
दिवसभ पाळण्यात झोपायचं
सगळ्यांकडून कौतुक करून घेण्याचं

ते पण एक वय असतं
हाफ चड्डीत गावभर फिरायचं
आईची नजर चुकवून डब्यातलं खायचं

ते पण एक वय असतं
मुलींच्या स्क्रॅपबुक्स भरायचं
आणि तरीही त्यांच्याशी बोलायला लाजायचं

ते पण एक वय असतं
तिच्यावरचं खरं प्रेम तिला सांगून टाकायचं तिच्या उत्तराची वाट पाहत रात्रंदिवस झुरायचं

ते पण एक वय असतं
आता छोकरी नंतर नोकरीच्या मागे लागायचं
पॅकेजचा विचार करत एम . एस . ची स्वप्नं पहायचं

ते पण एक वय असतं
लग्नाच्या ' डोमिनियन स्टेटस ' आधी तारूण्यातला टोटल इंडिपेंडंस आठवायचं आई आणि बायकोत कितीही भांडणं झाली तरी आपण मात्र शांत रहायचं

ते पण एक वय असतं
प्रिमियम्सच्या चिंतेत रात्रभर जागायचं
शेअर मार्केटच्या तालावर आपल्या इन्व्हेस्टमेंट्सना नाचवायचं

ते पण एक वय असतं
आपल्या मुलांचे सगळे हट्ट पुरवायचं
त्यांच्या साठी स्थळ शोधताना आपलं तारूण्य आठवायचं

ते पण एक वय असतं
सगळ्या जबाबदार्‍या पार पाडल्यावर गॅलरीत पाय पसरून बसण्याचं आभाळाकडे पाहत फक्त यमाच्या निर्देशाची वाट पाहत बसण्याचं


मैत्र! एक गोंडस नाव...

मैत्र! एक गोंडस नाव, एका नात्याचं. रम्य बालपणात;
त्या वेड्या भिरभिरणाऱ्या वयात हे मैत्र किती तऱ्हांनी बागडत असतं आपल्याबरोबर, नाही?
या मैत्रीला कुठे बांधून धरून ठेवावं कळतच नाही तेव्हा. समुद्रकाठच्या वाळूसारखी सटकून जाते ती पायाखालून.
मग वाळू सोडून नावेत बसतो आपण; लाटांवर स्वार होण्यासाठी, एकटेच.
पण कसा कुणास ठाऊक, आहे आहे म्हणेपर्यंत रस्ता चुकतो आपला. कायमची चुकामूक.
मग आपापल्या वाटेवरून चालत राहायचं, एवढंच उरतं आपल्या हातात.
पण त्या मैत्रीला सुरक्षित जपून ठेवायचं काम चोख बजावतं आपलं मन.
आणि जसा जसा आयुष्याचा किनारा जवळ येऊ लागतो, तसातसा गहिरा होत जातो रंग त्या मैत्रीचा.

प्रेम मागुन मिळत नाही


प्रेम मागुन मिळत नाही
प्रेम वाटावं लागतं
ध्यानी मनी नसताना
अवचित भेटावं लागतं

माझ्यावर प्रेम करा
असं म्हणता येत नाही
करु म्हटल्याने
असं काही होत नाही

त्यासाठी जुळावे लागतात
उभयंताचे धागे
भीड आणि भीती मग
आपोआप पडते मागे

प्रेमाचे फुलपाखरु
स्वच्छंद उडतं
मनमोही रंगानी
पुरतं वेड करतं

पण त्यामागे धावलं तर
आणखी पुढे पळतं,
डोळे मिटुन शांत बसलं
की हळुच खांध्यावर बसतं.


मी स्वत:स हरपून जाते, हा भास तुझा होताना

मी स्वत:स हरपून जाते, हा भास तुझा होताना
नसलास जरी समोर तू,वाटते जणू असलेला

स्वप्नात माझ्या येउन हैराण मला का करतो
अन अवचित जाग ही येता, तू असाच भवती विरतो!

वेगाने वाहून वारा ,हे केस जेव्हा उडवतो
वाटते मनाला माझ्या, की तूच बटा खेळवतो..

झाडांची अलबेल शाखा ह पदर असा अडवते
ह्र्दय असे धड्धडते जणू तुझीच चाहुल घडते!

पावसांचे अलवार थेंब या ओठांवर ओघळती
वाटॆ तुझाच स्पर्श होई, पण तो ही भासच ठरतो!!

ताटकळत कैक वेळा , वाट तुझी मी बघते
पण तू न ये सामोरा , मन उगा हताश होते !

न कळे मजला क मी, उगाच तुझ्यावर रुसते
मग येता तू सामोरा, गालातच खुद्कन हसते!!

हा भास तुझा होताना……..
हा भास तुझा होताना……..


मित्रांचे कट्टे आजकाल ओसंच पडतात........

मित्रांचे कट्टे आजकाल ओसंच पडतात..
कुणी 'orkut' वर तर कुणी 'Facebook' वर जमतात..

...प्रत्यक्ष भेटीत सगळेच बुचकळयात पडतात..
कारण सगळे विषय 'chat' वरच संपलेले असतात..

मग 'chat' वर भेटूच " याचं Promise होतं..
आणि संभाषणातून 'Sign out' के लं जातं. ..

'लाल' 'हिरव्या ' दिव्यांच्या गर्दित मग हरवायला होतं...
घट्ट पकडलेलया हातांनाही सैल सुटायला होतं..

'Available' आणि 'Busy' मध्ये
प्रतेकाचा status घुटमळत राहतो...
आपणहून add केलेल्या मित्रपासून लापन्यकारिता
'Invisible'चा आडोसा घेतला जातो..

ताप आल्याच आजकाल आईच्या आधी 'Facebook' ला कळत..
औषध पेक्षा 'Take Care' च्या डोसेजनीच तापालाही पळायला होतं..

मनातलं सगळं 'Facebook' वर ओकायची
मैत्रीत गरजच का असावी?
नात्यांना धरून ठेवायला
'Net''ची जाळीच का असावी?

कधीतरी वाटतं पुन्हा कट्ट्यावर जमावं..
'chat' ला गप्पानी आणि 'Smile' ना हस्यानी replace करावं..

शब्दापेक्षा सोबतीचं सामर्थ्य जास्त असतं
मैतीचं खरं समाधान खंद्यावरच्या हातात असतं....

चला तर पूर्वी चे दिवस पुन्हा अनुभावुया ,
मैत्रीला technology पासून जपून ठेवुया ..


आधीच ठरले होते तुझे माझे नाते

आधीच ठरले होते तुझे माझे नाते
म्हणुनच ह्रदय फक्त तुझे गीत गाते
एकांतपणी ही माझ्या साथ तु येते
कळत न कळत गीत तयार होते
योगा योग म्हण नाही तर अंधश्रधा
पण लाखोंच्या दुनियेत मन तुझेच का होते ?
आधीच ठरले होते तुझे माझे नाते
म्हणुनच ह्रदय फक्त तुझे गीत गाते
टाळतो मी , जाळतो मी, तरी ही
मनापुढे कित्येकदा हारतो मी
स्वप्नात ही तुझाच वावर
झोपेत ही मुखी नाव तुझेच येते
आधीच ठरले होते तुझे माझे नाते
म्हणुनच ह्रदय फक्त तुझे गीत गाते
नाही कळत जगाला जगापलिकडे हे जाते
"कृष्ण, कृष्ण "करीत मीरा विष ही पीते
ठरविले होते आधीच त्याने म्हणुन हे होते
मान न मान तु पण मन गीत तुझेच गाते
आधीच ठरले होते तुझे माझे नाते
म्हणुनच ह्रदय फक्त तुझे गीत गाते 


एक नाते मैत्रिचे

एक नाते मैत्रिचे
आपल्या आयुष्याला कधी सुंदर कलाटणी,

तर कधी वेडेवाकडे वळण देणारे!
एक नाते मैत्रिचे सुख-दुखात साथ देणारे

तर कधी अर्ध्या वाटेवरचं सोडून जाणारे!
एक नाते मैत्रिचे

चुकलेल्या योग्य मार्ग दाखवणारे,
तर कधी चूकीच्या रस्त्यावर चालत जायला सांगणारे!

एक नाते मैत्रिचे
सुर्यासारखे तेजस्वी प्रकाश देणारे

तर कधी अंधारातच सोडून जाणारे!
म्हणूनच, तर मैत्री करावी

सुख-दुःखात साथ देणाऱ्या मित्रांशी
ना चूकीच्या रस्त्यावर चालावला सांगणाऱ्यांशी

म्हणून.. मैत्रीचे नाते असावे
फुल-काट्यांच्या जोडीसारखे,

नेहमीच कष्टाने सुखी रहंणारे!


वेळ आली तर तुलाही सांगीन

वेळ आली तर तुलाही सांगीन,
आयुष्य कस जगायचं असत.
एका-एका शब्दामधून
वाक्य कस बनवायचा असत.
वेळ आली तर तुलाही सांगीन,
मन कस जिंकायचं असत.
आवडी-निवडी सांगताना कस
मनात मन गुंतवायच असत.
वेळ आली तर तुलाही सांगीन,
स्पर्श कसा करायचा असतो.
नाजूक उमललेल्या ओठांवरून कसा
हळुवार हात फिरवायचा असतो.
वेळ आली तर तुलाही सांगीन,
दुखं कस झिजवायच असत.
अश्रूंचा नवीन संसार करून
सुखाने कस नांदायचं असत.
वेळ आली तर तुलाही सांगीन,
प्रेम कस करायचं असत.
विरहात प्रेमाची आहुती देऊन
क्षितिजाकडे कस बघायचं असत


जगतांना किती खेळले जुगार आम्ही

जगतांना किती खेळले जुगार आम्ही,
दुखाने पेटविली जीवनाची सिगार आम्ही
नका छेड काढू नशिल्या आसवांची
पापण्यांची तोरणे ठेविली उधार आम्ही
भले ते लोक होते जे रडून गेले
मांडला न कधी अश्रूंचा बाजार आम्ही
जरी शोक किती वेचले ओंजळी मधुनी
धार जखमांची जपली अलवार आम्ही
कशास शोध आता मंद काजव्याचा
सुर्यास ही केले अता उबदार आम्ही
हे सागरा ! जरा जपून वाग अता
कैद तुझी केली किनार आम्ही
नका अता पैज कासवा वरी लावू
किती तरी ससे केले पसार आम्ही
जरी पाहुणे होतो दोन-चार घडीचे
फेकले तुमच्यावरी शेर हजार आम्ही


 

जुनेच मॅसेज पुन्हा पुन्हा वाचत असतं

जुनेच मॅसेज पुन्हा पुन्हा वाचत असतं
कोणीतरी..
पावसाच्या थेंबात अश्रु लपवुन रडत असतं
कोणीतरी..
...
कोणाला तरी हसतांना लपुन बघत असतं
कोणीतरी..
दिवे सगळे विझल्यावर का जळत असतं
कोणीतरी..
सगळ जग झोपेत
असताना उघड्या डोळ्यांनी स्वप्न बघत
असतं कोणीतरी..
कुणी येणार नाही तरी वाट बघत असतं
कोणीतरी..
माणसांच्या या इतक्या गर्दीत का एकट
असतं कोणीतरी.


ओळखत जरी असलो एकमेकना

ओळखत जरी असलो एकमेकना एक वर्षापासून पण कधी एकमेकासमोर प्रेमाच्या गोष्टी केल्याच नाही.
का?त्याने बोलवल्यावर न विचार करता त्याला भेटायला जाते.
ही फक्त मैत्री आहे की प्रेम.
क?जेव्हा घरी जाण्याची वेळ येते तेव्हा एकटे सोडायला तो घाबरतो.
काळजी तर मित्र मैत्रिणी सुधा घेतात.
क? दूर जाताच एकमेकना विचारावे तू व्यवस्तीत पोहचलास ना.
भेट जरी दररोज होत नसली तरी विचार मात्र त्या व्यक्तीचाच करतो.
का? आम्ही दोघे एकमेकना सांगू शकत नाही की खरच मी पण तुझ्यावर खूप प्रेम करते.
का? भेटल्यावर मात्र प्रत्येक क्षण अविस्मरणीय जगायचा.
का?मी एखाद्या मुलाबद्ल सांगितल्यावर तो इग्नोर करतो
का? त्याने कोणत्या मुलीबद्दल विचारल्यावर मी सुधा माझ्या भावना लपवून ठेवते.
का? अस वाटत संपूर्ण आयुष्य त्याच्या मिठीतच घालवाव
भावना मात्र दोघांनाही माहिती आहे पण व्यक्त करायला आम्ही दोघे सुधा का घाबरतो.
का आम्ही प्रेम व्यक्त केल्यावर आमच मैत्रीच नात दूरावेल का?.


एक काळ असा होता..

 एक काळ असा होता..
बोलायची हिंमत व्हायची नाही..
मनात असून पाहायचं नाही..
आणि अजून काही बाहि..
आणि आज..
आज कुठून तरी बळ आलंय..
आज मनात काही ठेवत नाही..
आज मी आतबाहेर सारखाच..
तरी आज.. आज मी तसा एकटाच..
कारण काही कळत नाही..
हि वेळ काही टळत नाही..
चालले हातचे क्षण तरी,
नशिब काही पळत नाही..
मी कालही काही शोधत होतो..
मी आजही काही शोधत आहे..
प्रश्न जरा झालेत सोपे..,
पण उत्तर काही साधत नाही..
मी कालही कसल्या शोधात होतो
मी आजही काही शोधत आहे..


मैत्री आणि प्रेम अगदी गफ़लतच होते

मैत्री आणि प्रेम अगदी गफ़लतच होते, अनोळखीशी मैत्री मनात घर करून जाते,

तो सहवास अगदी हवाहवासा वाटतो, चंद्र आणि तारयांसोबती गप्पा करू लागतो,

मनात विचारांचा चालू असतो खेळ, पण काही गोष्टींशी बसतच नाही मेळ,

त्या नात्याचा गंध काही कळतच नाही, पाउले वेगळ्या दिशेने चालतात पण मन काही वळतच नाही,

दिवस - रात्र गप्पांचा चालू असतो प्रवास, कधी जर नाही काढली तिने आठवण तर होतो त्रास,

त्या नात्यामध्ये अचानक आपलेपण वाढते, सतत मन तिचीच आठवण काढ़ते,

रागावणे, रुसने, एकदम अधिकार गाजवणे, जसं माझ्यासाठी ती आणि तिच्यासाठी मीच असणे,

मैत्रीच्या नावाखाली हे असचं चालू असतं, कोण विचारेल अगोदर मन वाटचं बघत असतं,

जोड्या स्वर्गात बनतात, त्या अशाच कुठेतरी भेटतात,

कित्येकांचे स्वप्न साकारतात, तर काही पत्यांसारखे कोसळतात,

मी ही आज त्याच वाटेवर चालतोय, माझ्या भावना अशा शब्दात मांडतोय,

कळत नाहीये ती मैत्री आहे की प्रेम, म्हणून तुमच्याकडून ह्या प्रश्नाचे उत्तर मागतोय....


रोज अनेक चेहरे दिसतात

रोज अनेक चेहरे दिसतात
पण कॉलेजमधल्या त्या
चेहऱ्याकडे बघायची
मजा काही वेगळीच होती

हे सर्व आठवल्यावर वाटते
अश्या त्या कॉलेज लाईफ़ची
मजाच काही वेगळीच होती..............


आयुष्यं म्हणजे असतो एक प्रवास

आयुष्यं म्हणजे असतो एक प्रवास
जो सुरु होतो,
आपल्या जन्मापासुन
न कदाचित
मरणानंतरही संपत नाही.

अनेक उन्हाळे-पावसाळे
पहायला मिळतात या प्रवासात.
काही सुखाचे क्षण
अनुभवायला मिळतात,
तर काही कायमचा
धडा शिकवुन जातात

काही स्वप्ने नकळतपणे पाहिली जातात
तर काही जाणुन बुजुन
पण अनेकदा त्यातली काही स्वप्ने
अर्धवटच राहुन जातात

अशा ह्या प्रवासाच्या पुस्तकात
काही पाने नकळत जोडली जातात
तर काही कोरीच राहुन जातात....
आणि मग शेवटी ह्या कोऱ्या
कागदांचे तयार होते एक वेगळेच पुस्तक
ज्याला आपण नाव देतो "माझे आयुष्यं".


एकदाची उगवली ती सकाळ

एकदाची उगवली ती सकाळ
वाट पहात होतो जिची

होते मन उतावीळ
तिच्या तोंडुन ते शब्दं ऎकण्यासाठी

पण ते शब्दं माझ्यासाठी
नव्हतेच कदाचीत

त्यानंतर वाईट असे कधी
वाटलेच नाही

डोळ्यात ह्या अष्रु
कधी तरळलेच नाहीत

ह्या पुढे कदाचीत प्रेमाचा
विचारही हे मन करणार नाही

हसाय्च्याही आधी खुप
वेळा विचार करेल हे मन

आहे खात्री मला ती विसरणार नाही
तरीही मी काही बोलणार नाही

असे असुनही वेडे हे मन माझे
काही केल्या शांत बसेना

आजही मनात कुठेतरी आहे एक आस
की ती येईल परत कदाचित...........

आजपर्यंतच्या प्रवासात

आजपर्यंतच्या प्रवासात
अनेक गोष्टी शिकलो

विचार करायला शिकलो
भर दिवसा स्वप्नं बघायला शिकलो

अनेकदा अडखळूनहि पुन्हा
स्वत:ला सावरायला शिकलो

स्वत:साठी जगता जगता
दुसऱ्यांसाठी जगायला शिकलो

शब्दांचे अर्थं समजुन घेऊन
कविता लिहायला शिकलो

छोट्या छोट्या गोष्टींमध्ये
आनंदीत व्हायला शिकलो

स्वत:ला समजुन घेता नाही आले तरी
दुसऱ्यांना ओळखायला शिकलो

एवढे शिकुनही अत्तापर्यंत
"प्रेम" करायला नाही शिकलो............

अंधारलेल्या माझ्या दुनियेत

अंधारलेल्या माझ्या दुनियेत
होतो मी एकटाच जगत..........

होते फ़क्त माझेच शब्दं
माझ्या अवतीभवती

अचानक या दुनियेत आली एक परी
एक आषेचा किरण बनुन.........

बहरली एक नवी उमेद
दिसु लागले सुर्यकिरण..........

शब्दांना माझ्या गवसले अर्थं
माझ्यातच मी झालो धुंद...........

क्षणभर का होईना, वाटू लागले
somewhere I belong

पण विसरलो होतो मी की....
काही स्वप्नं हि स्वप्नंच रहातात
न काही लोक शेवटपर्यंत
"शापित गंधर्व" रहातात.............

घरात येणाऱ्या प्रत्येक सुर्य किरणांत....

घरात येणाऱ्या प्रत्येक सुर्य किरणांत....

सकाळच्या त्या धुंद वातावरणात..

पक्षांच्या त्या किलबिलाटात.......

घड्याळात वाजणाऱ्या प्रत्येक सेकंदात......

पडणाऱ्या पावसाच्या थेंबात.........

दरवळणाऱ्या मातीच्या सुगंधात......

आठवणीतल्या प्रत्येक दिवसात....

सहज मिळालेल्या रिकम्या वेळात...

अडखळुन पडल्यावर
झालेल्या प्रत्येक जखमेत....

मनात योजलेल्या हर एक कल्पनेत
"जीवन" शोधतो मी..............

जीवन शोधता शोधता
आज स्व:ताला शोधतो मी.............


असं का होतय ?

असं का होतय ?

झोप येत असुनही
जागरण करावेसे वाटते

भुक असुनही
काहीच खावेसे वाटत नाही

"नाही" बोलायचे असतानाही
"हो" का बोलतो मी ?

मनात प्रचंड राग असताना
ओठांवर हसू का येते ?

अपुऱ्या ईछा पुर्ण करुनही
कसलीतरी उणीव का जाणवतेय ?

सगळे जवळ असतानाही
एकटे एकटे का वाटतय ?

Engg पर्यंत कविता काय असते
हे पण माहीत नव्हते
पण अत्ता ही चौथी कविता लिहितोय

कोणी सांगेल का मला
असं का होतय ?


जिथे नाही माणूसकीला किंमत

जिथे नाही माणूसकीला किंमत
जिथे प्रत्येक गोष्ट मोजली जाते पैशात

माणूसच माणसाचा बनलाय शत्रू
त्याला बाकीचे प्राणी तरी काय करणार ?

वेळेशी बांधील आपले आयुष्य
नियती करी त्यावर स्मितहास्य

इथे स्वत:साठी वेळ नाही कुणाला
दुसऱ्याकडे कोण बघणार ?

जिथे संकटातच फ़क्त उदगार निघतात
"आम्ही सारे एक आहोत.........."

बाकीच्या वेळी तेच शब्द असतात
"आपण कोण आहात ?..................."

हे सर्व वर्णन करताना
कधी कधी शब्दही अपुरे पडतात

स्वत:साठी सगळेच जगतात
दुसऱ्यांसाठी जगतो तोच खरा माणूस......

बघता बघता कॉलेज कधी

बघता बघता कॉलेज कधी
संपले काही कळलेच नाही......
नंतर ऑफ़िस लाईफ़ही सुरु झाले

पॉकेटमनी चे रुपांतर पगारात झाले
पण कॉलेजसाठी मिळणाऱ्या त्या ३००
रुपयांची मजा काही वेगळीच होती

ऑफ़ीसमधे जरी स्वत:चे separate
workstation असले तरी
कॉलेजमधल्या bench ची
मजा काही वेगळीच होती

रोजच ऑफ़ीसच्या canteen मधे जातो
पण कॉलेजच्या canteen ची
मजा काही वेगळीच होती

रोजच ऑफ़ीसमधे कॉफ़ी पीतो
पण college canteen मधल्या
त्या cutting ची मजा
काही वेगळीच होती

रोजच ऑफ़ीसमधे येउन login
करतो, पण कॉलेजमधल्या
proxy ची मजा
काही वेगळीच होती

रोज अनेक चेहरे दिसतात
पण कॉलेजमधल्या त्या
चेहऱ्याकडे बघायची
मजा काही वेगळीच होती

हे सर्व आठवल्यावर वाटते
अश्या त्या कॉलेज लाईफ़ची
मजाच काही वेगळीच होती..............

आज पक्के ठरवले मनाशी

आज पक्के ठरवले मनाशी
सगळं काही मार्गी लावायचे

पण झाली जाणीव
जेव्हा खऱ्या परीस्थितीची

खऱ्या अर्थाने त्यावेळी
तोंडुन शब्द फ़ुटेनासे झाले

मनातल्या सगळ्या Feelings मेल्या
डोळ्यातून अश्रुही निघेनासे झाले

लागलेली भुकही मेली
घसाही कोरडा पडला

या सगळ्यात कधी
संध्याकाळ झाली कळलंच नाही

दूर पहावे आकाशात तर........
पक्षीही आपल्या घरट्याकडे परतले नाहीत
चंद्रही आकाशात दिसला नाही

दिवसभर खुप विचार केला
पण काय झालं कळलंच नाही

आज अचानक असे काय झाले.........................


प्रेम म्हणजे असतो

प्रेम म्हणजे असतो
एकच श्वास दोघांसाठी.....

प्रेम म्हणजे असतो
एकच विश्वास, कधीही न संपणारा...

प्रेम म्हणजे असते
एकच गाणे, दोघांनी गुणगुणायचे....

प्रेमात नसावी काही
मिळव्ण्याची भाषा........

प्रेमात असावी एकच अभिलाषा......
न बोललेले शब्द ऎकायची.....

प्रेमात नसावे रुसवे फ़ूगवे
असावा फ़क्त आनंदी आनंद गडे..........
इकडे तिकडे चोहीकडे........

एकदा तरी प्रेम जरुर करावे
पण ते आंधळे नसावे...........

कोणी तरी बोललेच आहे
"प्रेम म्हणजे प्रेम असतं
तुमचं आमचं same असतं"..............


सकाळी साखरझोपेतुन उठवणारी...

सकाळी साखरझोपेतुन उठवणारी...
तो चेहरा बघुन क्षणात झोप उडावी..

जीच्या हातचा कडु चहा
पण गोड वाटावा........

ऑफ़ीसमधला प्रत्येक रिकामी क्षण
तिचिच आठवण करुन देई...

तिच्यासोबत घालवलेला एकेक क्षण
एक तासासारखा वाटावा.....

जिच्या नसण्याने व्हावी
आयुष्यात एक मोठी पोकळी....

अशी हि "ती" म्हणजे
न संपणारे एक अखंड स्वप्नं असावे........

कुणीतरी आपलही असावे..........

खुप अभ्यास करुन झाला

खुप अभ्यास करुन झाला
आता थोडे काम करेन म्हणतो

आजवर खुप काही गमावले
आज थोडे काही कमावेन म्हणतो

मनात आले जरी खुप हसु
तरी आज शेवटचे रडेन म्हणतो

दुसऱ्यासाठी खुप जगलो
आज स्वत:साठी जगेन म्हणतो

काही सुचेनासे झाले तरी
आज शेवटचे शब्द लिहीन म्हणतो

अत्तापर्यंत नेहमी दूसराच राहीलो
आज पहिला येईन म्हणतो

अत्तापर्यंत देवाकडे नेहमी
दुसऱ्यासाठीच मागीतले
आज स्वत:साठी
काही तरी मागेन म्हणतो

ही शेवटची कविता लिहीन म्हणतो
तिच्या आयुष्यातुन निघुन जाईन म्हणतो.............

दुरवर जाते ही वाट

दुरवर जाते ही वाट
बजबजतो पक्षांचा किलबिलाट
खळखळत वाहते ते समुद्राचे नीळेशार पाणी

अशा या रम्य संध्याकाळी
मन आठवणींनी दाटुन येई

आठवतो तो भुतकाळ
करुन देई जाणीव

एका कटू सत्याची
"तिला माझे शब्द कधी कळलेच नाहीत"

मनात उठवी अनेक भावनांचा कल्लोळ
तरीही आणुन देई ओठांवर हसु

कदाचित जिवन याचेच नाव
अचानक पुन्हा वर्तमानकाळात आणुन सोडी

न मग डोळ्यांसमोर दिसते ती
दुरवर जाते ही वाट.


मला अजुन जगायचे आहे..............

आजपर्यंत काहीच नाही केलं तरी
पुढे खुप काही कमवायचे आहे........

अनेक चुका नकळत घडल्या तरी
अजुन एक चुक करायची आहे......

अनेकदा अडखळून पडलो तरी
आज पुन्हा ठेच खायची आहे......

अपुरा पडला वेळ जरी
थोडा अजुन Timepass करायचा आहे.........

भरुनी आले हे नयन जरी
हसतमुखाने वावरायचे आहे......

थकले हे पाय जरी
अजुन थोडे चालायचे आहे.....

राहीलो दुर्लक्षित जरी
कुणाचीतरी काळजी घ्यायची आहे.....

राहीले अर्धवट "तिचे" स्वप्न तरी
मला अजुन जगायचे आहे..............