मला मनातून वाटतंय,
तु मला संध्याकाळी अचानक भेटावं,
कवितेत आजवर लिहिलेलं ,
सारं तूला माझ्या ओठांनी सांगाव ,
माहित नाही तू तेव्हा काय बोलशील
रागावून पाठ फिरवशील
कि लाजून पुन्हा लाईक करशील ...
मनातल सारच तेव्हा काही
माझ्या ओठांवर नसेल
तरीही तुला सार काही
माझ्या डोळ्यातून उमजेल
हवेत हि तेव्हा उमटेल मस्त गारठा
आपल्या पहिल्या भेटीचा प्रेमळ हिंदोळा
खुलेल सहवासाचा इंद्रधनू हि तेव्हा रुपेरी
लाजून तुला चंद्र हि लपेल ढगानआड आभाळी
कस सगळ मला अगदी स्वप्नागत भासेल
भेट पहिली तुझी अन माझी
आयुष्याची गोड साठवण असेल....
काय माहित असा अचानक
तू कधी भेटतलस कि नाय
कि रोज सारख्या टिपूस न ढळता
आभाळ भेटीचा नुसताच ढगांनी , दाटवून रवतलस कि काय ???
