Pages

Saturday, June 23, 2012

खूप दिवसापास्न चाललय डोक्यात...



खूप दिवसापास्न चाललय डोक्यात...
कविता करू असं आलय मनात..
पण कशावर करू..काय लिहू..
काही सुचेनास झालय..!!

समोर आई बसलीये..

तिच्यावर २ ओळी लिहू म्हणून आलं मनात..
पण मग बाबांना राग नाही येणार..?
सारखं सारखं आई लाच का म्हणून देवपण देऊ..
बाबांनी काय कमी सोसलंय माझ्यासाठी?
छे यार काहीच कळेनास झालंय..!!

आज काल मित्रांची पण खूप आठवण येतेय..
त्यांच्यासोबत घालवलेला एकूण एक क्षण आठवतोय..
पण त्या क्षणांची मजा कवितेत सामावणार आहे थोडीच..?
ती एका पार्टी ची रंगत परत मिळणारे का हो मुळीच..?
आणि कविता वाचल्यावर त्यांच्या शिव्या पडणार त्या तर वेगळ्याच..!
काय लिहू आता...डोकं बंद पडलंय..!!

कधी कधी वाटत..काही तरी मोठं लिहाव..
आयुष्य वगैरे कल्पना आपणही मांडून बघावं..
देवालाही जरा आपल्या परीक्षेत नापास करावं..
पण मी म्हणालो म्हणून असं होणारे का खरंच?
आणी झालंच जरी..तर कोण बसणारे बघत..आहे का तेवढा वेळ कुणाला..
कोणासाठी कविता करू मग मी..?

खरंच..पटलय आता मनाला...
कविता काही खाऊची पेंड नाही..
ठरवून काही कविता होत नाही..
आणी सुचायला आमचे मेंदू तेवढे "काल्पनिक" नाहीत..
जाऊ दे आता...
कविता परत करायची नाही..!!!