वार्याला पावले थेंबांची घेऊन पाऊस आला !
आकाशी पांखरे ढगांची घेऊन पाऊस आला !
उजाडल्या डोळ्यांकाठी,
तहानल्या ओठांसाठी,
जगण्याचे थेंब चार ताजे घेऊन पाऊस आला !
आतुरश्या काळजांचे,
वाटेकडल्या नजरांचे,
क्षितिजाला रंग काजळाचे घेऊन पाऊस आला !
सरसरत्या लयतालांचे,
झिमझिमत्या झंकारांचे,
धरतीचे स्वप्न मैफलीचे घेऊन पाऊस आला !
हृदयातुन दाटलेला,
अश्रूंतून फाटलेला,
शब्दांना पूर एक वेडा घेऊन पाऊस आला !
पक्षी होऊनी ऊडण्या मन हे सरसावले
नवा गंध हा हूंगण्या मन हे रे वेडावले,
वार्यावरती झूलण्यास मन हे झेपावले
कुणास बघूनी मग इथेच रे थबकले...
मनात माझ्या अलगद कोण हे रे शिरले
मनाचा माझ्या ताबा घेऊनी हसत बसले,
आता माझे हे मन बघ माझे न राहिले
कुणास भुलूनी मग हे स्वत:शीच हरले...
तुला बघितले अन् भानच रे हरपले
पाऊस नसताही मन माझे चिंब भिजले,
कुणास ठाऊक हे कसे अन कधी घडले
पण माझे वेडे मन हे तुजवर जडले...
वारा नसताही मन माझे हे थरथरले
पाणी नसतानाही मन तृप्त हे रे जाहले,
आनंदात मग ते हळूच बघ वदले
तुजवर माझे प्रेम असे जडले...
मनास माझ्या आताशा काय असे झाले
हे मग रे मला सहजच उमजले,
मनाने मनाशी तुझ्या बघ नाते हे जोडले
नात्यास या प्रेमाचे नाव आपण दिधले...
जगण्याचा या मज अर्थ कळेना
रस्त्याचा या मज शेवट दिसेना,
जणू कळस इथे स्वार्थाचा हो स्वार्थाचा
वर चढे हर एक पाय खेचून दुसर्याचा,
कुठेच बघ हा रस्ता संपेना
जगण्याचा या मज अर्थ कळेना
नोकरीसाठी शिक्षण असे हे
पैशासाठीच असे ही नोकरी,
समाधान मात्र कुठेच मिळेना
जगण्याचा या मज अर्थ कळेना
राब राब राबतो माणूस हा यंत्रागत
सदा सर्वदा अडकलेला व्यवहाराच्या गर्तेत,
प्रेमाचा इथे लवलेश दिसेना
जगण्याचा या मज अर्थ कळेना
दु:खात ना कुणी साथी ना सोबती
सुखात मात्र सारे अवती-भवती,
कुणापास बोलावे काही उमजेना
जगण्याचा या मज अर्थ कळेना
असे कसे रे जगलो इथवर
पुढे कसे कसे रे जगणार
उत्तर कुठेही बघ हे मिळेना
मैत्री अशी तुझ्या-माझ्यात
चांदणं जसं निरभ्र आकाशात
जवळ नसतानाही तू सख्या
सहवास तुझा सतत भासे
एकांतात असताना रे मी
साथ मला ही तुझीच असे
मैत्री अशी तुझ्या-माझ्यात
रिमझिम धारा जशा उन्हात
दिवसभर राब राब राबता
थकवा हा जीवघेणा वाटे
रात्री तुझ्याशी हितगूज साधता
नवा उत्साह मनी बघ साठे
मैत्री अशी तुझ्या-माझ्यात
गंधित फुले जशी या हातात
नजरेसमोर या तू नसता
आठवण तुझी मनात दाटे
सामोरा मग तू येता
मज आकाश ठेंगणे वाटे
मैत्री अशी तुझ्या-माझ्यात
समई तेवते जशी देव्हार्यात
मैत्री आपली खळ्खळ हसणारी
हवीहवीशी मला सतत वाटणारी
मैत्री अशी तुझ्या-माझ्यात
जीव सख्या गुंतला रे तुझ्यात
नुरली इथे माणुसकी, नुरली चाड नात्यांची
नुरला इथे प्रेम जिव्हाळा,उरली तहान देहाची
लज्जा,शरम,अब्रू खेळी फ़क्त शब्दांची
किंमत नुरली जगती या शब्दांच्या अर्थाची
भूक देहाची शमविण्या खुडली एक कळी
पुसोनिया कुंकू यातनांचा संग्राम तिच्या भाळी
समाजास लागली वाळ्वी ही नराधमांची
पोखरूनी स्त्रियांना तहान शमवी हे देहाची
शिक्षा होऊनी त्यांना व्रण हे मिटणार नाही
कोमेजलेली कळी परत कधी फुलणार नाही
चर्चा करुनी समाज हा बघा झोपी जाई
स्वग्रूही अघटीत घडण्याची जणू वाट पाही
जोडूनी हात पाय विनविते तुम्हा
माणुसकीला जरा जागे करा
एकाकी स्त्रीचा टाहो हा ऐका जरा
किड ही नष्ट करण्या पेटूनी आता ऊठा जरा.
आला काळोख दाटूनी
काहूर विचारांचे घेऊनी
दिस नकळत सरला
रातीला एकटेपणा उरला
मन एकाकी एकाकी
गाठ पडे प्रश्नांची
या भयाण काळोखी
घालमेल होई जीवाची
मन गुंतती गुंतती
गुंतल्यात आठवणी
तारे ते बघूनी
डोळा येते मग पाणी
गेला तारा बनण्या
डाव अर्ध्यावर सोडून
थकले मी आता
रथ तुझ्याविना ओढून
लाखो तार्यांत त्या
तुला शोधायचे कुठे?
हितगुज तुझ्याशी
आता साधायचे कसे?
नको वाटते आता
रात एकाकी भकास
तुझ्याविना माझा
इथेच थांबावा प्रवास...
आला बेभान हा वारा
चाहूल पावसाची घेऊनी
धरती ही सुखावली
शाल लाजेची ओढूनी
विजेची ही तार आली
त्याचा सांगावा घेऊनी
उठा उठा धरणी माते
राजे येताहेत मागुनी
प्रेयसिच्या ओढीने
वरुणराज हा धावत आला
सरसावली मग ही धरा
त्याला आलिंगन देण्या
विरहाने रुसलेल्या धरेला
आणली भेट हिरव्या चोळीची
दिली भरुन ओंजळ तिला
राजाने गार टपोर्या मोत्यांची
धरेने शिंपडला स्वागता
सुगंधी असा सडा अत्तराचा
सामावला कणाकणात
परीपूर्ण गंध या पावसाचा
मिठीत पावसाच्या
गेली धरा रंगून
स्वार होऊन सरीवर
आली बघा बहरुन